ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांनी माण विधानसभा मतदारसंघातून लढवावी निवडणूक - डॉ. पोळ

author img

By

Published : Jul 28, 2019, 1:35 PM IST

माण खटाव मधील विविध पाणी योजना मार्गी लावण्यासाठी ना.चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिहे कठापूर आणि उरमोडीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातही चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आदराची भावना अल्याचे डॉ.जे.टी पोळ यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.जे.टी पोळ

सातारा - राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. तरच या मतदारसंघातील दुष्काळ आणि दारिद्री हटविण्यासाठी मदत होईल, असे आवाहन माणदेश जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जे.टी पोळ यांनी केले आहे. दहीवडी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.जे.टी पोळ

डॉ.जे.टी पोळ पुढे म्हणाले की, माण विधानसभा मतदार संघ हा कायम दुष्काळी असून येथील जनता गेल्या ५० वर्षात शेती सोडून मिळेल त्या कामांसाठी तालुका सोडून गेली आहे. येथे स्थलांतर व दुष्काळ आजही कायम आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी माणचे पाणी प्रश्न सुटणे गरजेचे आहे. दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी व तालुक्याचे अश्रू पुसण्यासाठी ताकदवर नेत्याची गरज आहे. माण व खटावच्या पाणी योजना, एम.आय.डी.सी यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातूनच उमेदवारी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

माण खटाव मधील विविध पाणी योजना मार्गी लावण्यासाठी ना.चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिहे कठापूर आणि उरमोडीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातही चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे जनतेतूनही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी अनेकांनी फोनवरून पाठिंबा जाहीर केला असल्याचे सांगितले आहे.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माणमधील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना माझ्या प्रेमापोटी मांडल्या आहेत. मी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्या भावना समजून घेतो. नंतरच या विषयावर प्रतिक्रिया देतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ.जे टी पोळ, भाजपाचे माण विधानसभा अध्यक्ष डॉ.महादेव कापसे, प.समिती सदस्य विजय मगर, विजय धुमाळ, अशोक ओंबसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

सातारा - राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. तरच या मतदारसंघातील दुष्काळ आणि दारिद्री हटविण्यासाठी मदत होईल, असे आवाहन माणदेश जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जे.टी पोळ यांनी केले आहे. दहीवडी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.जे.टी पोळ

डॉ.जे.टी पोळ पुढे म्हणाले की, माण विधानसभा मतदार संघ हा कायम दुष्काळी असून येथील जनता गेल्या ५० वर्षात शेती सोडून मिळेल त्या कामांसाठी तालुका सोडून गेली आहे. येथे स्थलांतर व दुष्काळ आजही कायम आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी माणचे पाणी प्रश्न सुटणे गरजेचे आहे. दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी व तालुक्याचे अश्रू पुसण्यासाठी ताकदवर नेत्याची गरज आहे. माण व खटावच्या पाणी योजना, एम.आय.डी.सी यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातूनच उमेदवारी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

माण खटाव मधील विविध पाणी योजना मार्गी लावण्यासाठी ना.चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिहे कठापूर आणि उरमोडीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातही चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे जनतेतूनही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी अनेकांनी फोनवरून पाठिंबा जाहीर केला असल्याचे सांगितले आहे.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माणमधील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना माझ्या प्रेमापोटी मांडल्या आहेत. मी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्या भावना समजून घेतो. नंतरच या विषयावर प्रतिक्रिया देतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ.जे टी पोळ, भाजपाचे माण विधानसभा अध्यक्ष डॉ.महादेव कापसे, प.समिती सदस्य विजय मगर, विजय धुमाळ, अशोक ओंबसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Intro:सातारा पदवीधर मतदार संघातून पूर्वी पासूनच येथून निवडून येणारे, त्यामुळे येथील मतदारांचे परिचित असणारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी तरच माण मतदारसंघातील दुष्काळ,दारिद्रय हटवण्यासाठी मदत होईल,असे आज माणदेश जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.जे टी पोळ व डॉ.महादेव कापसे यांनी पत्रकार परिषदेत केली.Body:दहिवडी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ.जे टी पोळ, भाजपाचे माण विधानसभा अध्यक्ष डॉ.महादेव कापसे, प.समिती सदस्य विजय मगर,विजय धुमाळ, अशोक ओंबसे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, माण विधानसभा मतदार संघ हा कायम दुष्काळी असून येथील जनता गेल्या 50 वर्षात शेती सोडून मिळेल त्या कामांसाठी तालुका सोडून गेली आहे.स्थलांतर व दुष्काळ आजही कायम आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी माण चे पाणी प्रश्न सुटणे गरजेचे आहे.दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी व तालुक्याचे अश्रू पुसण्यासाठी ताकतवर नेत्याची गरज आहे.माण व खटाव च्या पाणी योजना,एम आय डी सी यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

माण खटाव मधील विविध पाणी योजना मार्गी लावण्यासाठी ना.चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे जिहे कठापूर व उरमोडीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात ही राज्याचे सक्षम नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्या विषयी आदराची भावना आहे. त्यामुळे जनतेतून ही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मिटिंगला गेल्याने अनेकांनी फोन वरून पाठिंबा जाहीर केला असल्याचे सांगितले.


(यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी
संपर्क साधला असता ते म्हणाले,माण मधील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना माझ्या प्रेमापोटी मांडल्या आहेत. मी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्या भावना समजून घेतो.नंतरच या विषयावर प्रतिक्रिया देतो.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.