ETV Bharat / state

शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढवून ज्ञानाने समृद्ध-संपन्न नवी पिढी घडवली पाहिजे - व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सव

पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित होते.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Dec 29, 2019, 9:56 PM IST

रायगड - शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे अशा भूमिकेचा मी आहे. राज्यात शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढवून ज्ञानाने समृद्ध-संपन्न नवी पिढी घडवली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जीवनातील कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची तयारी असलेले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.

व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम


व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम रविवारी पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पनवेलमधील आठवणींना उजाळा दिला. उरणचे जेएनपीटी बंदर सुरू करताना मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. हे जेएनपीटी बंदर देशाच्या समृद्धीचे केंद्र बनले आहे, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांची घालमेल, अजूनही मंत्रिपदाचा कॉल नाही

निवडणुकीतील भाषणापेक्षा शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. निवडणुकीत निवडून येणे सोपे असते. मात्र, प्रत्येक वर्गात पास होणे, ही कठीण गोष्ट आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र काम करणारे नेते हे फक्त पनवेलमध्येच दिसू शकतात, अशी भावना मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जे. एम. म्हात्रे, मीनाक्षी पाटील हे उपस्थित होते.

रायगड - शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे अशा भूमिकेचा मी आहे. राज्यात शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढवून ज्ञानाने समृद्ध-संपन्न नवी पिढी घडवली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जीवनातील कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची तयारी असलेले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.

व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम


व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम रविवारी पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पनवेलमधील आठवणींना उजाळा दिला. उरणचे जेएनपीटी बंदर सुरू करताना मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. हे जेएनपीटी बंदर देशाच्या समृद्धीचे केंद्र बनले आहे, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांची घालमेल, अजूनही मंत्रिपदाचा कॉल नाही

निवडणुकीतील भाषणापेक्षा शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. निवडणुकीत निवडून येणे सोपे असते. मात्र, प्रत्येक वर्गात पास होणे, ही कठीण गोष्ट आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र काम करणारे नेते हे फक्त पनवेलमध्येच दिसू शकतात, अशी भावना मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जे. एम. म्हात्रे, मीनाक्षी पाटील हे उपस्थित होते.

Intro:सोबत भाषण आणि फुटेज जोडले आहे. एका स्टोरीमध्ये फक्त 10 व्हिजची मर्यादा असल्याने पुढच्या स्टोरीमधे वीज अटॅच करून पाठवतेय.


पनवेल


शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे अशा भूमिकेचा मी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष करण्यात आला, त्याचपद्धतीने राज्यात शिक्षणक्षेत्रातील गुणवत्ता वाढवून समृद्ध ज्ञानाने संपन्न अशी नवी पिढी घडवण्यासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेलमध्ये केलं. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आव्हानांना तोंड देण्याची तयारी असलेले विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.Body:पनवेल इथल्या व्ही. के. हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. याच व्यासपीठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुध्दा उपस्थित होते. मनोहर जोशी हे पनवेलइथल्या व्ही.के. हायस्कूलमधील माजी विद्यार्थी असल्याने त्यांची उपस्थिती आकर्षणाची ठरली. यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मनोगत व्यक्त करताना पनवेलमधील आठवणींना उजाळा दिला. उरण मधले जेएनपीटी बंदर हे जेव्हा सुरू करण्यात आलं तेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, आज याच जेएनपीटी बंदर फक्त राज्यातच नव्हे तर देशातलं समृद्धीचं केंद्र बनलंय, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.



यावेळी मनोहर जोशी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, निवडणुकीतील भाषणापेक्षा शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. निवडणुकीत निवडून येणे सोप असते, पण प्रत्येक वर्गात पास होणे, ही कठीण गोष्ट असल्याचे जोशी यांनी म्हटले. राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्र काम करणारे नेते हे फक्त पनवेलमध्येच दिसू शकतात, असं देखील मनोहर जोशी म्हणाले. Conclusion:यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जे.एम.म्हात्रे, मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.