ETV Bharat / state

डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा सशस्त्र हाणामारी, 3 जखमी

author img

By

Published : Nov 7, 2019, 6:26 PM IST

सोमवारी 28 ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फेरीवाल्यांच्या 2 गटात बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या पुलावर फेरीवाल्यांमध्ये सशस्त्र राडा झाला. एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जबर जखमी झाले. ही धुमश्चक्री जवळपास अर्धा तास सुरू होती.

डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा सशस्त्र हाणामारी, 3 जखमी

ठाणे - डोंबिवलीच्या पुलावर खाद्य पदार्थ तयार करणारे व ग्राहक यांच्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघांची डोकी फुटली, तर त्यातील तिघांचीही प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यातील आरोपी टोळके सुसाट गँगचे असल्याचे समोर आले आहे.

डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा सशस्त्र हाणामारी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा डंका पिटला जात आहे. तरीही आजही फेरीवाले उघडपणे व्यवसाय करत आहेत. काही महिन्यांपूर्वी इंदिरा गांधी चौकात पदपथावर एका फेरीवाल्याने दुसऱ्या महिला फेरीवालीशी जागेवरून वाद घातल्याने दोन्ही गटातील फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊन चांगलेच गाजले होते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या आक्रमक आंदोलनानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वे स्टेशन परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 150 मीटर परिसरात व्यवसाय लावण्याची बंदी घालण्यात आली. मात्र, आजही या परिसरात फेरीवाल्यांचा कब्जा कायम असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल

सोमवारी 28 ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फेरीवाल्यांच्या 2 गटात बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या पुलावर फेरीवाल्यांमध्ये सशस्त्र राडा झाला. एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जबर जखमी झाले. ही धुमश्चक्री जवळपास अर्धा तास सुरू होती. यातील 3 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकास नवले (27), मिलींद घोलप (26) आणि अनिल चंदनशिवे (28) अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा - रात्रीच्या अंधारात भातशेतीच्या बांधावरून पालकमंत्र्यांनी दिला विमा कंपन्यांना इशारा

या तिघांच्या हाता-पायांवर वार झाले असून प्राथमिक उपचार करून यांना ठाण्याच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. या संदर्भात चौकशी व जबाब घेण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांनी सांगितले. यातील तिन्ही जखमींवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार सुरू केले. मात्र, तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात पाठवण्यात आल्याचे शास्त्रीनगर रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

ठाणे - डोंबिवलीच्या पुलावर खाद्य पदार्थ तयार करणारे व ग्राहक यांच्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघांची डोकी फुटली, तर त्यातील तिघांचीही प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यातील आरोपी टोळके सुसाट गँगचे असल्याचे समोर आले आहे.

डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा सशस्त्र हाणामारी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा डंका पिटला जात आहे. तरीही आजही फेरीवाले उघडपणे व्यवसाय करत आहेत. काही महिन्यांपूर्वी इंदिरा गांधी चौकात पदपथावर एका फेरीवाल्याने दुसऱ्या महिला फेरीवालीशी जागेवरून वाद घातल्याने दोन्ही गटातील फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊन चांगलेच गाजले होते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या आक्रमक आंदोलनानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वे स्टेशन परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 150 मीटर परिसरात व्यवसाय लावण्याची बंदी घालण्यात आली. मात्र, आजही या परिसरात फेरीवाल्यांचा कब्जा कायम असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल

सोमवारी 28 ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फेरीवाल्यांच्या 2 गटात बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या पुलावर फेरीवाल्यांमध्ये सशस्त्र राडा झाला. एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जबर जखमी झाले. ही धुमश्चक्री जवळपास अर्धा तास सुरू होती. यातील 3 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकास नवले (27), मिलींद घोलप (26) आणि अनिल चंदनशिवे (28) अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा - रात्रीच्या अंधारात भातशेतीच्या बांधावरून पालकमंत्र्यांनी दिला विमा कंपन्यांना इशारा

या तिघांच्या हाता-पायांवर वार झाले असून प्राथमिक उपचार करून यांना ठाण्याच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. या संदर्भात चौकशी व जबाब घेण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांनी सांगितले. यातील तिन्ही जखमींवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार सुरू केले. मात्र, तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात पाठवण्यात आल्याचे शास्त्रीनगर रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Intro:kit 319Body:डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा सशस्त्र हाणामारी; सुसाट गँगच्या हल्ल्यात तिघांची फुटली डोकी

ठाणे : डोंबिवलीच्या पुलावर खाद्य पदार्थ तयार करणारे व ग्राहक यांच्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघांची डोकी फुटली, तर त्यातील तिघांचीही प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यातील आरोपी असलेले सशस्त्र टोळके सुसाट गँगने प्रसिद्ध असल्याचे समोर आले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा डंका पिटला जात असला तरी आजही फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत. काही महिन्यांपूर्वी इंदिरा गांधी चौकात पदपथावर एका फेरीवाल्याने दुसऱ्या महिला फेरीवालीशी जागेवरून वाद घातल्याने दोन्ही गटातील फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊन चांगलेच गाजले होते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या आक्रमक आंदोलनानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वे स्टेशन परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 150 मीटर परिसरात व्यवसाय लावण्याची बंदी घालण्यात आली. मात्र आजही या परिसरात फेरीवाल्यांचा कब्जा कायम असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फेरीवाल्यांच्या 2 गटात बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या पुलावर फेरीवाल्यांमध्ये सशस्त्र राडा झाला. एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जबर जखमी झाले. ही धुमश्चक्री जवळपास अर्धा तास सुरू होती. यातील 3 जण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. विकास नवले (27), मिलींद घोलप (26) आणि अनिल चंदनशिवे (28) अशी जखमींची नावे आहेत. या तिघांच्या हाता-पायांवर वार झाले असून प्राथमिक उपचार करून ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले या संदर्भात चौकशी व जबाब काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांनी सांगितले. यातील तिन्ही जखमींवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. मात्र तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचे शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले.

Conclusion:donbiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.