ETV Bharat / state

'निसर्गा'ने केलं बेघर आता वन विभागाचीही आडकाठी; २५ आदिवासी कुटुंब उघड्यावर...

author img

By

Published : Jun 13, 2020, 10:26 AM IST

Updated : Jun 13, 2020, 11:28 AM IST

डोंगरातील घरे उद्ध्वस्त झाली असून आता पावसाळा हंगाम असल्याने, वन विभागाच्या रिकाम्या जागेत तात्पुरती झोपडी बांधून राहण्यासाठी निवारा तयार करीत आहेत. मात्र तिथेही वन विभागाचे कर्मचारी येऊन त्रास देत असल्याची प्रतिक्रिया आदिवासी बांधवानी दिली आहे. प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली असली तरी वन विभागाचे अधिकारी घर बांधून देत नसल्याने आदिवासी बांधवांची "ना घर का ना घाट का" अशी परिस्थिती झाली आहे.

25 tribal families face home problem in raigad Due to forest act
निसर्गाने केलं बेघर आता वन विभागही करतंयं झोपडी बांधण्यास आठकाठी; २५ आदिवासी कुटूंब उघड्यावर...

रायगड - एकीकडे निसर्गाने बेघर केले तर दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी तात्पुरती झोपडी बांधण्यासाठी परवानगी देत नाहीत. ही अवस्था अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी आदिवासी कुटुंबाची झाली आहे. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली 25 कुटूंब आज वन विभागाच्या मोकळ्या जागेवर तात्पुरती झोपडी बांधून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वन विभागाचे अधिकारी त्यांना झोपडी बांधू देत नाहीत. सध्या 25 कुटुंबातील दीडशे जण एकाच छताखाली राहत असून ते उघड्यावर चुल मांडून जेवण बनवत आहेत. अशात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाय करून आमच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची मागणी आदिवासी बांधवानी केली आहे. वेलटवाडीच्या या आदिवासी कुटुंबाचा घेतलेला हा स्पेशल आढावा...

आदिवासी कुटूंबियांच्या निवाऱ्याबाबत आढावा घेताना आमचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर....

अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या निसर्गरम्य डोंगरावर 25 आदिवासी कुटूंब गेली दीडशे वर्ष गुण्यागोविंदयाने राहत होती. 2019 साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटूंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागले. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबाच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवाशींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजूरीही दिली. मात्र दिलेल्या जागेतील काही भागावर वन विभागाचे कलम 35 लागले आहे. या कलमानुसार त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. यामुळे आदिवाशी कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली. याबाबत प्रशासनाने वन विभागाला सहकार्य करण्याची विनंती केली. पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आडमूठ्या भूमिकेमुळे आदिवासींना जागा उपलब्ध असूनही अद्याप घरे बांधता आलेली नाहीत.

25 tribal families face home problem in raigad Due to forest act
उघड्यावर स्वयपांक करताना महिला...

वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिवासी कुटुंबाची होलपट झाल्याने, अखेर ही कुटुंब पुन्हा आपल्या मूळ वाडीवर जाऊन वास्तव्य करू लागली. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने आदिवासी कुटुंबाची घरे ही पत्त्यासारखी कोसळली. वादळात आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने सारी कुटुंब डोंगरातून एकमेकांच्या साहाय्याने आबालवृद्धांना घेऊन डोंगराच्या पायथ्याशी येऊन विसावली. कष्टाने बांधलेला संसार हा डोळ्यासमोर उध्वस्त झाला. ही कुटूंब आता बेघर झाली आहेत. शाळेत आणि बांधलेल्या पत्राच्या शेडमध्ये 25 कुटूंबातील दीडशे जण दाटीवटीने राहत आहेत. आदिवासी कुटूंबाकडे गॅस, स्टो नसल्याने बाहेरील उघड्या जागेवर चूल पेटवून जेवण शिजवत आहेत. निवाऱ्यात लहान मुले आणि महिलांना झोपण्याइतकीच जागा आहे. यामुळे पुरूष बाहेर झोपत आहेत.

25 tribal families face home problem in raigad Due to forest act
झोपडी बांधताना आदिवासी...

डोंगरातील घरे उध्वस्त झाली असून आता पावसाळा हंगाम असल्याने, वन विभागाच्या रिकाम्या जागेत तात्पुरती झोपडी बांधून राहण्यासाठी निवारा तयार करीत आहेत. मात्र तिथेही वन विभागाचे कर्मचारी येऊन त्रास देत असल्याची प्रतिक्रिया आदिवासी बांधवानी दिली आहे. प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली असली तरी वन विभागाचे अधिकारी घर बांधून देत नसल्याने आदिवासी बांधवांची "ना घर का ना घाट का" अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात राहायचे कसे? असा प्रश्न या आदिवासी कुटूंबाना पडला आहे. तरी शासन आणि प्रशासनाने आमचा राहण्याचा प्रश्न सोडविण्याची कळकळीची विनंती आदिवासी कुटूंबानी केली आहे.

