ETV Bharat / state

एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने वंचितांचा आधार हरपला - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने वंचितांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्याने देखील आपला सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

author img

By

Published : Apr 29, 2021, 12:47 PM IST

Eknath Gaikwad, Guardian Minister Balasaheb Patil, Former Mumbai Congress president Eknath Gaikwad
एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने वंचितांचा आधार हरपला - पालकमंत्री एकनाथ गायकवाड

कराड (सातारा) : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने वंचितांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्याने देखील आपला सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

एकनाथ गायकवाड हे मूळचे कोंढवे (ता. सातारा) येथील रहिवासी होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. धारावीसारख्या भागात त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली, त्यानंतर ते राजकारणात उतरले. तेथेही ते यशस्वी ठरले. त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

आमदार, खासदार म्हणून त्यांनी धारावीचे प्रतिनिधीत्व केले. काँग्रेसचे ते निष्ठावंत नेते होते. त्यांच्या निधनाने वंचित, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

हेही वाचा - एकनाथ गायकवाड यांना यामुळे म्हटले जात होते 'जायंट किलर'

कराड (सातारा) : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने वंचितांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्याने देखील आपला सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

एकनाथ गायकवाड हे मूळचे कोंढवे (ता. सातारा) येथील रहिवासी होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. धारावीसारख्या भागात त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली, त्यानंतर ते राजकारणात उतरले. तेथेही ते यशस्वी ठरले. त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

आमदार, खासदार म्हणून त्यांनी धारावीचे प्रतिनिधीत्व केले. काँग्रेसचे ते निष्ठावंत नेते होते. त्यांच्या निधनाने वंचित, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

हेही वाचा - एकनाथ गायकवाड यांना यामुळे म्हटले जात होते 'जायंट किलर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.