ETV Bharat / state

VIDEO : परतीच्या पावसामुळे कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हालाकीच्या परिस्थितीत केवळ शेतमालाचा आधार असताना पावसामुळे कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

author img

By

Published : Nov 9, 2019, 1:46 PM IST

Updated : Nov 9, 2019, 3:15 PM IST

परतीच्या पावसामुळे कांद्याने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हालाकीच्या परिस्थितीत केवळ शेतमालाचा आधार असताना पावसामुळे कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

परतीच्या पावसामुळे कांद्याने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी

आंबेगाव तालुक्यातील नामदेव बाबुराव रोडे आणि फुलाबाई रोडे हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतात कांदा पिकवतात. मागील वर्षी त्यांना आपल्या शेतात 150 पिशवी कांदा पिकवण्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला होता. पिकवलेल्या कांद्यापासून त्यांना 45 हजार रुपये मिळाले होते. गेल्या वर्षी मेहनत करूनही त्यांना पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागला होता. यावर्षीही त्यांनी आपल्या शेतात दोन एकर कांदा लागवड केली. परंतु, परतीच्या पावसाने झोडपल्याने त्यांचा काढणीला आलेला कांदा शेतातच सडून गेला. केवळ पाचच पिशवी कांदा त्यांना विकता आला. आजच्या बाजारभावानुसार त्यांचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या

जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील सरासरी कांदा लागवड (सरासरी)

खेड - 6 हजार हेक्टर

आंबेगाव - 8 हजार हेक्टर

जुन्नर - 9 हजार हेक्टर

शिरुर - 8 हजार हेक्टर

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हालाकीच्या परिस्थितीत केवळ शेतमालाचा आधार असताना पावसामुळे कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

परतीच्या पावसामुळे कांद्याने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी

आंबेगाव तालुक्यातील नामदेव बाबुराव रोडे आणि फुलाबाई रोडे हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतात कांदा पिकवतात. मागील वर्षी त्यांना आपल्या शेतात 150 पिशवी कांदा पिकवण्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला होता. पिकवलेल्या कांद्यापासून त्यांना 45 हजार रुपये मिळाले होते. गेल्या वर्षी मेहनत करूनही त्यांना पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागला होता. यावर्षीही त्यांनी आपल्या शेतात दोन एकर कांदा लागवड केली. परंतु, परतीच्या पावसाने झोडपल्याने त्यांचा काढणीला आलेला कांदा शेतातच सडून गेला. केवळ पाचच पिशवी कांदा त्यांना विकता आला. आजच्या बाजारभावानुसार त्यांचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या

जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील सरासरी कांदा लागवड (सरासरी)

खेड - 6 हजार हेक्टर

आंबेगाव - 8 हजार हेक्टर

जुन्नर - 9 हजार हेक्टर

शिरुर - 8 हजार हेक्टर

Intro:Anc__उत्तर पुणे जिल्ह्याच्या सुरू आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतक-यांच्या डोळ्यातुन परतीच्या पाऊसात कांद्याने पाणी काढलय..चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट....

Vo__आंबेगाव तालुक्यातील नामदेव बाबुराव रोडे आणि फुलाबाई रोडे हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शेतात कांदा पिकवता.मागील वर्षी त्यांना आपल्या शेतात 150 पिशवी कांदा पिकवण्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च आला आणि कांद्या पासून त्यांना 45 हजार रुपये मिळाले त्यामुळे मागील वर्षी त्यांना मेहनत करूनही पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागला.

Byte__फुलाबाई रोडे (नुकसान ग्रस्त शेतकरी महिला)

Vo__या वर्षी त्यांनी आपल्या शेतात दोन एकर कांदा लागवड केली होती परंतु परतीच्या पाऊसाने झोडपल्याने त्यांचा काढणीला आलेलेटा कांदा शेतातच सडून गेल्याने केवळ पाचच पिशवी कांदा त्यांना विकता आला आणि बाकीचा कांदा शेतातच सडून गेल्याने आजच्या बाजारभावा नुसार त्याचे जवळपास दोन लाख रूपये नुकसान झाले आहे.

Byte__नामदेव रोडे (नुकसान ग्रस्त शेतकरी

Vo__उत्तर पुणे जिल्ह्याच्या दरवर्षी जवळपास किती क्षेत्रावर कांदा पिकवला जातो यावरती नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून

कांदा उत्पादनासाठी प्रति किलो १५ रु खर्च,

# कांदा पिकांवर शेतक-यांची पुढील वाटचाल..
*मुलगा व मुलीची लग्न..
*मुलांची शिक्षण...
*घरातील सदस्यांचे आजार व दवाखाना खर्च...
*बँकांची व सावकारांची कर्ज...
*यातुन शिल्लक राहिले तर स्वतचा संसार...
*कसं जगायचं आपल्या बळीराजाच्या

उत्तर पुणे जिल्ह्यातील सरासरी कांदा लागवड..

*खेड __ 6 हजार हेक्टर सरासरी
*आंबेगाव__8 हजार हेक्टर सरासरी
*जुन्नर_ 9_हजार हेक्टर सरासरी
*शिरुर_ 8 हजार हेक्टर सरासरी

ग्राफीक्स आऊट


Vo__त्यामुळे रोडे पती-पत्नी दाम्पत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नरतील शेतकऱ्यांची हि अशीच बिकट अवस्था असून सध्या परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.

Byte_निलेश पडवळ(नुकसान ग्रस्त शेतकरी)

End vo__मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेली कांदाशेती पाण्यात गेल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आले असताना सरकार मात्र कागदी घोडे नाचवत पंचनामे करत असुन प्रत्येक्षात मदत कधी मिळणार हेच पहावे लागणार आहेBody:पँकेज स्टोरी करावी...Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.