ETV Bharat / state

Aditya Thackeray On Nanar Project : लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Mar 29, 2022, 11:33 AM IST

Updated : Mar 29, 2022, 2:32 PM IST

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आजपासून मंगळवार (दि. 29 मार्च) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. (Refinery project) त्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (Nanar refinery project) दरम्यान, लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ, लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही असेही आदित्य म्हणाले आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

रत्नागिरी - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज मंगळवार (दि. 29 मार्च) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. दरम्यान, शिवसेना रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लोकांशी चर्चा करताना

काय म्हणाले आदित्य ठाकरे? - नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत असल्याने हा प्रकल्प लादणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणताच दुसरीकडे आणला जाण्याची दाट शक्यता आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर नागरिकांना विश्वासात आम्ही घेऊन पुढे जाऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे रिफायनरी प्रकल्पाबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना सकारात्मक - या प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे असही आदित्य म्हणाले आहेत. रिफायनरीमुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊ असही ते म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा सूर हा रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

होकार असेल तर पुढे जाऊ - लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ, लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही असेही आदित्य म्हणाले आहेत. कोणताही मोठा प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांशी चर्चा होणे महत्त्वाचे असते. त्यांना समजवून सांगणे गरजेचे असते की नेमके काय आहे. त्यांचा होकार असेल तर पुढे जाऊ असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या - आदित्य यांना राजापूर रेस्टहाऊस येथे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने रिफायनरी समर्थक थांबले होते. या समर्थकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांना प्रतिकात्मक गुढी देऊन सांगण्यात आले की प्रकल्पाची गुढी लवकर उभारा, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या. महिलांनी देखील रिफायनरी राजापूरमध्येच करा असे साकडे आदित्य ठाकरे यांना घातले.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस : 29 मार्च

सकाळी 9 वाजता : लांजा, रत्नागिरीकडे प्रयाण
सकाळी 10.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : पाली, रत्नागिरीकडे रवाना
दुपारी 12 वाजता : पाली, राखीव
दुपारी 1.30 वाजता : गणपतीपुळेकडे प्रयाण
दुपारी 2.15 वाजता : श्रींचे दर्शन
दुपारी 2.30 वाजता : भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 3.30 वाजता : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ बोट क्लबची पाहणी
दुपारी 3.45 वाजता : जयगड जेट्टीकडे प्रयाण
दुपारी 4.10 वाजता : जयगड जेट्टी इथे आगमन, फेरी बोटीने तवसाळकडे प्रयाण
दुपारी 4.40 वाजता : गुहाकरडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : वेळणेश्वर इथे भूमिपूजन आणि मेळाव्याला उपस्थिती
रात्री : गुहागरमध्ये मुक्काम

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा तिसरा दिवस : 30 मार्च

सकाळी 8.15 वाजता : सावर्डेकडे प्रयाण
सकाळी 9.05 वाजता : चित्रकला महाविद्यालयाला भेट आणि स्वर्गीय निकम यांच्या समाधीस्थळाला भेट
सकाळी 9.20 वाजता : पेठमाप, चिपळूणकडे प्रयाण
सकाळी 9.30 वाजता : उपक्रमाची पाहणी, लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
सकाळी 10 वाजता : दापोलीकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : महाड, रायगडकडे प्रयाण
दुपारी 2 वाजता : महाडमध्ये आगमन
दुपारी 2.40 वाजता : लोणेरे, माणगावकडे प्रयाण
दुपारी 3 वाजता : भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 4.15 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
संध्याकाळी 5.30 : मुंबईकडे प्रयाण
रात्री 8.30 वाजता : मुंबईत आगमन

हेही वाचा - पुतीन सत्तेत राहण्यास पात्र नाही, बायडेन यांचा घणाघात; तर इस्तंबूलमध्ये रशिया-युक्रेनमध्ये चर्चा

रत्नागिरी - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज मंगळवार (दि. 29 मार्च) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. दरम्यान, शिवसेना रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लोकांशी चर्चा करताना

काय म्हणाले आदित्य ठाकरे? - नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत असल्याने हा प्रकल्प लादणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणताच दुसरीकडे आणला जाण्याची दाट शक्यता आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर नागरिकांना विश्वासात आम्ही घेऊन पुढे जाऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे रिफायनरी प्रकल्पाबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना सकारात्मक - या प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे असही आदित्य म्हणाले आहेत. रिफायनरीमुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊ असही ते म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा सूर हा रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

होकार असेल तर पुढे जाऊ - लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ, लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही असेही आदित्य म्हणाले आहेत. कोणताही मोठा प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांशी चर्चा होणे महत्त्वाचे असते. त्यांना समजवून सांगणे गरजेचे असते की नेमके काय आहे. त्यांचा होकार असेल तर पुढे जाऊ असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या - आदित्य यांना राजापूर रेस्टहाऊस येथे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने रिफायनरी समर्थक थांबले होते. या समर्थकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांना प्रतिकात्मक गुढी देऊन सांगण्यात आले की प्रकल्पाची गुढी लवकर उभारा, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या. महिलांनी देखील रिफायनरी राजापूरमध्येच करा असे साकडे आदित्य ठाकरे यांना घातले.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस : 29 मार्च

सकाळी 9 वाजता : लांजा, रत्नागिरीकडे प्रयाण
सकाळी 10.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : पाली, रत्नागिरीकडे रवाना
दुपारी 12 वाजता : पाली, राखीव
दुपारी 1.30 वाजता : गणपतीपुळेकडे प्रयाण
दुपारी 2.15 वाजता : श्रींचे दर्शन
दुपारी 2.30 वाजता : भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 3.30 वाजता : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ बोट क्लबची पाहणी
दुपारी 3.45 वाजता : जयगड जेट्टीकडे प्रयाण
दुपारी 4.10 वाजता : जयगड जेट्टी इथे आगमन, फेरी बोटीने तवसाळकडे प्रयाण
दुपारी 4.40 वाजता : गुहाकरडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : वेळणेश्वर इथे भूमिपूजन आणि मेळाव्याला उपस्थिती
रात्री : गुहागरमध्ये मुक्काम

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा तिसरा दिवस : 30 मार्च

सकाळी 8.15 वाजता : सावर्डेकडे प्रयाण
सकाळी 9.05 वाजता : चित्रकला महाविद्यालयाला भेट आणि स्वर्गीय निकम यांच्या समाधीस्थळाला भेट
सकाळी 9.20 वाजता : पेठमाप, चिपळूणकडे प्रयाण
सकाळी 9.30 वाजता : उपक्रमाची पाहणी, लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
सकाळी 10 वाजता : दापोलीकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : महाड, रायगडकडे प्रयाण
दुपारी 2 वाजता : महाडमध्ये आगमन
दुपारी 2.40 वाजता : लोणेरे, माणगावकडे प्रयाण
दुपारी 3 वाजता : भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 4.15 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
संध्याकाळी 5.30 : मुंबईकडे प्रयाण
रात्री 8.30 वाजता : मुंबईत आगमन

हेही वाचा - पुतीन सत्तेत राहण्यास पात्र नाही, बायडेन यांचा घणाघात; तर इस्तंबूलमध्ये रशिया-युक्रेनमध्ये चर्चा

Last Updated : Mar 29, 2022, 2:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.