ETV Bharat / state

नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची काळजी ही प्राथमिकता- मंत्री विश्वजीत कदम

जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या महापूराच्या पार्श्‍वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. प्राथमिक स्तरावर नागरिकांचे स्थलांतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री कदम यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jul 24, 2021, 9:12 PM IST

मंत्री विश्वजित कदम
मंत्री विश्वजित कदम

सांगली - जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या महापूराच्या पार्श्‍वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. प्राथमिक स्तरावर नागरिकांचे स्थलांतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री कदम यांनी दिली आहे. तसेच पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर जे काही नुकसान आहे, त्याबाबत मदत करण्यासाठी शासन नक्कीच प्रयत्नशील असेल असेही विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची काळजी ही प्राथमिकता- मंत्री विश्वजीत कदम

नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची प्रथम काळजी -
सांगली शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. शहरातल्या टिळक चौक, मारुती चौक, शिवाजी मंडळी, तसेच पुर पट्ट्यात पुराचे शिरले आहे. या पूर परिस्थितीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली आहे. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांच्या स्थलांतर बाबतीत माहिती घेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करण्यात येत असलेल्या नागरिकांची तपासणी आणि योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना मंत्री विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार या महापूर परिस्थितीशी सामना करताना नागरिकांच्या पाठीशी आहे आणि पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शेती असेल किंवा अन्य नुकसान असेल त्याबाबत योग्य ती मदत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल, असे मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

2019 मध्ये काय केले त्याचे फळ मिळाले आहे -
राज्याच्या महाड, सातारा येथील दुर्घटना असो किंवा महापूर या घटनांवरून विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपावर बोलताना, मंत्री कदम म्हणाले, विरोधकांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, राज्यात 2019 मध्ये पूर आल्यानंतर तत्कालीन युती सरकार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी काय करत होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि त्याचे फळ त्यांना विधानसभा निवडणूकीमध्ये सोसावे लागले. पण सध्याची परिस्थिती ही राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज नागरिकांना धीर आणि मदत करण्याची वेळ आहे. राज्यातील आघाडी सरकार नागरिकांच्या पाठिशी आहे, असं मत मंत्री कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - चिमुकलीला 200 उठाबशांची अमानुष शिक्षा; विद्यार्थीनीची तब्येत बिघडली, शिक्षिकेवर गुन्हा दाखल

सांगली - जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या महापूराच्या पार्श्‍वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. प्राथमिक स्तरावर नागरिकांचे स्थलांतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री कदम यांनी दिली आहे. तसेच पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर जे काही नुकसान आहे, त्याबाबत मदत करण्यासाठी शासन नक्कीच प्रयत्नशील असेल असेही विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची काळजी ही प्राथमिकता- मंत्री विश्वजीत कदम

नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची प्रथम काळजी -
सांगली शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. शहरातल्या टिळक चौक, मारुती चौक, शिवाजी मंडळी, तसेच पुर पट्ट्यात पुराचे शिरले आहे. या पूर परिस्थितीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली आहे. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांच्या स्थलांतर बाबतीत माहिती घेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करण्यात येत असलेल्या नागरिकांची तपासणी आणि योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना मंत्री विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार या महापूर परिस्थितीशी सामना करताना नागरिकांच्या पाठीशी आहे आणि पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शेती असेल किंवा अन्य नुकसान असेल त्याबाबत योग्य ती मदत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल, असे मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

2019 मध्ये काय केले त्याचे फळ मिळाले आहे -
राज्याच्या महाड, सातारा येथील दुर्घटना असो किंवा महापूर या घटनांवरून विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपावर बोलताना, मंत्री कदम म्हणाले, विरोधकांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, राज्यात 2019 मध्ये पूर आल्यानंतर तत्कालीन युती सरकार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी काय करत होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि त्याचे फळ त्यांना विधानसभा निवडणूकीमध्ये सोसावे लागले. पण सध्याची परिस्थिती ही राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज नागरिकांना धीर आणि मदत करण्याची वेळ आहे. राज्यातील आघाडी सरकार नागरिकांच्या पाठिशी आहे, असं मत मंत्री कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - चिमुकलीला 200 उठाबशांची अमानुष शिक्षा; विद्यार्थीनीची तब्येत बिघडली, शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.