ETV Bharat / state

लॉकडाऊन 4.0 : सांगली जिल्ह्यात २२ तारखेपासून 'ही' दुकाने होणार सुरू; मात्र काही बाबींना परवानगी नाही - lockdown collector press conference

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने, उद्योग, सेवा बंद होती. दोन महिन्यानंतर सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील हळूहळू उद्योगधंदे सुरू करण्यात येत आहेत.

collector abhijit chaudhari
अभिजित चौधरी
author img

By

Published : May 20, 2020, 7:09 PM IST

Updated : May 20, 2020, 11:23 PM IST

सांगली - जिल्ह्यात २२ मे पासून जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. जिल्हाअंतर्गत बस सेवा, सर्व दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल, मॉल्स, सार्वजनिक गर्दीचे ठिकाण हे बंदच राहणार आहेत. तसेच ज्यांच्याकडून कोरोनाचे नियम पाळले जाणार नाहीत अशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले. ते चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

सांगली जिल्ह्यात २२ तारखेपासून सर्व काही होणार सुरू; मात्र काही बाबींना परवानगी नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने, उद्योग, सेवा बंद होती. दोन महिन्यानंतर सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील हळूहळू उद्योगधंदे सुरू करण्यात येत आहेत. आता यामध्ये आणखी शिथिलता राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे नियमावली आज जाहीर केली.

२२ मे पासून सांगली जिल्ह्यात सर्व दुकाने सुरू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महापालिका क्षेत्रात एक दिवसाआड अशा पार्श्वभूमीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता २२ तारखेपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ सात वाजेपर्यंत सर्व दुकाने नियमित उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा अंतर्गत बस सेवाही सुरू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ५० टक्के प्रवाशी वाहतूक करता येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पान टपरी सुद्धा उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी केवळ विक्री करता येणार आहे. त्याठिकाणी पान, मावा, तंबाखू, खाऊन थुंकताना आढळल्यास संबंधित व्यक्ती आणि दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

अंत्यविधीसाठी आता पन्नास लोकांना एकत्र येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हॉटेल सार्वजनिक, सार्वजनिक ठिकाण, चित्रपट गृहे यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. ३१ मे नंतर त्यांच्या बाबतीत राज्य आणि केंद्र सरकारकडून निर्देश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

२२ तारखेपासून सुरू होणारे सर्व दुकाने आणि उद्योग यांना सशर्त अशी परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्स आणि कोरोनाच्या बाबतीत घेण्यात येणारी खबरदारी याचे पालन संबंधित व्यक्ती अथवा दुकानदार यांनी करायची आहे. त्यामध्ये कोणतीही कसूर आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली - जिल्ह्यात २२ मे पासून जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. जिल्हाअंतर्गत बस सेवा, सर्व दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल, मॉल्स, सार्वजनिक गर्दीचे ठिकाण हे बंदच राहणार आहेत. तसेच ज्यांच्याकडून कोरोनाचे नियम पाळले जाणार नाहीत अशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले. ते चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

सांगली जिल्ह्यात २२ तारखेपासून सर्व काही होणार सुरू; मात्र काही बाबींना परवानगी नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने, उद्योग, सेवा बंद होती. दोन महिन्यानंतर सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील हळूहळू उद्योगधंदे सुरू करण्यात येत आहेत. आता यामध्ये आणखी शिथिलता राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे नियमावली आज जाहीर केली.

२२ मे पासून सांगली जिल्ह्यात सर्व दुकाने सुरू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महापालिका क्षेत्रात एक दिवसाआड अशा पार्श्वभूमीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता २२ तारखेपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ सात वाजेपर्यंत सर्व दुकाने नियमित उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा अंतर्गत बस सेवाही सुरू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ५० टक्के प्रवाशी वाहतूक करता येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पान टपरी सुद्धा उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी केवळ विक्री करता येणार आहे. त्याठिकाणी पान, मावा, तंबाखू, खाऊन थुंकताना आढळल्यास संबंधित व्यक्ती आणि दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

अंत्यविधीसाठी आता पन्नास लोकांना एकत्र येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हॉटेल सार्वजनिक, सार्वजनिक ठिकाण, चित्रपट गृहे यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. ३१ मे नंतर त्यांच्या बाबतीत राज्य आणि केंद्र सरकारकडून निर्देश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

२२ तारखेपासून सुरू होणारे सर्व दुकाने आणि उद्योग यांना सशर्त अशी परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्स आणि कोरोनाच्या बाबतीत घेण्यात येणारी खबरदारी याचे पालन संबंधित व्यक्ती अथवा दुकानदार यांनी करायची आहे. त्यामध्ये कोणतीही कसूर आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Last Updated : May 20, 2020, 11:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.