ETV Bharat / state

पुणेकरांना दिलासा.. गणेशोत्सव होईपर्यंत शहरात पाणी कपात नाही

author img

By

Published : Aug 4, 2020, 9:16 PM IST

गेल्या दोन दिवसांपासून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे, गणेशोत्सवापर्यंत पाणी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसून, त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरण परिसरात मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता, गणेश उत्सव होईपर्यंत. शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसून, त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत आज(मंगळवार) महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. पुणे शहराला टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजच्या तारखेला फक्त ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे म्हणजेच ९ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आजच्या बैठकीत हवामान खात्याशी चर्चाही करण्यात आली. त्यात ५ ऑगस्टपर्यंत शहर आणि जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर महिना अखेरपर्यंत १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि आगामी गणेशोत्सव लक्षात घेता आजच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेतला गेला नाही. मात्र गणेशोत्सव दरम्यान त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन बैठक घेतली जाईल आणि त्यानंतरच शहराच्या पाणी नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरण परिसरात मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता, गणेश उत्सव होईपर्यंत. शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसून, त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत आज(मंगळवार) महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. पुणे शहराला टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजच्या तारखेला फक्त ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे म्हणजेच ९ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आजच्या बैठकीत हवामान खात्याशी चर्चाही करण्यात आली. त्यात ५ ऑगस्टपर्यंत शहर आणि जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर महिना अखेरपर्यंत १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि आगामी गणेशोत्सव लक्षात घेता आजच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेतला गेला नाही. मात्र गणेशोत्सव दरम्यान त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन बैठक घेतली जाईल आणि त्यानंतरच शहराच्या पाणी नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.