ETV Bharat / state

परतीच्या पावसाने दुष्काळी भागाला झोडपले,अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर

author img

By

Published : Oct 6, 2019, 3:23 PM IST

जिल्ह्यातील दुष्काळी भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.

परतीच्या पाऊसाने दुष्काळी भागाला झोडपले,अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर

सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.

परतीच्या पाऊसाने दुष्काळी भागाला झोडपले,अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर


गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा सांगली जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शनिवारी पावसाने जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तर दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनंतर पूर आला आहे.

खानापूर तालुक्यातील काही भागातून वाहणारी ही अग्रणी नदी पुढे तासगाव तालुक्यातून वाहते. खानापूर भागाबरोबरच तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी तुडूंब भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याची वेळ आली आहे.

अग्रणी पात्रातील सावळज- बिरणवाडी व मळणगाव - योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय गावांना जोडणारे ओढे आणि छोटे पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत. शेतातील नाले-तुडूंब भरून वाहत असून परतीच्या पावसाने दुष्काळी भागातील चित्र पालटले आहे.

सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.

परतीच्या पाऊसाने दुष्काळी भागाला झोडपले,अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर


गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा सांगली जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शनिवारी पावसाने जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तर दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनंतर पूर आला आहे.

खानापूर तालुक्यातील काही भागातून वाहणारी ही अग्रणी नदी पुढे तासगाव तालुक्यातून वाहते. खानापूर भागाबरोबरच तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी तुडूंब भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याची वेळ आली आहे.

अग्रणी पात्रातील सावळज- बिरणवाडी व मळणगाव - योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय गावांना जोडणारे ओढे आणि छोटे पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत. शेतातील नाले-तुडूंब भरून वाहत असून परतीच्या पावसाने दुष्काळी भागातील चित्र पालटले आहे.

Intro:
File name - mh_sng_01_dushkali_paus_vis_01_7203751 - mh_sng_01_dushkali_paus_vis_04_7203751

स्लग - परतीच्या पाऊसाने दुष्काळी भागाला काढले झोडपून,अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर,ओढे,नाले तुडुंब भरून वाहू लागले..

अँकर - परतीच्या पाऊसाने सांगलीच्या दुष्काळी भागाला गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढले आहे.पुर्वेकडील दुष्काळी टापूत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडला आहे.यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब भरुन वाहू लागले आहेत.Body:गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पाऊसाचा सांगली जिल्ह्यातील धुमाकूळ सुरू आहे.शनिवारी या पाऊसाने जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याला अक्षरशा झोडपून काढले आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे.या पावसामुळे ओढे नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत.तर दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनी पूर आला आहे.खानापूर तालुक्यातील काही भागातून वाहणारी ही अग्रणी नदी पुढे तासगाव तालुक्यात वाहते. खानापूर भागाबरोबरच तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी तुडूंब भरुन वाहू लागली आहे.काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याची वेळ आली आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सलग चार-पाच पाऊस चालूच होता.दोन दिवसांपूर्वी खानापूर भागात देखील असाच जोराचा पाऊस पडला होता.
मुसळधार पावसामुळे अग्रणी पात्रातील सावळज- बिरणवाडी व मळणगाव - योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. याशिवाय गावांना जोडणारे ओढा पात्रावरील छोटे पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत.शेतातील नाले तुडूंब भरुन वाहत आहेत.यामुळे परतीच्या पावसाने दुष्काळी भागातील चित्र पालटून गेले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.