ETV Bharat / state

नवी मुंबईत आज 42 रुग्ण बरे होऊन घरी परतले.. नवीन 62 कोरोनाबाधितांची भर

author img

By

Published : May 17, 2020, 11:59 PM IST

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.

नवी मुंबई
नवी मुंबई

नवी मुंबई - शहरात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजही नवी मुंबईत 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आज 42 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच 31 मेपर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नवी मुंबईत पालन करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

अण्णासाहेब मिसाळ (आयुक्त नवी मुंबई)

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात आत्तापर्यंत 1201 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 8360 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 6434 जण निगेटिव्ह आले असून 736 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1190 इतकी आहे, आज 62 जण (17 मे ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे मधील 23, बेलापूर मधील 1, कोपरखैरणे मधील 20, नेरुळमधील 4 व वाशीतील 4, घणसोलीमधील 4, ऐरोलीमधील 5 व दिघ्यात 1 असे एकूण 62 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शहरात 1190 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 409 व्यक्ती कोरोनातून बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज नेरूळमधील 3, बेलापूरमधील 6, वाशीमधील 13, तुर्भे येथील 7, कोपरखैरणेमधील 10, घणसोलीमधील 2, ऐरोलीमधील 1 असे एकूण 42 व्यक्ती आज कोरोनातून बरे झाले. शहरात सद्यस्थितीमध्ये 790 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच नवी मुंबई 'रेड झोन'मध्ये येत असल्याने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आदेश जारी करण्यात आले असून 2 मेच्या आदेशानुसार लॉकडाऊन दरम्यानचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये सब रजिस्टर कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, पाच कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर आरटीओ ऑफिस देखील दहा टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू करण्यात येईल.

नवी मुंबई - शहरात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजही नवी मुंबईत 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आज 42 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच 31 मेपर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नवी मुंबईत पालन करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

अण्णासाहेब मिसाळ (आयुक्त नवी मुंबई)

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात आत्तापर्यंत 1201 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 8360 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 6434 जण निगेटिव्ह आले असून 736 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1190 इतकी आहे, आज 62 जण (17 मे ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे मधील 23, बेलापूर मधील 1, कोपरखैरणे मधील 20, नेरुळमधील 4 व वाशीतील 4, घणसोलीमधील 4, ऐरोलीमधील 5 व दिघ्यात 1 असे एकूण 62 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शहरात 1190 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 409 व्यक्ती कोरोनातून बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज नेरूळमधील 3, बेलापूरमधील 6, वाशीमधील 13, तुर्भे येथील 7, कोपरखैरणेमधील 10, घणसोलीमधील 2, ऐरोलीमधील 1 असे एकूण 42 व्यक्ती आज कोरोनातून बरे झाले. शहरात सद्यस्थितीमध्ये 790 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच नवी मुंबई 'रेड झोन'मध्ये येत असल्याने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आदेश जारी करण्यात आले असून 2 मेच्या आदेशानुसार लॉकडाऊन दरम्यानचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये सब रजिस्टर कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, पाच कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर आरटीओ ऑफिस देखील दहा टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू करण्यात येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.