ETV Bharat / state

पाणी कधी देणार? प्रचारादरम्यान धैर्यशील पाटलांवर महिलांचा रोष

पेणचे शेकापचे आमदार आमदार धैर्यशील पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त वाशी वढाव या गावात गेले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना पाणी कधी देणार? असे विचारुन रोष व्यक्त केला.

author img

By

Published : Apr 7, 2019, 7:18 PM IST

पाणी कधी देणार? प्रचारादरम्यान धैर्यशील पाटलांवर महिलांचा रोष

रायगड - पेण तालुक्यातील वाशी वढाव येथे प्रचाराला गेलेल्या आमदाराला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पेणचे शेकापचे आमदार आमदार धैर्यशील पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त वाशी वढाव या गावात गेले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना पाणी कधी देणार? असे विचारुन रोष व्यक्त केला.

या ठिकाणी गावातील विहिरीवर महिला पाणी भरत होत्या. त्यावेळी आघाडीच्या प्रचारासाठी आमदार धैर्यशील पाटील हे महिलांशी बोलण्यासाठी आले. त्यावेळी सर्व महिला संत्पत झाल्या व त्यांना पाणी कधी देणार, असे विचारले. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ३० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. अजून ३-४ महिने थांबा, आणखी २० कोटी रुपये मंजुर करून तुमच्या दारापर्यंत नळाने पाणी देईन, अशी विनवणी आमदार धैर्यशील पाटलांना करवी लागली.

पाणी कधी देणार? प्रचारादरम्यान धैर्यशील पाटलांवर महिलांचा रोष

निवडणूका जवळ आल्यानंतर लोकप्रतिनिधींना जनतेच्या दारी जावे लागते. त्यावेळी दिलेली वचने, आश्वासने पूर्ण केली नाहीत तर जनतेच्या रोषाला समोरे जावे लागते. त्यामुळेच आमदार धैर्यशील पाटलांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर २ दिवसांपुर्वी सुनील तटकरे यांच्या कन्येलाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

रायगड - पेण तालुक्यातील वाशी वढाव येथे प्रचाराला गेलेल्या आमदाराला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पेणचे शेकापचे आमदार आमदार धैर्यशील पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त वाशी वढाव या गावात गेले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना पाणी कधी देणार? असे विचारुन रोष व्यक्त केला.

या ठिकाणी गावातील विहिरीवर महिला पाणी भरत होत्या. त्यावेळी आघाडीच्या प्रचारासाठी आमदार धैर्यशील पाटील हे महिलांशी बोलण्यासाठी आले. त्यावेळी सर्व महिला संत्पत झाल्या व त्यांना पाणी कधी देणार, असे विचारले. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ३० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. अजून ३-४ महिने थांबा, आणखी २० कोटी रुपये मंजुर करून तुमच्या दारापर्यंत नळाने पाणी देईन, अशी विनवणी आमदार धैर्यशील पाटलांना करवी लागली.

पाणी कधी देणार? प्रचारादरम्यान धैर्यशील पाटलांवर महिलांचा रोष

निवडणूका जवळ आल्यानंतर लोकप्रतिनिधींना जनतेच्या दारी जावे लागते. त्यावेळी दिलेली वचने, आश्वासने पूर्ण केली नाहीत तर जनतेच्या रोषाला समोरे जावे लागते. त्यामुळेच आमदार धैर्यशील पाटलांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर २ दिवसांपुर्वी सुनील तटकरे यांच्या कन्येलाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

Intro:आमदार धैर्यशील पाटील यांना जनतेच्या रोषाला जावे लागले समोर

आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारादरम्यान घडला प्रकार

पाणी प्रश्न न सोडविल्याने नागरिक संतप्त



रायगड : पेण तालुक्यातील वाशी वढाव येथे प्रचाराला गेलेल्या आमदारालाचा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची घटना घडली आहे. पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.Body:लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारनिमित्त पेणचे शेकापचे आमदार धैर्यशील पाटील हे वाशी वढाव या गावात गेले होते. त्यावेळी गावातील विहिरीवर गावातील महिला वर्ग पाणी भरत होते. त्यामुळे याठिकाणी प्रचार करणे योग्य असा समज करून आमदार धैर्यशील पाटील हे महिला वर्गाशी बोलण्यास गेले.
त्यावेळी महिला वर्गाने पाणी कधी देणार असा प्रश्न विचारला. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांकडून तीस कोटी निधी आणला आहे. अजून तीन चार महिने कळ काढा मी अजून वीस कोटी मंजुर करून तुमच्या दारापर्यंत नळाने पाणी देईल अशी कळकळीची विनवणी खुद्द आमदार धैर्यशील पाटील यांना करावी लागली. Conclusion:निवडणूका आल्याकी लोकप्रतिनिधींना जनतेच्या दारी जावेच लागते. त्यावेळी केलेली वचने, आश्वासन पूर्ण केली नाही की, जनतेच्या रोषाला समोरे जावे लागत असते. असाच प्रसंग आमदार धैर्यशील पाटील यांना आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या कन्येलाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.