ETV Bharat / state

गणेशोत्सवात अखंड वीज सुरू ठेवावी; उदय सामंत यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना

author img

By

Published : Aug 14, 2020, 5:52 PM IST

पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या कोकण परिमंडळाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सामंत यांच्यासोबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Uday Samant
उदय सामंत

रत्नागिरी - सरासरी पद्धतीने वीजबिले न देता मीटर रिडींगप्रमाणेच बिले द्यावीत आणि गणेशोत्सवात अखंड वीज सुरू ठेवावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिल्या. सामंत यांनी रत्नागिरीत महावितरणच्या कोकण परिमंडळाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सामंत यांच्यासोबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या कोकण परिमंडळाची आढावा बैठक घेतली

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये मीटर रिडींग बंद ठेवण्यात आले होते. जून महिन्यात पुन्हा रिडिंग घेणे सुरू करण्यात आल्यानंतर ग्राहकांना तीन महिन्यांची एकत्रित वीजबिले पाठवण्यात आली. मात्र, नेहमी येणार्‍या बिलांपेक्षा ही बिले अधिक रकमेची असल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला. महावितरणचे कर्मचारीही व्यवस्थित उत्तरे देत नसल्याच्या काही तक्रारी आल्या. याचे पडसाद आज घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महावितरणच्या कर्मचाऱयांना विचारणा केली. यापुढे सर्वच बिले रिडींगप्रमाणे काढण्याच्या सूचना सामंत यांनी अधिकाऱयांना केल्या.

वाढीव वीजबिलाबाबत असणाऱया शंकांचे निरसन करण्यासाठी रत्नागिरीत 45 आणि सिंधुदुर्गात 25 अशी 70 तक्रार निवारण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामार्फत रत्नागिरीतील 2 हजार 590 तर सिंधुदुर्गातील 1 हजार 432 वीजग्राहकांच्या शंकांचे निसरण करण्यात आले, असल्याची माहिती अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील किनारी भागात भूमीगत वीज वाहिन्यांचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच शहरी भागातही भूमीगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यासाठी 670 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे सायनेकर यांनी सांगितले. याबाबत आयुक्‍त असीम गुप्ता यांच्याशी बोलणे झाले असून, टप्प्याटप्याने हा निधी उपलब्ध होईल, असे सामंत यांनी सांगितले.

जून महिन्यात कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले. मात्र, महावितरणकडून कंत्राट घेणाऱया एका ठेकेदाराने कामाचे वाढीव दर सांगत आडमुठेपणाचे धोरण अवलंबले. या ठेकेदारावर कारवाई करून त्याची बिले अदा न करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी केल्या.

रत्नागिरी - सरासरी पद्धतीने वीजबिले न देता मीटर रिडींगप्रमाणेच बिले द्यावीत आणि गणेशोत्सवात अखंड वीज सुरू ठेवावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिल्या. सामंत यांनी रत्नागिरीत महावितरणच्या कोकण परिमंडळाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सामंत यांच्यासोबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या कोकण परिमंडळाची आढावा बैठक घेतली

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये मीटर रिडींग बंद ठेवण्यात आले होते. जून महिन्यात पुन्हा रिडिंग घेणे सुरू करण्यात आल्यानंतर ग्राहकांना तीन महिन्यांची एकत्रित वीजबिले पाठवण्यात आली. मात्र, नेहमी येणार्‍या बिलांपेक्षा ही बिले अधिक रकमेची असल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला. महावितरणचे कर्मचारीही व्यवस्थित उत्तरे देत नसल्याच्या काही तक्रारी आल्या. याचे पडसाद आज घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महावितरणच्या कर्मचाऱयांना विचारणा केली. यापुढे सर्वच बिले रिडींगप्रमाणे काढण्याच्या सूचना सामंत यांनी अधिकाऱयांना केल्या.

वाढीव वीजबिलाबाबत असणाऱया शंकांचे निरसन करण्यासाठी रत्नागिरीत 45 आणि सिंधुदुर्गात 25 अशी 70 तक्रार निवारण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामार्फत रत्नागिरीतील 2 हजार 590 तर सिंधुदुर्गातील 1 हजार 432 वीजग्राहकांच्या शंकांचे निसरण करण्यात आले, असल्याची माहिती अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील किनारी भागात भूमीगत वीज वाहिन्यांचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच शहरी भागातही भूमीगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यासाठी 670 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे सायनेकर यांनी सांगितले. याबाबत आयुक्‍त असीम गुप्ता यांच्याशी बोलणे झाले असून, टप्प्याटप्याने हा निधी उपलब्ध होईल, असे सामंत यांनी सांगितले.

जून महिन्यात कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले. मात्र, महावितरणकडून कंत्राट घेणाऱया एका ठेकेदाराने कामाचे वाढीव दर सांगत आडमुठेपणाचे धोरण अवलंबले. या ठेकेदारावर कारवाई करून त्याची बिले अदा न करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.