ETV Bharat / state

ईटीव्ही भारतचा दणका : रायगडमधील उमटे धरणाच्या सांडव्याच्या दुरुस्तीचे काम सूरू

उमटे धरणाच्या सांडव्याला अनेक ठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे, तर धरणातील मातीमिश्रित पाणी नागरिकांना नळावाटे सोडले जाते. त्यामुळे नागरिक आजारी पडायला लागले आहेत. याबाबत ईटीव्ही भारतमधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचाच धसका घेत जिल्हा परिषदेने नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

author img

By

Published : Jul 8, 2019, 5:51 PM IST

उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड

रायगड - जिल्ह्यातील उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंती ढासळल्या आहेत. तसेच मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत.

उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड

उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची दुरावस्था झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी भिंतीचे दगड पडून मोठमोठे भगदाड पडले आहे, तर धरणातील मातीमिश्रित पाणी नागरिकांना नळावाटे सोडले जाते. हे अशुद्ध पाणी प्यायल्याने नागरिक आजारी पडायला लागले. याबाबत ईटीव्ही भारतमधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचाच धसका घेत जिल्हा परिषदेने नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

उमटे धरणाला कोणताही धोका नाही आहे. तसेच धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात भिंतीचे भगदाड भरून पूर्ण होतील. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीही दिले जाणार आहे. यासाठी ठेकेदाराला जलशुद्धीकरण प्रकल्पावर जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र कोळी यांनी सांगितले.

रायगड - जिल्ह्यातील उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंती ढासळल्या आहेत. तसेच मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत.

उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड

उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची दुरावस्था झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी भिंतीचे दगड पडून मोठमोठे भगदाड पडले आहे, तर धरणातील मातीमिश्रित पाणी नागरिकांना नळावाटे सोडले जाते. हे अशुद्ध पाणी प्यायल्याने नागरिक आजारी पडायला लागले. याबाबत ईटीव्ही भारतमधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचाच धसका घेत जिल्हा परिषदेने नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

उमटे धरणाला कोणताही धोका नाही आहे. तसेच धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात भिंतीचे भगदाड भरून पूर्ण होतील. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीही दिले जाणार आहे. यासाठी ठेकेदाराला जलशुद्धीकरण प्रकल्पावर जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र कोळी यांनी सांगितले.

Intro:इटीव्ही भारताच्या दणक्याने

उमटे धरणाच्या ढासळलेल्या सांडव्याच्या भिंतीच्या कामाला सुरुवात

नागरिकांना शुद्ध पाणीही मिळणार



रायगड : उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीच्या ढासळलेल्या दुरावस्थेबाबत व मतिमिश्रित पाण्याबाबत बातमी इटीव्ही भारतामध्ये दाखवण्यात आली होती. या बातमीच्या दणक्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तातडीने पावले उचलून ढासळलेल्या भिंतीचे व शुद्ध पाणी देण्याबाबतचे काम युद्धपातळीवर करण्याचे ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. Body:उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी भिंतीचे दगड पडून मोठमोठे भगदाड पडले होते. तर धरणातील माती मिश्रित पाणी नागरिकांना नळावाटे सोडले जात होते. मातीमिश्रित अशुद्ध पाणी पियाल्याने नागरिक आजारी पडायला लागले आहेत. याबाबत इटीव्ही भारतमधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. Conclusion:बातमीच्या दणक्याने जिल्हा परिषद प्रशासन जागे झाले असून सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्यासाठी ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. तर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून त्यातून शुद्ध पाणी नागरिकांना पिण्यास सोडण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी दोन दिवसात सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड भरले जाणार असून नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास सुरू होणार आहे.

------------------------

उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून दोन दिवसात भिंतीचे भगदाड भरून पूर्ण होतील. धरणाला कोणताही धोका नाही आहे. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीही दिले जाणार आहे. यासाठी ठेकेदाराला जलशुद्धीकरण प्रकल्पावर एक व जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी ठेवण्यास सूचना केल्या आहेत.

राजेंद्र कोळी

कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, राजीप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.