ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांनी भाजपची सुपारी घेतलीये; रायगडच्या रिपाइं जिल्हाध्यक्षाचा आरोप

प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्‍यातील जिनींग प्रेसींग करणाऱ्या सम्‍यक कृषी उत्‍पादक सहकारी संस्‍थेला राज्‍य सरकारने ५ कोटी रूपये भागभांडवल मंजूर केले असल्याचा आरोप रिपाइंचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला.

author img

By

Published : Mar 19, 2019, 7:02 PM IST

रिपाइंचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड

रायगड - भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली आहे. त्‍यांना काँग्रेस आघाडीबरोबर जायचेच नव्‍हते, पुन्‍हा भाजपचे सरकार यावे यासाठीच त्‍यांनी आघाडी होऊ दिली नाही, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला आहे. महाड येथे सत्‍यागृह दिनाच्‍या तयारीची पाहणी करण्‍यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

रिपाइंचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड

कोरेगाव-भीमा येथील कार्यक्रम झाल्‍यानंतर काही दिवसांतच प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्‍यातील जिनींग प्रेसींग करणाऱ्या सम्‍यक कृषी उत्‍पादक सहकारी संस्‍थेला राज्‍य सरकारने ५ कोटी रूपये भागभांडवल मंजूर केले. त्‍यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली. बाबासाहेबांचा पक्ष वंचित आघाडीत सामील करून संपवला असल्‍याची टीका जगदीश गायकवाडांनी केली.

वंचित बहुजन आघाडीला कोकणात कोणतेच यश मिळणार नसल्याने ही आघाडी याठिकाणी फेल जाणार आहे. वंचित व मुस्लीम मते मिळविण्यासाठी ही आघाडी झाली असल्याचेही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

रायगड - भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली आहे. त्‍यांना काँग्रेस आघाडीबरोबर जायचेच नव्‍हते, पुन्‍हा भाजपचे सरकार यावे यासाठीच त्‍यांनी आघाडी होऊ दिली नाही, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला आहे. महाड येथे सत्‍यागृह दिनाच्‍या तयारीची पाहणी करण्‍यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

रिपाइंचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड

कोरेगाव-भीमा येथील कार्यक्रम झाल्‍यानंतर काही दिवसांतच प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्‍यातील जिनींग प्रेसींग करणाऱ्या सम्‍यक कृषी उत्‍पादक सहकारी संस्‍थेला राज्‍य सरकारने ५ कोटी रूपये भागभांडवल मंजूर केले. त्‍यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली. बाबासाहेबांचा पक्ष वंचित आघाडीत सामील करून संपवला असल्‍याची टीका जगदीश गायकवाडांनी केली.

वंचित बहुजन आघाडीला कोकणात कोणतेच यश मिळणार नसल्याने ही आघाडी याठिकाणी फेल जाणार आहे. वंचित व मुस्लीम मते मिळविण्यासाठी ही आघाडी झाली असल्याचेही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

(बाईट व विजूल्स ftp केले आहेत)


प्रकाश आंबेडकर यांनी घेतलीय भाजपाची सुपारी

त्‍यांच्‍या संस्‍थेला सरकारने दिले 5 कोटींचे भाग भांडवल – रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड यांचा आरोप .......

रायगड : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाची सुपारी घेतली आहे. त्‍यांना कॉंग्रेस आघाडीबरोबर जायचेच नव्‍हते पुन्‍हा भाजपाचे सरकार यावे यासाठीच त्‍यांनी आघाडी होवू दिली नाही असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला आहे. महाड येथे सत्‍याग्रह दिनाच्‍या तयारीची पाहणी करण्‍यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रम झाल्‍यानंतर काही दिवसातच प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्‍यातील जिनींग प्रेसींग करणाऱ्या सम्‍यक कृषी उत्‍पादक सहकारी संस्‍थेला राज्‍य सरकारने 5 कोटी रूपये भागभांडवल मंजूर केले आहे. त्‍यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली आहे बाबासाहेबांचा पक्ष वंचित आघाडीत सामील करून तो संपवला असल्‍याची टीका जगदीश गायकवाडांनी केली.

तसेच वंचित बहुजन आघाडीला कोकणात कोणतेच यश मिळणार नसल्याने ही आघाडी याठिकाणी फेल जाणार आहे. वंचित व मुस्लिम मते मिळविण्यासाठी ही आघाडी झाली असल्याचेही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.