ETV Bharat / state

मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मीर' फलकाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरींग करावे - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Jan 7, 2020, 2:15 PM IST

Updated : Jan 7, 2020, 3:25 PM IST

जेएनयूमधील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले. त्यासाठी सोमवारी गेट वे ऑफ इंडियाजवळ विविध विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. त्यामध्येच 'फ्री काश्मीर'चे फलक झळकवण्यात आले. आता त्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.

free kashmir banner issue
चंद्रकांत पाटील

रत्नागिरी - मुंबईमध्ये झळकलेल्या 'फ्री काश्मीर'च्या फलक झळकवण्यात आले. हे प्रकरण गंभीर आहे. अशा फलकांचे मूळ खूप खोलवर असतात. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मॉनिटरींग करावे. गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मिर' फलकाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरींग करावे - चंद्रकांत पाटील

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निरर्थक आहे. मात्र, एका माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांच्या एकाच विद्यापीठाच्या बोगस डिग्री बाबतीतला योगायोग पाहून मला गंमत वाटते, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.

रत्नागिरीतील ६ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच विजयाचा झेंडा फडकवेल. राज्यात अनैसर्गिक आघाड्या करून जे सरकार सत्तेत आले आहे, त्याबद्दल मतदारांमध्ये राग आहे. हा राग ते मतदानातून व्यक्त करतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच वारकरी विद्यापीठ व्हायलाच पाहिजे, शिवसेनेच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. याबाबत आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा असेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापुरातील मटण व्यवसायिकांसदर्भात बोलताना पाटील म्हणाले, की हा अतिशय नाजूक विषय आहे. सरकारने अनुदान द्यावे, असे मी सुचवणार नाही. यावर प्रशासनाने पुन्हा बैठक घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा, अशी सावध प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

रत्नागिरी - मुंबईमध्ये झळकलेल्या 'फ्री काश्मीर'च्या फलक झळकवण्यात आले. हे प्रकरण गंभीर आहे. अशा फलकांचे मूळ खूप खोलवर असतात. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मॉनिटरींग करावे. गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मिर' फलकाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरींग करावे - चंद्रकांत पाटील

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निरर्थक आहे. मात्र, एका माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांच्या एकाच विद्यापीठाच्या बोगस डिग्री बाबतीतला योगायोग पाहून मला गंमत वाटते, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.

रत्नागिरीतील ६ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच विजयाचा झेंडा फडकवेल. राज्यात अनैसर्गिक आघाड्या करून जे सरकार सत्तेत आले आहे, त्याबद्दल मतदारांमध्ये राग आहे. हा राग ते मतदानातून व्यक्त करतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच वारकरी विद्यापीठ व्हायलाच पाहिजे, शिवसेनेच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. याबाबत आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा असेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापुरातील मटण व्यवसायिकांसदर्भात बोलताना पाटील म्हणाले, की हा अतिशय नाजूक विषय आहे. सरकारने अनुदान द्यावे, असे मी सुचवणार नाही. यावर प्रशासनाने पुन्हा बैठक घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा, अशी सावध प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

Intro:मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मिर'बोर्ड बाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं - चंद्रकांत पाटील

वारकरी विद्यापीठाला आमचा पाठिंबाच असेल - चंद्रकांत पाटील

उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निरर्थक - चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील मटण प्रश्नाबाबत प्रशासनानं पुन्हा बैठक घेऊन प्रश्न सोडवावा - चंद्रकांत पाटील

रत्नागिरी, प्रतिनिधी


राज्यातल्या सहा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच विजयाचा झेंडा फडकवेल, राज्यात अनैसर्गिक आघाड्या करून जे सरकार सत्तेत आलं आहे, त्याबद्दल मतदारांमध्ये राग आहे आणि हा राग ते मतदानातून व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईत फ्री काश्मिरचे बोर्ड झळकल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. या प्रकऱणात गृह खातं जरी राष्ट्रवादीकडे असले तरी मुख्यमंंत्र्यांनी याचे माँनिटरिंग करावे आणि याकडे गाभीर्यांने पहावे असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पण एका माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांच्या एकाच विद्यापिठाच्या बोगस डिग्री बाबतीतला योगायोग बघून मला गंमत वाटते, अशी मिश्लिक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. वारकरी विद्यापिठ व्हायलाच पाहिजे, शिवसेनेच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि याबाबत आमचा सरकारला पूर्ण पाठींबा असेल असंही पाटील यावेळी म्हणाले. तर कोल्हापूरातील मटण व्यवसायिकांसदर्भात बोलताना पाटील म्हणाले की हा अतिशय नाजूक विषय आहे, सरकारने अनुदान द्यावं असं मी सुचवणार नाही असं सांगत यावर प्रशासनानं पुन्हा बैठक घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी सावध प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केलीय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनीBody:मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मिर'बोर्ड बाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं - चंद्रकांत पाटील

वारकरी विद्यापीठाला आमचा पाठिंबाच असेल - चंद्रकांत पाटील

उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निरर्थक - चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील मटण प्रश्नाबाबत प्रशासनानं पुन्हा बैठक घेऊन प्रश्न सोडवावा - चंद्रकांत पाटीलConclusion:मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मिर'बोर्ड बाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं - चंद्रकांत पाटील

वारकरी विद्यापीठाला आमचा पाठिंबाच असेल - चंद्रकांत पाटील

उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निरर्थक - चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील मटण प्रश्नाबाबत प्रशासनानं पुन्हा बैठक घेऊन प्रश्न सोडवावा - चंद्रकांत पाटील
Last Updated : Jan 7, 2020, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.