ETV Bharat / state

कोरोना महामारीचे संकट पाहता पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा

author img

By

Published : Jun 10, 2021, 2:09 PM IST

सन २०२० मध्ये सुरू झालेले कोरोना संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.कोरोना महामारी वाढू नये, यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा.

पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा
पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा

आळंदी (पुणे)- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत व्हावा अशी मागणी करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांचे वतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कु-हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले.

आळंदी ते पंढरपूर माऊलींचा पालखी सोहळा याही वर्षी लालपरीने

पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा
पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा

सन २०२० मध्ये सुरू झालेले कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना संकट अजून पुर्णपणे संपलेले नाही. कोरोना गर्दीत जास्त वाढत असल्याने गर्दी नियंत्रित राहावी, यासाठी तसेच पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या आरोग्याचे दृष्टीने करण्यात आली आहे.

धार्मिक कार्यक्रम व निवडणुका यामुळे कोरोना महामारी वाढली

मागील वर्षी कुंभमेळा, पंढरपूर पोट निवडणूक,तसेच इतर ग्रामपंचायत निवडणुका,दिल्लीतील धार्मिक कार्यक्रम यामुळे देखील कोरोना महामारी वाढली. हा अनुभव लक्षात घेता, शासनाने व्यापक लोकहितासाठी सामाजिक आरोग्याची काळजी घेवून कोरोना महामारी वाढू नये, यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा. पायी वारीचा हट्ट सुरू आहे तो सोडावा, तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीचा विचार करून कोरोना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे. सोहळा बसने ये-जा करताना, प्रथा परंपरांचे पालन व्हावे. प्रस्थानानंतर व परत वारीहून आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे करून आषाढीवारी सोहळा साजरा करावा. मोजक्याच लोकांत शासनाचे कोरोना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा. यासाठी शासनाकडे मागणी निवेदनातून करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थांचे वतीने ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी सांगितले.

हेही वाचा- यंदा आषाढी वारी झालीच पाहिजे; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

आळंदी (पुणे)- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत व्हावा अशी मागणी करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांचे वतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कु-हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले.

आळंदी ते पंढरपूर माऊलींचा पालखी सोहळा याही वर्षी लालपरीने

पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा
पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा

सन २०२० मध्ये सुरू झालेले कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना संकट अजून पुर्णपणे संपलेले नाही. कोरोना गर्दीत जास्त वाढत असल्याने गर्दी नियंत्रित राहावी, यासाठी तसेच पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या आरोग्याचे दृष्टीने करण्यात आली आहे.

धार्मिक कार्यक्रम व निवडणुका यामुळे कोरोना महामारी वाढली

मागील वर्षी कुंभमेळा, पंढरपूर पोट निवडणूक,तसेच इतर ग्रामपंचायत निवडणुका,दिल्लीतील धार्मिक कार्यक्रम यामुळे देखील कोरोना महामारी वाढली. हा अनुभव लक्षात घेता, शासनाने व्यापक लोकहितासाठी सामाजिक आरोग्याची काळजी घेवून कोरोना महामारी वाढू नये, यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा. पायी वारीचा हट्ट सुरू आहे तो सोडावा, तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीचा विचार करून कोरोना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे. सोहळा बसने ये-जा करताना, प्रथा परंपरांचे पालन व्हावे. प्रस्थानानंतर व परत वारीहून आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे करून आषाढीवारी सोहळा साजरा करावा. मोजक्याच लोकांत शासनाचे कोरोना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा. यासाठी शासनाकडे मागणी निवेदनातून करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थांचे वतीने ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी सांगितले.

हेही वाचा- यंदा आषाढी वारी झालीच पाहिजे; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.