ETV Bharat / state

निवडणूक निकालानंतर आम्हीच फटाके फोडणार - जयंत पाटील - assembly election 2019

भाजप शिवसेनेत मेगा भरती होत असली तरी त्याची आम्हाला फिकिर नाही. नगाला नग तयार होत आहेत. जे गेले त्याठिकाणी नवीन पर्याय उभे केले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील
author img

By

Published : Sep 21, 2019, 10:09 PM IST

Updated : Sep 21, 2019, 10:44 PM IST

रायगड - 24 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा आमचेच आनंदाचे व विजयाचे फटाके फुटतील. मेगा भरतीची आम्हाला फिकिर नाही. कारण शिवसेना भाजपला लोकसभेत एवढे बहुमत मिळूनही ते आयाराम गयारामच्या जीवावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बघत आहेत. यातच आमचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारोपासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली.

जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे

आमदार जयंत पाटील म्हणाले, की 24 ऑक्टोबरला निकाल लागेल तेव्हा आम्हीच फटाके फोडू. महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे. आम्ही निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना, तरुणांना, महिलांना संधी देत आहोत. 80 वर्षाचा तरुण नेता शरद पवार हे परत मैदानात उतरले असून त्याच्या मागे जनता आहे. जनतेला आयाराम गयाराम यांचे सरकार नको आहे. जनतेला निष्ठेने राहिलेल्या तत्वाशी चिकटलेल्या माणसांनाच निवडून द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा - जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात

मेगा भरतीची फिकीर नाही

भाजप शिवसेनेत मेगा भरती होत असली तरी त्याची आम्हाला फिकिर नाही. नगाला नग तयार होत आहेत. जे गेले त्याठिकाणी नवीन पर्याय उभे केले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. शरद पवारांचा विचार खाली पडू देणार नाही. शिवसेना भाजपत गेलेल्यांना जनताच खड्यासारखी बाजूला करेल. अजूनही काही जण पक्ष सोडतील पण नवीन रक्ताची नवी फौज तयार होईल.

हेही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

रायगड - 24 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा आमचेच आनंदाचे व विजयाचे फटाके फुटतील. मेगा भरतीची आम्हाला फिकिर नाही. कारण शिवसेना भाजपला लोकसभेत एवढे बहुमत मिळूनही ते आयाराम गयारामच्या जीवावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बघत आहेत. यातच आमचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारोपासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली.

जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे

आमदार जयंत पाटील म्हणाले, की 24 ऑक्टोबरला निकाल लागेल तेव्हा आम्हीच फटाके फोडू. महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे. आम्ही निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना, तरुणांना, महिलांना संधी देत आहोत. 80 वर्षाचा तरुण नेता शरद पवार हे परत मैदानात उतरले असून त्याच्या मागे जनता आहे. जनतेला आयाराम गयाराम यांचे सरकार नको आहे. जनतेला निष्ठेने राहिलेल्या तत्वाशी चिकटलेल्या माणसांनाच निवडून द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा - जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात

मेगा भरतीची फिकीर नाही

भाजप शिवसेनेत मेगा भरती होत असली तरी त्याची आम्हाला फिकिर नाही. नगाला नग तयार होत आहेत. जे गेले त्याठिकाणी नवीन पर्याय उभे केले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. शरद पवारांचा विचार खाली पडू देणार नाही. शिवसेना भाजपत गेलेल्यांना जनताच खड्यासारखी बाजूला करेल. अजूनही काही जण पक्ष सोडतील पण नवीन रक्ताची नवी फौज तयार होईल.

हेही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

Intro:
निवडणूक निकालानंतर आम्हीच फटाके फोडणार

शिवसेना भाजप आयाराम गयारामच्या जीवावर बहुमत मिळविण्याचे स्वप्न पाहत आहेत

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

रायगड : 24 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा आमचेच आनंदाचे व विजयाचे फटाके फुटले जातील. मेगा भरतीची आम्हाला फिकीर नाही. कारण शिवसेना भाजपला लोकसभेत एवढे बहुमत मिळूनही त्यांना आयाराम गयारामच्या जिवावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बाळगायला लागत आहे यातच आमचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.Body:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारोपसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाड येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, 24 ऑक्टोबर निकाल लागेल तेव्हा आम्हीच फटाके फोडू. महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे. आम्ही निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना, तरुणांना, महिलांना संधी देत आहोत. 80 वर्षाचा तरुण नेता शरद पवार हे परत मैदानात उतरले असून त्याच्या मागे जनता आहे. जनतेला आयाराम गयाराम यांचे सरकार नको आहे. जनतेला निष्ठने राहिलेल्या तत्वाशी चिकटलेल्या माणसांनाच निवडून द्यायचे आहे. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.Conclusion:भाजप शिवसेनेत मेगा भरती होत असली तरी त्याची आम्हाला फिकीर नाही. नगाला नग तयार होत आहेत. जे गेले त्याठिकाणी नवीन पर्याय उभे केले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. शरद पवारांचा विचार खाली पडून देणार नाही. शिवसेना भाजपात गेलेल्यांना जनताच खड्यासारखी बाजूला करेल. अजूनही काही जण पक्ष सोडतील पण नवीन रक्ताची नवी फोज तयार होईल.
Last Updated : Sep 21, 2019, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.