रायगड- येथे मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी रात्री कारचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर ३ जण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- धुक्यामुळे कालव्यात पडली कार, दोन अल्पवयीन मुलांसह सहा ठार
अंधेरी चकाला येथील मोतीवाले कुटुंब कोंडनपूर येथे गेले होते. ते परतत असताना त्यांनी पुण्याहून भाड्याने एक कार घेतली. दरम्यान, महामार्गावरील बोराघाटमार्गे कार उतरत असताना रस्ता दुभाजकची लोखंडी सळी डाव्या बाजूने गाडीत घुसली. यात मोतीराम मोतीवाला व त्यांची पत्नी उषा मोतीवाला हे दोघे जागीच मृत पावले. तर त्यांचा नातू व नात आणि सून नशीब बल्लतर म्हणून वाचले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास खोपोली पोलीस करीत आहेत. दरम्यान, कालच्या दिवसात हा दुसरा अपघात असून दोन्ही अपघातात काल एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.