ETV Bharat / state

राखी व्यापाऱ्यांनी घेतली संचारबंदीची धास्ती, जिल्हा प्रशासनासमोर व्यापारी मांडल्या व्यथा

author img

By

Published : Aug 12, 2021, 3:07 PM IST

Updated : Aug 12, 2021, 3:25 PM IST

पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पाच तालुक्यांमध्ये शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन दिनानिमित्ताने राखी व्यापाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संचारबंदीची धास्ती घेतली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पाच तालुक्यांमध्ये शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन दिनानिमित्ताने राखी व्यापाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात निर्णय घेतला आहे. त्यामुळे राखी विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. संचारबंदीमुळे राखी विक्री व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

बोलताना व्यापारी

राखी विक्रीतून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा आर्थिक व्यवहार

श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला आहे. हिंदू धर्मामध्ये राखी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिन्यातच हिंदू धर्मातील प्रमुख सण साजरे केले जातात. त्यामध्ये रक्षा बंधन हा बहीण-भावांचा नात्यातील गोडवा निर्माण करणारा सण आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात व्यापाऱ्यांकडून शहरांमध्ये राख्या विक्रीचे स्टॉल उभारले जातात. राख्या खरेदीसाठी व्यापारी एक महिना आधी तयारी करत असतात. पंढरपूर शहरात शंभर ते दीडशे व्यापारी राखी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार चालू होतात. राखी पौर्णिमेनिमित्त बहिणी भावांसाठी राखी खरेदी करत असतात. त्यातून बाजारात आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणावर होती. यातूनच राखी विक्री करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालत असतो.

व्यापाऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल 'जगायचं कसं'

22 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. त्यामुळे पंढरपुरातील राखी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचे राखी विक्रीचा माल खरेदी केला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील शंभर ते दीडशे राखी विक्री व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे संचारबंदी लागू झाल्यामुळे राखी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून राखी विक्री सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. ऐन सणासुदीच्या वेळेस संचारबंदी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला.

हेही वाचा - Pandharpur Curfew : अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पाच तालुक्यांमध्ये शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन दिनानिमित्ताने राखी व्यापाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात निर्णय घेतला आहे. त्यामुळे राखी विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. संचारबंदीमुळे राखी विक्री व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

बोलताना व्यापारी

राखी विक्रीतून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा आर्थिक व्यवहार

श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला आहे. हिंदू धर्मामध्ये राखी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिन्यातच हिंदू धर्मातील प्रमुख सण साजरे केले जातात. त्यामध्ये रक्षा बंधन हा बहीण-भावांचा नात्यातील गोडवा निर्माण करणारा सण आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात व्यापाऱ्यांकडून शहरांमध्ये राख्या विक्रीचे स्टॉल उभारले जातात. राख्या खरेदीसाठी व्यापारी एक महिना आधी तयारी करत असतात. पंढरपूर शहरात शंभर ते दीडशे व्यापारी राखी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार चालू होतात. राखी पौर्णिमेनिमित्त बहिणी भावांसाठी राखी खरेदी करत असतात. त्यातून बाजारात आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणावर होती. यातूनच राखी विक्री करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालत असतो.

व्यापाऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल 'जगायचं कसं'

22 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. त्यामुळे पंढरपुरातील राखी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचे राखी विक्रीचा माल खरेदी केला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील शंभर ते दीडशे राखी विक्री व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे संचारबंदी लागू झाल्यामुळे राखी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून राखी विक्री सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. ऐन सणासुदीच्या वेळेस संचारबंदी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला.

हेही वाचा - Pandharpur Curfew : अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

Last Updated : Aug 12, 2021, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.