ETV Bharat / state

आपल्यावर आफत येऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून अण्णा हजारेंची मनधरणी...!

author img

By

Published : Jan 29, 2021, 7:46 PM IST

शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना अण्णा हजारे शांत राहतील, असे वाटत नाही. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते, मात्र भाजप सत्तेच्या काळजीपोटी आणि आपल्यावर आफत येऊ नये, यासाठी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

पुणे
पुणे

पुणे - शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना अण्णा हजारे शांत राहतील, असे वाटत नाही. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते, मात्र भाजप सत्तेच्या काळजीपोटी आणि आपल्यावर आफत येऊ नये, यासाठी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.

पुणे

शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्याचे आंदोलन हे भारताच्या इतिहासातले एक ऐतिहासिक आंदोलन आहे. मात्र, देशाचा प्रमुख त्यांच्याशी बोलतही नाही, देशाचा गृहमंत्री राज्याच्या निवडणुकांकडे लक्ष देतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे शेतकऱ्यांच्या भावना ओळखून घ्यायला तयार नाहीत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाहीत, उलट हे आंदोलन चिरडून टाकण्याचे घृणास्पद काम हे सरकार करत आहे, त्याचा निषेध सर्वांनी केला पाहिजे, असे थोरात म्हणाले.

नवीन आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. भाजपमधील आमदारांची घरवापसीसाठी चुळबुळ सुरू आहे तर काही नवीन आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांना समजवण्यासाठी लवकरच भाजपची सत्ता येईल, असे पालुपद फडणवीस लावत असतात असे थोरात म्हणाले.

पुणे - शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना अण्णा हजारे शांत राहतील, असे वाटत नाही. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते, मात्र भाजप सत्तेच्या काळजीपोटी आणि आपल्यावर आफत येऊ नये, यासाठी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.

पुणे

शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्याचे आंदोलन हे भारताच्या इतिहासातले एक ऐतिहासिक आंदोलन आहे. मात्र, देशाचा प्रमुख त्यांच्याशी बोलतही नाही, देशाचा गृहमंत्री राज्याच्या निवडणुकांकडे लक्ष देतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे शेतकऱ्यांच्या भावना ओळखून घ्यायला तयार नाहीत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाहीत, उलट हे आंदोलन चिरडून टाकण्याचे घृणास्पद काम हे सरकार करत आहे, त्याचा निषेध सर्वांनी केला पाहिजे, असे थोरात म्हणाले.

नवीन आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. भाजपमधील आमदारांची घरवापसीसाठी चुळबुळ सुरू आहे तर काही नवीन आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांना समजवण्यासाठी लवकरच भाजपची सत्ता येईल, असे पालुपद फडणवीस लावत असतात असे थोरात म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.