ETV Bharat / state

वरसोली समुद्रात बोट बुडाली, आठ जण सुखरूप - varsoli sea

आठ जणांना घेऊन चार वाजता बोटीने करंजा बंदर सोडले. बोट वरसोली बंदरातील खांदेरी व चाहूल खाद्या या दरम्यान आली असता अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीला चालू करण्याचा प्रयत्न बोटीतील कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, बोट सुरू झाली नाही. त्यानंतर, पाण्याच्या लाटेवर बोट पुढे जाऊन खडकावर आपटली.

boat carrying eight fishermen drown in varsoli sea all fishermen are safe
author img

By

Published : Aug 1, 2019, 1:09 PM IST

Updated : Aug 1, 2019, 1:16 PM IST

रायगड - कारंजा येथून सकाळी चार वाजता अलिबाग वरसोली भागात मच्छीमारी करण्यासाठी आलेली मच्छिमार बोट वरसोली समुद्रकिनाऱ्यात बुडल्याची घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये असलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून, समुद्रात उडी मारून पोहत वरसोली समुद्र किनारा गाठला. त्यामुळे या आठही जणांचे जीव वाचले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

वरसोली समुद्रात बोट बुडाली, आठ जण सुखरूप

सुरेखा राजेश नाखवा यांच्या मालकीची ही बोट होती. 'नमः शिवाय' नावाच्या या बोटीने वसंता पाटील, धावू तांडेल, गजानन जोशी, नितीन ठाकूर, उमाजी पाटील, रुपेश पाटील, नारायण कोळी, परशुराम पाटील या आठ जणांना घेऊन पहाटे चार वाजता करंजा बंदर सोडले.

बोट वरसोली बंदरातील खांदेरी व चाहूल खाद्या या दरम्यान आली असता अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीला चालू करण्याचा प्रयत्न बोटीतील कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, बोट सुरू झाली नाही. बोटीचा नांगर टाकला होता, मात्र पाण्याच्या हिसक्याने नांगरही निघून गेला. त्यानंतर, पाण्याच्या लाटेवर बोट पुढे जाऊन खडकावर आपटली आणि फुटल्यामुळे बुडू लागली. त्यानंतर, बोटीतील आठही जणांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारली आणि बोटीतील मासे साठवून ठेवण्याच्या बॉक्सवर बसून बोयाच्या सहाय्याने आठही जण वरसोली समुद्र किनारी सुखरूप पोहचले.

या दुर्घटनेनंतर पोलीस, वरसोली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी आठही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता सर्व सुखरूप आहेत. मात्र बोट बुडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

मच्छीमारीला पावसाळ्यात बंदी घातली असताना व हवामान विभागाने पाच दिवस मच्छीमारांनी मच्छीमारीला जाऊ नये अशा सूचना असतानादेखील, मच्छिमार हे मच्छीमारीला जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर, या मच्छीमारांव काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

रायगड - कारंजा येथून सकाळी चार वाजता अलिबाग वरसोली भागात मच्छीमारी करण्यासाठी आलेली मच्छिमार बोट वरसोली समुद्रकिनाऱ्यात बुडल्याची घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये असलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून, समुद्रात उडी मारून पोहत वरसोली समुद्र किनारा गाठला. त्यामुळे या आठही जणांचे जीव वाचले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

वरसोली समुद्रात बोट बुडाली, आठ जण सुखरूप

सुरेखा राजेश नाखवा यांच्या मालकीची ही बोट होती. 'नमः शिवाय' नावाच्या या बोटीने वसंता पाटील, धावू तांडेल, गजानन जोशी, नितीन ठाकूर, उमाजी पाटील, रुपेश पाटील, नारायण कोळी, परशुराम पाटील या आठ जणांना घेऊन पहाटे चार वाजता करंजा बंदर सोडले.

बोट वरसोली बंदरातील खांदेरी व चाहूल खाद्या या दरम्यान आली असता अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीला चालू करण्याचा प्रयत्न बोटीतील कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, बोट सुरू झाली नाही. बोटीचा नांगर टाकला होता, मात्र पाण्याच्या हिसक्याने नांगरही निघून गेला. त्यानंतर, पाण्याच्या लाटेवर बोट पुढे जाऊन खडकावर आपटली आणि फुटल्यामुळे बुडू लागली. त्यानंतर, बोटीतील आठही जणांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारली आणि बोटीतील मासे साठवून ठेवण्याच्या बॉक्सवर बसून बोयाच्या सहाय्याने आठही जण वरसोली समुद्र किनारी सुखरूप पोहचले.

या दुर्घटनेनंतर पोलीस, वरसोली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी आठही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता सर्व सुखरूप आहेत. मात्र बोट बुडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

मच्छीमारीला पावसाळ्यात बंदी घातली असताना व हवामान विभागाने पाच दिवस मच्छीमारांनी मच्छीमारीला जाऊ नये अशा सूचना असतानादेखील, मच्छिमार हे मच्छीमारीला जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर, या मच्छीमारांव काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Intro:वरसोली समुद्रात बोट बुडाली, आठ जण सुखरूप

उरण करंजा येथील बोट

बोटीचे लाखोंचे नुकसान

सकाळी पाच वाजताची घटना

मच्छीमारीला बंदी असतानाही मच्छिमार जातात समुद्रात

रायगड : कारंजा येथून सकाळी चार वाजता अलिबाग वरसोली भागात मच्छीमारी करण्यासाठी आलेली मच्छिमार बोट वरसोली समुद्रकिनाऱ्यात बुडल्याची घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामधील असलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारून पोहत वरसोली समुद्र किनारा गाठला. त्यामुळे या दुर्घटनेत आठ जणांचे जीव वाचले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र मच्छीमारीला बंदी असताना मच्छिमार आदेशाचे पालन करताना दिसत नाही.Body:वसंता पाटील, धावू तांडेल, गजानन जोशी, नितीन ठाकूर, उमाजी पाटील, रुपेश पाटील, नारायण कोळी, परशुराम पाटील सर्व राहणार केळवणे, उरण हे या अपघातात बचावले आहेत.

राजेश नाखवा यांच्या मालकीच्या बोटीने समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी चार वाजता करंजा बंदर सोडले. या मच्छिमार बोटीत नाखवा, तांडेल, खलाशी यासह पाचजण होते. बोट वरसोली बंदरातील खांदेरी व चाहूल खाद्या या दरम्यान आली असता बोट अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीला चालू करण्याचा प्रयत्न बोटीतील कर्मचाऱ्यांनी केला. मात्र बोट सुरू झाली नाही. त्यामुळे नाखवाने बोटीचा नांगर टाकला. मात्र पाण्याच्या हिसक्याने नागरही निघून गेला त्यानंतर पाण्याच्या लाटेवर बोट पुढे जाऊन खडकावर आपटली.

बोट फुटल्याने ती बुडू लागली त्यानंतर आठही बोटीतील कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून पाण्यात उड्या मारल्या. बोटीतील मासे साठवून ठेवण्याच्या बॉक्सवर बसून व बोयाच्या सहाय्याने आठही जण वरसोली समुद्र किनारी सुखरूप पोहचले. या दुर्घटनेनंतर पोलीस, वरसोली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी आठही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता सर्व सुखरूप आहेत. मात्र बोट बुडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. Conclusion:मच्छीमारीला पावसाळ्यात बंदी घातली असताना व हवामान विभागाने पाच दिवस मच्छीमारीला मच्छीमारांनी जाऊ नये अशा सूचना असताना मच्छिमार हे मच्छीमारीला जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर मच्छीमारी करणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Last Updated : Aug 1, 2019, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.