पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) दोन दिवसापासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी येथील शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधला. वयाच्या 82 व्या वर्षीही ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात, म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून संबोधले (Sharad Pawar on Baramati visit) जाते.
शेतकऱ्यांशी संवाद : आज दिनांक एक जानेवारी रोजी इंदापूर तालुक्यातील बोरी गावाला भेट (Sharad Pawar meet grapse producer farmers ) दिली. यावेळी बोरी गावच्या ग्रामस्थांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले. पवार यांनी बोरी गावातील रामहरी जगताप या शेतकऱ्याच्या द्राक्ष शेती प्लॉटला भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी माहिती घेऊन विचारपूस केली. दरम्यान श्रीराम चौक बोरी येथे व गॅलेक्सी फ्रेश कोल्ड स्टोरेज येथे पवार यांचा सत्कार करण्यात आला. रीलायबल कोल्ड स्टोरेज बोरी येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद (farmers of Bori in Indapur taluka) साधला.
शेतकऱ्यांचे कैवारी : बोरी गाव हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध (Sharad Pawar in Bori) आहे. येथील द्राक्ष साता समुद्रापार चायना श्रीलंका थायलंड मलेशिया दुबई आधी देशात बोरीची द्राक्ष मोठ्या प्रमाणात निर्यात होते. वयाची 82 पार केल्यावरही तरुणांना लाजवेल असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. या वयात ही ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याचे काम करत असल्याचे दिसते म्हणूनच त्यांना जाणता राजा, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून संबोधले (Communicating with farmers of Bori) जाते.
सरकारवर हल्लाबोल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरत्या वर्षाच्या सायंकाळी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशात सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले. अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होईल असे वाटले होते, मात्र सरकार विरोधकांना बोलूच देत नसल्याची भूमीका घेत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन दिला, त्यावरुन राज्यकर्त्यांनी काही शिकले पाहिजे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.शेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी काम करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली (farmers of Bori in Indapur taluka) होती.