ETV Bharat / state

2 दिवसांत कृष्णेची पाणी पातळी साडेतीन फुटांनी  उतरली; पुन्हा युध्द पातळीवर बचावकार्य सुरू

author img

By

Published : Aug 11, 2019, 9:57 AM IST

Updated : Aug 11, 2019, 11:04 AM IST

सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागला आहे. शनिवारपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पातळी 54.5 वर पोहचली होती.

कृष्णेची पाणी पातळी ओसल्याने  मदतकार्य वेगाने सुरू आहे.

सांगली- सहा दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडलेल्या कृष्णा काठची पाणी पातळी 2 दिवसांपासून हळूहळू उतरू लागली आहे. सांगलीमध्ये आज सकाळी 54.05 फुटांच्या खाली आता पाणीपातळी पोहोचलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला शहरातील जवळपास अनेक भागातील पाणी पातळी १० ते २० फुटाने ओसरली आहे. तर अद्यापही पुरात नागरिक अडकले असून आता पुन्हा युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झालेले आहे.

2 दिवसांत कृष्णेची पाणी पातळी साडेतीन फुटांनी उतरली आहे.

सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागला आहे. शनिवारपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पातळी 54.5 वर पोहचली होती. सांगलीच्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी जवळपास साडेतीन फुटांहून अधिक उतरली आहे. दुसऱ्या बाजूला शहरात शिरलेले पाणी 10 ते 20 फुटाने ओसरले आहे.

महापूर हळूहळू ओसरत असला तरी दुसऱ्या बाजूला या महापुराच्या विळख्यात अद्यापही हजारो नागरिक अडकून आहेत. सांगली शहर, हरिपूर, सांगली वाडी, भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आदी नदीकाठच्या गावात नागरिक अडकून आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. तर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुद्धा पुरवण्यात येत आहेत.

आतापर्यंत जवळपास 1 लाख 70 हजारहून अधिक नागरिक व 45 हजारहून अधिक जनावरांचे प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आलेले आहे. तर पूर ओसरू लागल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर पाणी पातळी मध्ये हळूहळू घटत असल्याने शहरातला पुराचा विळखा थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे आज संध्याकाळपर्यंत आणखी कमी होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सांगली- सहा दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडलेल्या कृष्णा काठची पाणी पातळी 2 दिवसांपासून हळूहळू उतरू लागली आहे. सांगलीमध्ये आज सकाळी 54.05 फुटांच्या खाली आता पाणीपातळी पोहोचलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला शहरातील जवळपास अनेक भागातील पाणी पातळी १० ते २० फुटाने ओसरली आहे. तर अद्यापही पुरात नागरिक अडकले असून आता पुन्हा युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झालेले आहे.

2 दिवसांत कृष्णेची पाणी पातळी साडेतीन फुटांनी उतरली आहे.

सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागला आहे. शनिवारपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पातळी 54.5 वर पोहचली होती. सांगलीच्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी जवळपास साडेतीन फुटांहून अधिक उतरली आहे. दुसऱ्या बाजूला शहरात शिरलेले पाणी 10 ते 20 फुटाने ओसरले आहे.

महापूर हळूहळू ओसरत असला तरी दुसऱ्या बाजूला या महापुराच्या विळख्यात अद्यापही हजारो नागरिक अडकून आहेत. सांगली शहर, हरिपूर, सांगली वाडी, भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आदी नदीकाठच्या गावात नागरिक अडकून आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. तर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुद्धा पुरवण्यात येत आहेत.

आतापर्यंत जवळपास 1 लाख 70 हजारहून अधिक नागरिक व 45 हजारहून अधिक जनावरांचे प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आलेले आहे. तर पूर ओसरू लागल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर पाणी पातळी मध्ये हळूहळू घटत असल्याने शहरातला पुराचा विळखा थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे आज संध्याकाळपर्यंत आणखी कमी होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.



फीड सेंड whatsp


स्लग - 2 दिवसात कृष्णेची पाणी पातळी साडे तीन फुटांनी 
उतरली, हळूहळू पाणी लागले उतरू, पुन्हा युध्द पातळीवर रेस्क्यू सुरू.

अँकर -सहा दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडलेल्या कृष्णा काठची पाणी पातळी  2 
दिवसांपासून हळूहळू उतरू लागला आहे. सांगली मध्ये आज सकाळी 54.05 फुटांच्या खाली आता पाणीपातळी पोहोचलेली आहे.तर दुसऱ्या बाजूला शहरातल्या पाणी जवळपास अनेक भागातील १० ते २० फुटाने पाणी ओसरली आहे. तर अद्यापही पुरात नागरिक 
अडकले असून आता पुन्हा युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेले आहे.


सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागलाय ,कालपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे, आज सकाळी 8 पर्यंत पाणी पातळी 54.5 वर पोचली होती.जवळ साडे तीन फुटांहुन अधिक पाण्याची पातळी सांगलीच्या कृष्णा नदीतील उतरली आहे .दुसऱ्या बाजूला शहरात शिरलेले पाणी 10 ते 20 फुटाने ओसरले आहे.महापूर हळू ओसरतोय तर दुसऱ्या बाजूला या महापुराच्या विळख्यात अद्याप हजारो नागरिक सांगली शहर, हरिपूर ,सांगली वाडी भिलवडी अंकलखोप ,कसबे डिग्रज मौजे डिग्रज आदी नदी काठच्या गावात अडकून आहेत,आणि या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम पुन्हा सकाळपासून नेव्ही ,आर्मी,एनडीआरएफ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेला आहे.तर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुद्धा पुरवण्यात येत आहेत ,आतापर्यंत जवळपास 1 लाख 70 हजारहुन अधिक नागरीक व 45 हजार हुन अधिक जनावरांचे  अनेक ठिकाणी प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आलेले आहे.तर पुर ओसरू लागल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .तर पाणी पातळी मध्ये हळूहळू घटत असल्याने शहरातला पुराचा विळखा थोड्याफार प्रमाणात  कमी झाला आहे .आज संध्याकाळपर्यंत आणखी कमी होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Last Updated : Aug 11, 2019, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.