ETV Bharat / state

कंपन्यांवरील 'केव्हीएएच बिलींग' आकरणी पध्दत रद्द करा - आमदार शिवेंद्रसिंहराजे

author img

By

Published : Jun 7, 2020, 10:04 PM IST

उद्योजकांची समस्या सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून राज्यातील सर्व उद्योजकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

shivendrasing raje
आमदार शिवेंद्रसिंहराजे

सातारा- महावितरण कंपनीने १ एप्रिलपासून सर्व औद्योगिक कंपन्यांवर केव्हीएएच आधारे बिलींग आकारणी सुरू केली आहे. सर्वाधिक ४३% महसूल नियमितपणे देणारे हे ग्राहक आहेत. ही सर्व वस्तुस्थिती ध्यानी घेवून महावितरणने एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ महिन्याच्या कालावधीसाठी केव्हीएएच आकारणी रद्द करावी. पूर्वीप्रमाणे केडब्ल्यूनुसार आकारणी करावी तसेच औद्योगिक ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

यासंदर्भात सातारा एमआयडीसीतील 'मास' या संस्थेने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना पत्र देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती. उद्योजकांची समस्या सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून राज्यातील सर्व उद्योजकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

जुनी केडब्ल्यूएच युनिट्स व नवीन केव्हीएएच युनिट्स यामध्ये किमान सव्वा/दीडपट ते कमाल २० पट इतक्या जादा युनिटची आकारणी ग्राहकांवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्योग बंद, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा कालवधीत या ग्राहकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे आणि बंद कालावधीत असा फटका सहन करणे हे या ग्राहकांना शक्य होणार नाही. कोरोना जागतिक महामारीमुळे अजून अंदाजे ६० ते ६५ % उद्योग बंद आहेत.

२२ मार्चला लॉकडाऊन झाल्यापासून या ग्राहकांना कोणतेही तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नव्हते आणि आजही नाही. अजूनही सर्व उद्योग सुरू होण्यासाठी किमान २-३ महिने वा अधिक काळ जाईल. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका सुरु असताना हा वीज बिलांचा अतिरिक्त फटका हा या ग्राहकांना अधिकच संकटात टाकणारा आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात नमुद केले आहे.

सातारा- महावितरण कंपनीने १ एप्रिलपासून सर्व औद्योगिक कंपन्यांवर केव्हीएएच आधारे बिलींग आकारणी सुरू केली आहे. सर्वाधिक ४३% महसूल नियमितपणे देणारे हे ग्राहक आहेत. ही सर्व वस्तुस्थिती ध्यानी घेवून महावितरणने एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ महिन्याच्या कालावधीसाठी केव्हीएएच आकारणी रद्द करावी. पूर्वीप्रमाणे केडब्ल्यूनुसार आकारणी करावी तसेच औद्योगिक ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

यासंदर्भात सातारा एमआयडीसीतील 'मास' या संस्थेने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना पत्र देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती. उद्योजकांची समस्या सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून राज्यातील सर्व उद्योजकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

जुनी केडब्ल्यूएच युनिट्स व नवीन केव्हीएएच युनिट्स यामध्ये किमान सव्वा/दीडपट ते कमाल २० पट इतक्या जादा युनिटची आकारणी ग्राहकांवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्योग बंद, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा कालवधीत या ग्राहकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे आणि बंद कालावधीत असा फटका सहन करणे हे या ग्राहकांना शक्य होणार नाही. कोरोना जागतिक महामारीमुळे अजून अंदाजे ६० ते ६५ % उद्योग बंद आहेत.

२२ मार्चला लॉकडाऊन झाल्यापासून या ग्राहकांना कोणतेही तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नव्हते आणि आजही नाही. अजूनही सर्व उद्योग सुरू होण्यासाठी किमान २-३ महिने वा अधिक काळ जाईल. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका सुरु असताना हा वीज बिलांचा अतिरिक्त फटका हा या ग्राहकांना अधिकच संकटात टाकणारा आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात नमुद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.