ETV Bharat / state

पंढरीच्या वारीत 'ग्रामसेवकांची दिंडी'; सरकारच्या विविध योजनांची दिली माहिती

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने ग्रामविकासाचा आणि स्वच्छतेचा संदेश देत नगर ते पंढरपूर अशी ही पायी दिंडी काढली जाते. यावर्षी या दिंडीत राज्यभरातील सुमारे २०० हून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. नगर ते पंढरपूर दरम्यानच्या वारी मार्गावरील प्रत्येक गावात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीने जलयुक्त शिवार, वृक्षलागवड, रोजगार हमी योजनांसह ग्रामविकास खात्याच्या विविध योजनांची माहिती आणि जनजागृती केली.

author img

By

Published : Jul 2, 2019, 9:04 PM IST

Updated : Jul 2, 2019, 9:19 PM IST

मसेवकांची प्रबोधन दिंडी पंढरीत दाखल

सोलापूर - ग्रामविकासाच्या प्रक्रियेतील प्रशासकीय दुवा असलेल्या ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी विठु माऊलींच्या जयघोषात पंढरीत दाखल झाली. या प्रबोधन दिंडीचे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी स्वागत केले.

स्वच्छतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश देणारी ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी पंढरीत दाखल

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने ग्रामविकासाचा आणि स्वच्छतेचा संदेश देत नगर ते पंढरपूर अशी ही पायी दिंडी काढली जाते. यावर्षी या दिंडीत राज्यभरातील सुमारे २०० हून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. नगर ते पंढरपूर दरम्यानच्या वारी मार्गावरील प्रत्येक गावात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीने जलयुक्त शिवार, वृक्षलागवड, रोजगार हमी योजनांसह ग्रामविकास खात्याच्या विविध योजनांची माहिती आणि जनजागृती केली.

दिंडीत पायी आलेल्या ग्रामसेवकांनी विठ्ठलाकडे राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि ग्रामीण लोकांचे आरोग्य सुदृढ राहू दे, असे साकडे घातल्याचे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष आणि दिंडी सोहळ्याचे प्रमुख एकनाथ ढाकणे यानी सांगितले. यानंतर दुपारी शितल साबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने दिंडीची सांगता झाली.

दरम्यान, शासकीय विभागातील ग्रामसेवकांनी आषाढीची पायी प्रबोधन दिंडी सुरू केल्याने प्रशासकीय स्तरावर कौतुक केले जात आहे.

सोलापूर - ग्रामविकासाच्या प्रक्रियेतील प्रशासकीय दुवा असलेल्या ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी विठु माऊलींच्या जयघोषात पंढरीत दाखल झाली. या प्रबोधन दिंडीचे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी स्वागत केले.

स्वच्छतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश देणारी ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी पंढरीत दाखल

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने ग्रामविकासाचा आणि स्वच्छतेचा संदेश देत नगर ते पंढरपूर अशी ही पायी दिंडी काढली जाते. यावर्षी या दिंडीत राज्यभरातील सुमारे २०० हून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. नगर ते पंढरपूर दरम्यानच्या वारी मार्गावरील प्रत्येक गावात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीने जलयुक्त शिवार, वृक्षलागवड, रोजगार हमी योजनांसह ग्रामविकास खात्याच्या विविध योजनांची माहिती आणि जनजागृती केली.

दिंडीत पायी आलेल्या ग्रामसेवकांनी विठ्ठलाकडे राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि ग्रामीण लोकांचे आरोग्य सुदृढ राहू दे, असे साकडे घातल्याचे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष आणि दिंडी सोहळ्याचे प्रमुख एकनाथ ढाकणे यानी सांगितले. यानंतर दुपारी शितल साबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने दिंडीची सांगता झाली.

दरम्यान, शासकीय विभागातील ग्रामसेवकांनी आषाढीची पायी प्रबोधन दिंडी सुरू केल्याने प्रशासकीय स्तरावर कौतुक केले जात आहे.

Intro:R_MH_SOL_01_JULLY_2019_GRAMSEVAK_DINDI_S_PAWAR_VIS

स्वच्छतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश देणारी ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी पंढरीत दाखल..
सोलापूर-
ग्रामविकासाच्या प्रक्रियेतील प्रशासकीय दुवा असलेल्या ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी विठु माऊलींच्या जयघोषात पंढरीत दाखल झाली.Body:मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामविकासाचा आणि स्वच्छतेचा संदेश देत नगर ते पंढरपूर पायी दिंडी काढली जाते.
ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी आज विठु नामाच्या गजर करत आणि विविध शासकीय योजनांची माहिती देत पंढरीत दाखल झाली.
पायी दिंडीत राज्यभरातील सुमारे 200 हून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले आहेत.

नगर ते पंढरपूर दरम्यानच्या वारी मार्गावरील प्रत्येक गावात कीर्तन आणी प्रवचनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार,वृक्षलागवड,रोजगार हमी योजनांसह ग्रामविकास खात्याच्या विविध योजनांची माहिती आणि जनजागृती केली.प्रबोधन दिंडीचे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी स्वागत केले.
दिंडीत पायी आलेल्या ग्रामसेवकांनी विठ्ठलाकडे राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि ग्रामीण लोकांचे आरोग्य सुदृढ राहू दे असे साकडे घातल्याचे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष आणि दिंडी सोहळयाचे प्रमुख एकनाथ ढाकणे यानी सांगितले.
यानंतर दुपारी शितल साबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने दिंडीची सांगता झाली.
शासकीय विभागातील ग्रामसेवकांनी आषाढीची पायी प्रबोधन दिंडी सुरू केल्याने प्रशासकीय स्तरावर कौतुक केले जात आहे.Conclusion:नोट- व्हिडीओ आणि 2 बाईट हे ftp वर पाठविले आहेत.
Last Updated : Jul 2, 2019, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.