ETV Bharat / state

Katraj New Tunnel : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शनिवार, बुधवारी सहा तास राहणार बंद

व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी कात्रज नवीन बोगद्यातील वाहतूक शनिवारी आणि बुधवारी रात्री ११ ते २ वाजे पर्यंत बंद राहणार आहे. कात्रज नवीन बोगद्यातून मुंबई कडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. येथील कामकाजासाठी ही वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

author img

By

Published : Mar 18, 2023, 1:57 PM IST

Katraj New Tunnel
कात्रज नवीन बोगदा

सातारा: कोल्हापूर सातारा मार्गे मुंबईकडे जाणारी वाहणे ही कात्रज नव्या बोगद्यातून जातात. हा रस्ता कायम वाहता असतो. मुंबईकडे कात्रज नवीन बोगद्यातून जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी शनिवार आणि बुधवारी रात्री ११ ते २ या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिली आहे.

या मार्गाने वाहतूक वळवणार : व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी कात्रज नवीन बोगद्यातील वाहतूक शनिवारी आणि बुधवारी रात्री ११ ते २ बंद राहणार असल्यामुळे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ते पाहता या दोन्ही दिवशी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी नवीन बोगद्यातील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग, कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे अशी माहितीही या वेळी देण्यात आली आहे.

साताऱ्याकडील वाहतुकीत बदल नाही : या बोगद्याच्या कामामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक प्रभावित होणार असली तरी मात्र मुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे. या मार्गावरील वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहितीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.

काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पूर्ववत : व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे कात्रज नवीन बोगदा सहा तास बंद करून वाहतूक वळविण्यात येणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येणार आहे.

खंडाळा बोगद्यात जबरी चोरी : खंडाळा बोगद्यात मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने भरदुपारी महिलेचे ६० हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना नेमकीच समोर आली आहे. खंडाळा तालूक्यातील मिरजेवाडी येथिल रहीवासी रोहिणी राजेंद्र महांगरे या बोगद्यातून जात असताना चोरटयाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची तक्रार त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरूव अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला असून पोलीस आधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : Lalbaug Murder Case : लालबागमधील वीणा जैन हत्येचे उत्तर प्रदेश कनेक्शन ; एकाला अटक, पाच ते सहा जणांची चौकशी

सातारा: कोल्हापूर सातारा मार्गे मुंबईकडे जाणारी वाहणे ही कात्रज नव्या बोगद्यातून जातात. हा रस्ता कायम वाहता असतो. मुंबईकडे कात्रज नवीन बोगद्यातून जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी शनिवार आणि बुधवारी रात्री ११ ते २ या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिली आहे.

या मार्गाने वाहतूक वळवणार : व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी कात्रज नवीन बोगद्यातील वाहतूक शनिवारी आणि बुधवारी रात्री ११ ते २ बंद राहणार असल्यामुळे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ते पाहता या दोन्ही दिवशी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी नवीन बोगद्यातील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग, कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे अशी माहितीही या वेळी देण्यात आली आहे.

साताऱ्याकडील वाहतुकीत बदल नाही : या बोगद्याच्या कामामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक प्रभावित होणार असली तरी मात्र मुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे. या मार्गावरील वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहितीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.

काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पूर्ववत : व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे कात्रज नवीन बोगदा सहा तास बंद करून वाहतूक वळविण्यात येणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येणार आहे.

खंडाळा बोगद्यात जबरी चोरी : खंडाळा बोगद्यात मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने भरदुपारी महिलेचे ६० हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना नेमकीच समोर आली आहे. खंडाळा तालूक्यातील मिरजेवाडी येथिल रहीवासी रोहिणी राजेंद्र महांगरे या बोगद्यातून जात असताना चोरटयाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची तक्रार त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरूव अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला असून पोलीस आधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : Lalbaug Murder Case : लालबागमधील वीणा जैन हत्येचे उत्तर प्रदेश कनेक्शन ; एकाला अटक, पाच ते सहा जणांची चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.