ETV Bharat / state

राजापुरात ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, दोन ठार

author img

By

Published : Jan 29, 2020, 7:42 AM IST

मंगळवारी एका दुकाचीवर तिघे तरुण राजापूर येथून सौंदळ येथे जात होते. वाटेतच एका भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. ट्रक चालकाने ट्रकसह पलायन केले.

घटनास्थळ
घटनास्थळ

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.


फैय्याज रायबागकर (वय 23 वर्षे), समीर नाईक (वय 28 वर्षे, दोघे रा. मुस्लिमवाडी, सौंदळ), अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. तर आमान टोले (वय 18 वर्षे) हा गंभीर जखमी झाला असून त्याला कणकवली येथे उपचारासाठी हलवले आहे. हा अपघातात मंगळवारी (दि. 28 जानेवारी) सायंकाळी सहा वाजता झाला. हे युवक राजापूर येथून सौंदळकडे जात होते. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले.

हेही वाचा - 'कोरेगाव-भीमाप्रकरणी फडणवीस जर निर्दोष आहेत तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे'

तिन्ही तरुण हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून राजापूरकडून सौंदळकडे जात होते. राजापूर शिळ, चिखलगाव-सौंदळ मार्गावर चिखलगाव धरणाच्या काही अंतरावर वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समीर नाईक हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी फैयाज व आमान यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील फैयाज याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आमान याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

या प्रकरणातील अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालकाने ट्रकसह पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे सौंदळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - रत्नागिरी : 'सीएए' विरोधातील मोर्चात वृद्धाचा मृत्यू, लांजा येथील घटना

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.


फैय्याज रायबागकर (वय 23 वर्षे), समीर नाईक (वय 28 वर्षे, दोघे रा. मुस्लिमवाडी, सौंदळ), अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. तर आमान टोले (वय 18 वर्षे) हा गंभीर जखमी झाला असून त्याला कणकवली येथे उपचारासाठी हलवले आहे. हा अपघातात मंगळवारी (दि. 28 जानेवारी) सायंकाळी सहा वाजता झाला. हे युवक राजापूर येथून सौंदळकडे जात होते. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले.

हेही वाचा - 'कोरेगाव-भीमाप्रकरणी फडणवीस जर निर्दोष आहेत तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे'

तिन्ही तरुण हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून राजापूरकडून सौंदळकडे जात होते. राजापूर शिळ, चिखलगाव-सौंदळ मार्गावर चिखलगाव धरणाच्या काही अंतरावर वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समीर नाईक हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी फैयाज व आमान यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील फैयाज याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आमान याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

या प्रकरणातील अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालकाने ट्रकसह पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे सौंदळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - रत्नागिरी : 'सीएए' विरोधातील मोर्चात वृद्धाचा मृत्यू, लांजा येथील घटना

Intro:भरधाव ट्रकच्या धडककेत दुचाकीवरील दोन युवक ठार, एक गंभीर

राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावरील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक मृत्यूमुखी पडले. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे..या अपघातात फैय्याज रायबागकर ( 23 वर्षे ) ,समीर नाईक( 28 वर्षे ) राहणार सौंदळ मुस्लिमवाडी हे दोघे युवक ठार झाले.. तर त्यांचा साथीदार आमान टोले ( 18 वर्षे ) हा गंभीर जखमी झाला असून त्याला कणकवली येथे उपचारासाठी हलवले आहे.., हा अपघातात सायंकाळी सहा वाजता झाला.हे युवक राजापूर येथून सौंदळ कडे येत हाेते.. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे.
हे तीन्ही तरूण हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून राजापूरकडून सौंदळकडे जात होते. राजापूर शिळ, गोठणेदोनिवडे चिखलगांव- सौदळ मार्गावर चिखलगाव धरणाच्या काही अंतरावर वळणावर समोरून भरधाव वेगात येणाºया ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समिर नाईक हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी फैयाज व आमान यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करत असतानाच यातील फैयाज याचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला. तर आमान याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.
या प्रकरणातील अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालक हा ट्रकसह फरार झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. पोलीस देखील दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. सौेदळ मुस्लीमवाडीतील या दोन तरूणांच्या या अपघाती मृत्युने सौेंदळ गावावर शोककळा पसरली आहे.
Body:भरधाव ट्रकच्या धडककेत दुचाकीवरील दोन युवक ठार, एक गंभीर

राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावरील घटनाConclusion:भरधाव ट्रकच्या धडककेत दुचाकीवरील दोन युवक ठार, एक गंभीर

राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावरील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.