ETV Bharat / state

पुणे शहरात कोरोना आटोक्यात, मात्र हलगर्जीपणा न करण्याचे प्रशासनाचे आवाहन....

author img

By

Published : Oct 30, 2020, 2:17 PM IST

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कोरोनाचे नवीन रुग्ण पाचशेच्या आत आढळत आहेत. त्यामुळे शहरातील १० हजारांपेक्षा अधिक खाटा सध्या रिकाम्या आहेत. असे असले तरी, कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हलगर्जीपणा न करता संपूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. तरच ही लाट थोपवता येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे शहरात कोरोना आटोक्यात, मात्र हलगर्जी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे शहरात कोरोना आटोक्यात, मात्र हलगर्जी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे - शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या 8 महिन्यांनंतर आता रुग्णवाढीचा दर कमी झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने पुणेकरांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.

पुणे शहरात कोरोना आटोक्यात, मात्र हलगर्जी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यात कोरोना संसर्गाची सुरुवात ही पुणे शहरात झाली होती. कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळला होता आणि त्यानंतर रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. एप्रिल-मे काळात संसर्गाचा वेग वाढत होता आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना साथीच्या फैलावाने कळस गाठला. दररोज 2 हजार नवे रुग्ण या काळात सापडत होते. त्यात रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याचे चित्र होते. ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर खाटा कमी पडत असल्याचे चित्र असल्याने शहरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कोविड सेंटर वाढविण्यात आले. तसेच आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढविण्यात आले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शहराच्या विविध भागात नवनवे रुग्ण आढळत होते आणि रुग्णसंख्या केवळ आठ दिवसांतच दुप्पट होत असे. नंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबरअखेरीस आता रुगणसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा तब्बल 200 दिवसांवर गेल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, अद्याप संकट पूर्णपणे संपलेले नाही याची जाणीव प्रशासनाकडून दिली जात आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नवीन रुग्णसंख्या पाचशेच्या आतच येत आहे. त्यामुळे शहरातील १० हजारांपेक्षा अधिक खाटा सध्या रिकाम्या आहेत. सध्याचे दिलासादायक चित्र असले तरी, हलगर्जीपणा न करता संपूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. कारण, कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर ही लाट थोपवता येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - फेसबुकवरून पैशांची मागणी होतेय तर सावधान! पिंपरीत 8 तक्रारी दाखल

पुणे - शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या 8 महिन्यांनंतर आता रुग्णवाढीचा दर कमी झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने पुणेकरांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.

पुणे शहरात कोरोना आटोक्यात, मात्र हलगर्जी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यात कोरोना संसर्गाची सुरुवात ही पुणे शहरात झाली होती. कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळला होता आणि त्यानंतर रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. एप्रिल-मे काळात संसर्गाचा वेग वाढत होता आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना साथीच्या फैलावाने कळस गाठला. दररोज 2 हजार नवे रुग्ण या काळात सापडत होते. त्यात रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याचे चित्र होते. ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर खाटा कमी पडत असल्याचे चित्र असल्याने शहरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कोविड सेंटर वाढविण्यात आले. तसेच आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढविण्यात आले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शहराच्या विविध भागात नवनवे रुग्ण आढळत होते आणि रुग्णसंख्या केवळ आठ दिवसांतच दुप्पट होत असे. नंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबरअखेरीस आता रुगणसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा तब्बल 200 दिवसांवर गेल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, अद्याप संकट पूर्णपणे संपलेले नाही याची जाणीव प्रशासनाकडून दिली जात आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नवीन रुग्णसंख्या पाचशेच्या आतच येत आहे. त्यामुळे शहरातील १० हजारांपेक्षा अधिक खाटा सध्या रिकाम्या आहेत. सध्याचे दिलासादायक चित्र असले तरी, हलगर्जीपणा न करता संपूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. कारण, कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर ही लाट थोपवता येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - फेसबुकवरून पैशांची मागणी होतेय तर सावधान! पिंपरीत 8 तक्रारी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.