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ: शासनाच्या दौऱ्याने प्रशासनाचे हाल.. महत्वाची कामे प्रलंबित

हेही वाचा - पंचनामे करण्यास वेळ लागत असला तरी प्रत्येक नुकसानीची नोंद घेतली जाणार - आदिती तटकरे

रायगड - एकीकडे निसर्गाने बेघर केले तर दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी तात्पुरती झोपडी बांधण्यासाठी परवानगी देत नाहीत. ही अवस्था अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी आदिवासी कुटुंबाची झाली आहे. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली 25 कुटूंब आज वन विभागाच्या मोकळ्या जागेवर तात्पुरती झोपडी बांधून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वन विभागाचे अधिकारी त्यांना झोपडी बांधू देत नाहीत. सध्या 25 कुटुंबातील दीडशे जण एकाच छताखाली राहत असून ते उघड्यावर चुल मांडून जेवण बनवत आहेत. अशात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाय करून आमच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची मागणी आदिवासी बांधवानी केली आहे. वेलटवाडीच्या या आदिवासी कुटुंबाचा घेतलेला हा स्पेशल आढावा...

आदिवासी कुटूंबियांच्या निवाऱ्याबाबत आढावा घेताना आमचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर....

अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या निसर्गरम्य डोंगरावर 25 आदिवासी कुटूंब गेली दीडशे वर्ष गुण्यागोविंदयाने राहत होती. 2019 साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटूंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागले. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबाच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवाशींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजूरीही दिली. मात्र दिलेल्या जागेतील काही भागावर वन विभागाचे कलम 35 लागले आहे. या कलमानुसार त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. यामुळे आदिवाशी कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली. याबाबत प्रशासनाने वन विभागाला सहकार्य करण्याची विनंती केली. पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आडमूठ्या भूमिकेमुळे आदिवासींना जागा उपलब्ध असूनही अद्याप घरे बांधता आलेली नाहीत.

25 tribal families face home problem in raigad Due to forest act
उघड्यावर स्वयपांक करताना महिला...

वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिवासी कुटुंबाची होलपट झाल्याने, अखेर ही कुटुंब पुन्हा आपल्या मूळ वाडीवर जाऊन वास्तव्य करू लागली. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने आदिवासी कुटुंबाची घरे ही पत्त्यासारखी कोसळली. वादळात आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने सारी कुटुंब डोंगरातून एकमेकांच्या साहाय्याने आबालवृद्धांना घेऊन डोंगराच्या पायथ्याशी येऊन विसावली. कष्टाने बांधलेला संसार हा डोळ्यासमोर उध्वस्त झाला. ही कुटूंब आता बेघर झाली आहेत. शाळेत आणि बांधलेल्या पत्राच्या शेडमध्ये 25 कुटूंबातील दीडशे जण दाटीवटीने राहत आहेत. आदिवासी कुटूंबाकडे गॅस, स्टो नसल्याने बाहेरील उघड्या जागेवर चूल पेटवून जेवण शिजवत आहेत. निवाऱ्यात लहान मुले आणि महिलांना झोपण्याइतकीच जागा आहे. यामुळे पुरूष बाहेर झोपत आहेत.

25 tribal families face home problem in raigad Due to forest act
झोपडी बांधताना आदिवासी...

डोंगरातील घरे उध्वस्त झाली असून आता पावसाळा हंगाम असल्याने, वन विभागाच्या रिकाम्या जागेत तात्पुरती झोपडी बांधून राहण्यासाठी निवारा तयार करीत आहेत. मात्र तिथेही वन विभागाचे कर्मचारी येऊन त्रास देत असल्याची प्रतिक्रिया आदिवासी बांधवानी दिली आहे. प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली असली तरी वन विभागाचे अधिकारी घर बांधून देत नसल्याने आदिवासी बांधवांची "ना घर का ना घाट का" अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात राहायचे कसे? असा प्रश्न या आदिवासी कुटूंबाना पडला आहे. तरी शासन आणि प्रशासनाने आमचा राहण्याचा प्रश्न सोडविण्याची कळकळीची विनंती आदिवासी कुटूंबानी केली आहे.

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ: शासनाच्या दौऱ्याने प्रशासनाचे हाल.. महत्वाची कामे प्रलंबित

हेही वाचा - पंचनामे करण्यास वेळ लागत असला तरी प्रत्येक नुकसानीची नोंद घेतली जाणार - आदिती तटकरे

Last Updated : Jun 13, 2020, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.