ETV Bharat / state

MLA Bhaskar Jadhav questions PM : भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले-भास्कर जाधव

author img

By

Published : Jul 12, 2022, 7:05 AM IST

Updated : Jul 12, 2022, 7:49 AM IST

शिवसेनेचा सोमवारी रत्नागिरीतील चिपळूणमध्ये निर्धार मेळावा ( Shiv Sena Nirdhar Melava in Chiplun ) झाला. त्यावेळी आमदार प्रवक्ते भास्कर जाधव यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका ( MLA Bhaskar Jadhav Strongly Criticized BJP ) केली, तर बंडखोर आमदारांचाही समाचार घेतला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य ( Prime Minister Modi is also a Target ) केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंप्रमाणे ( Uddhav Thackeray ) ते संसदेत स्वत:चे हिंदुत्व स्पष्ट करतील का? असा सवाल केला.

MLA Bhaskar Jadhav
आमदार भास्कर जाधव



रत्नागिरी : चिपळूणमध्ये सोमवारी शिवसेनेचा निर्धार मेळावा ( Shiv Sena Nirdhar Melava in Chiplun ) झाला. यावेळी शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांचा आपल्या आक्रमक शैलीत समाचार घेतला. या मेळाव्याला माजी खासदार अनंत गीतेंसह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भास्कर जाधव यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका ( MLA Bhaskar Jadhav Strongly Criticized BJP ) केली. मुख्यमंत्री असताना विधानसभेत जाहीरपणे मी हिंदुत्ववादी असल्याचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जाहीर सांगितले होते.

पंतप्रधानांना सवाल : आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींना सवाल ( Prime Minister Modi is also a Target ) केला की, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत मी हिंदुत्ववादी आहे, असे म्हटले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी हिंमत संसदेमध्ये दाखवतील का? ज्या शिवसेनेला भाजप, महाराष्ट्रात तुम्ही मोठे भाऊ आणि केंद्रात शिवसेना लहान भाऊ, असे म्हणायची, त्याच भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर एकमेकांना पेढे भरवले, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

आमदार भास्कर जाधव

भाजपने खेळला रडीचा डाव : अनेकदा सरकार पडेल अशा प्रतिक्रिया आल्या पण सरकार पडले नाही, ईडीच्या कारवाया झाल्या तरीही सरकार पडले नाही, मंत्री जेलमध्ये टाकले तरी सरकार पडले नाही, त्यानंतर भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले, असे जाधव यावेळी म्हणाले. बंडामध्ये आमचा काही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या भाजपने प्रत्यक्ष बंडखोरांना कशी मदत केली याचा पाढा स्वतः एकनाथ शिंदेंनी वाचल्याच्या दाखला देत भास्कर जाधव यांनी भाजप व बंडखोरांवर टीका केली.

निर्धार मेळाव्यात अनेकांची भाषणे : तत्पूर्वी काल निर्धार मेळाव्यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली. खासदार विनायक राऊत यांनीसुद्धा भाजपवर टीका करताना, बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. त्यानी आमदार उदय सामंत यांचा समाचार घेताना म्हटले की, उदय सामंत यांना पक्षाने विविध पदं दिली, पण त्यांनी गद्दारी केली. उदय सामंत यांनी मातोश्रीच्या अन्नाची जाण ठेवली नाही, असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले. रत्नागिरी तालुक्याचा शिवसेनेचा भव्य मेळावा शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार व उपनेते राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रदीप बोरकर, उदय बने व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नाही - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सासुरवास कमी नव्हता. गेल्या 2 वर्ष मीही हे भोगत होतो. सामंत आता तिकडे गेल्याने येथील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच तणावमुक्त झाले आहेत. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा, असे सांगतानाच गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नसल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

हेही वाचा : Raosaheb Danve : शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा



रत्नागिरी : चिपळूणमध्ये सोमवारी शिवसेनेचा निर्धार मेळावा ( Shiv Sena Nirdhar Melava in Chiplun ) झाला. यावेळी शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांचा आपल्या आक्रमक शैलीत समाचार घेतला. या मेळाव्याला माजी खासदार अनंत गीतेंसह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भास्कर जाधव यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका ( MLA Bhaskar Jadhav Strongly Criticized BJP ) केली. मुख्यमंत्री असताना विधानसभेत जाहीरपणे मी हिंदुत्ववादी असल्याचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जाहीर सांगितले होते.

पंतप्रधानांना सवाल : आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींना सवाल ( Prime Minister Modi is also a Target ) केला की, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत मी हिंदुत्ववादी आहे, असे म्हटले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी हिंमत संसदेमध्ये दाखवतील का? ज्या शिवसेनेला भाजप, महाराष्ट्रात तुम्ही मोठे भाऊ आणि केंद्रात शिवसेना लहान भाऊ, असे म्हणायची, त्याच भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर एकमेकांना पेढे भरवले, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

आमदार भास्कर जाधव

भाजपने खेळला रडीचा डाव : अनेकदा सरकार पडेल अशा प्रतिक्रिया आल्या पण सरकार पडले नाही, ईडीच्या कारवाया झाल्या तरीही सरकार पडले नाही, मंत्री जेलमध्ये टाकले तरी सरकार पडले नाही, त्यानंतर भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले, असे जाधव यावेळी म्हणाले. बंडामध्ये आमचा काही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या भाजपने प्रत्यक्ष बंडखोरांना कशी मदत केली याचा पाढा स्वतः एकनाथ शिंदेंनी वाचल्याच्या दाखला देत भास्कर जाधव यांनी भाजप व बंडखोरांवर टीका केली.

निर्धार मेळाव्यात अनेकांची भाषणे : तत्पूर्वी काल निर्धार मेळाव्यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली. खासदार विनायक राऊत यांनीसुद्धा भाजपवर टीका करताना, बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. त्यानी आमदार उदय सामंत यांचा समाचार घेताना म्हटले की, उदय सामंत यांना पक्षाने विविध पदं दिली, पण त्यांनी गद्दारी केली. उदय सामंत यांनी मातोश्रीच्या अन्नाची जाण ठेवली नाही, असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले. रत्नागिरी तालुक्याचा शिवसेनेचा भव्य मेळावा शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार व उपनेते राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रदीप बोरकर, उदय बने व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नाही - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सासुरवास कमी नव्हता. गेल्या 2 वर्ष मीही हे भोगत होतो. सामंत आता तिकडे गेल्याने येथील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच तणावमुक्त झाले आहेत. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा, असे सांगतानाच गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नसल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

हेही वाचा : Raosaheb Danve : शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा

Last Updated : Jul 12, 2022, 7:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.