ETV Bharat / state

दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिल

शेतमाल कवडीमोल किमतीला विकला जात आहे. जोडधंदा असणाऱ्या दुधाचीही तिच परिस्थिती आहे. सरकारच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाच्या नावे फसवणूक होत आहे. त्यामुळे या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे 'जगायचं तरी कसं' असा प्रश्न उभा ठाकला आहे.

author img

By

Published : Feb 11, 2019, 3:52 PM IST

गायी

पुणे - दुधाला योग्य दर मिळवा, यासाठी राज्यभर आंदोलने झाली. याच आंदोलनामुळे राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेतून सुरू झालेली योजना अवघ्या ६ महिन्यातच गुंडाळण्यात आली आहे. तिला मुदतवाढ देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा हवेत विरली आहे.

दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिल
या अनुदानाची ४०० कोटींपेक्षाही जास्त थकबाकी राज्य सरकारकडे झाली आहे. दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिलराज्य सरकारने १ ऑगस्ट २०१८ पासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू केला. त्याची मुदत ३१ ऑक्‍टोबर २०१८ ला संपणार होती. मात्र, त्याआधीच या योजनेला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा सरकारने केली. हा दुसरा टप्पा ३१ जानेवारी २०१९ ला संपला आहे. मात्र, त्याआधीच या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केली. शिवाय, शेतकऱ्यांना त्यांच्या दूध अनुदानाची सर्व रक्कम मिळेल. त्यासाठी सरकारकडील थकबाकीही लवकरच दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. राज्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळणारा शेतकरी ही योजना गुंडाळल्याने हवालदिल झाला आहे.
undefined

त्यातच सरकारने अनुदानाची रक्कम अडवून शेतकऱ्यांची अडवणूक करणे योग्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुध उत्पादन करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाचा बोजा अंगावर घ्यायला लागतो. सध्याच्या महागाईच्या काळात जनावरांचा चारा, भुसार माल यामध्ये मोठा खर्च होत आहे. त्यामुळे दुधासाठी होणारा खर्च पाहता दुधाला बाजारभाव मिळत नाही आणि सरकारही फसवणूक करत आहे. शेतमाल कवडीमोल किमतीला विकला जात आहे. जोडधंदा असणाऱ्या दुधाचीही तिच परिस्थिती आहे. सरकारच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाच्या नावे फसवणूक होत आहे. त्यामुळे या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे 'जगायचं तरी कसं' असा प्रश्न उभा ठाकला आहे.

पुणे - दुधाला योग्य दर मिळवा, यासाठी राज्यभर आंदोलने झाली. याच आंदोलनामुळे राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेतून सुरू झालेली योजना अवघ्या ६ महिन्यातच गुंडाळण्यात आली आहे. तिला मुदतवाढ देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा हवेत विरली आहे.

दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिल
या अनुदानाची ४०० कोटींपेक्षाही जास्त थकबाकी राज्य सरकारकडे झाली आहे. दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिलराज्य सरकारने १ ऑगस्ट २०१८ पासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू केला. त्याची मुदत ३१ ऑक्‍टोबर २०१८ ला संपणार होती. मात्र, त्याआधीच या योजनेला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा सरकारने केली. हा दुसरा टप्पा ३१ जानेवारी २०१९ ला संपला आहे. मात्र, त्याआधीच या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केली. शिवाय, शेतकऱ्यांना त्यांच्या दूध अनुदानाची सर्व रक्कम मिळेल. त्यासाठी सरकारकडील थकबाकीही लवकरच दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. राज्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळणारा शेतकरी ही योजना गुंडाळल्याने हवालदिल झाला आहे.
undefined

त्यातच सरकारने अनुदानाची रक्कम अडवून शेतकऱ्यांची अडवणूक करणे योग्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुध उत्पादन करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाचा बोजा अंगावर घ्यायला लागतो. सध्याच्या महागाईच्या काळात जनावरांचा चारा, भुसार माल यामध्ये मोठा खर्च होत आहे. त्यामुळे दुधासाठी होणारा खर्च पाहता दुधाला बाजारभाव मिळत नाही आणि सरकारही फसवणूक करत आहे. शेतमाल कवडीमोल किमतीला विकला जात आहे. जोडधंदा असणाऱ्या दुधाचीही तिच परिस्थिती आहे. सरकारच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाच्या नावे फसवणूक होत आहे. त्यामुळे या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे 'जगायचं तरी कसं' असा प्रश्न उभा ठाकला आहे.

Intro:Anc-- शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर मिळवा यासाठी राज्यभर आंदोलन झाली याच आंदोलनामुळे राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली मात्र या घोषणेतुन सुरु झालेली योजना अवघ्या सहाच महिन्यांत गुंडाळण्यात आली असून, तिला मुदतवाढ देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा हवेत विरली आहे. या अनुदानाची 400 कोटींपेक्षाही जास्त थकबाकी राज्य सरकारकडे झाली आहे.

Vo--राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१८ पासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू केला त्याची मुदत ३१ ऑक्‍टोबर २०१८ ला संपणार होती मात्र त्याआधीच या योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा सरकारने केली होती. हा दुसरा टप्पा ३१ जानेवारी २०१९ ला संपला आहे.मात्र त्याआधीच या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केली होती. शिवाय, शेतकऱ्यांना त्यांच्या दूध अनुदानाची सर्व रक्कम मिळेल. त्यासाठी सरकारकडील थकबाकीही लवकरच दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

Byte :- विष्णु हिंगे..चेअरमन कात्रज संघ

ग्राफिक्स...in..

 दररोज शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाणार दूध  :- १ कोटी लिटर अंदाजे
 
 अनुदानापोटी प्रतिदिन मिळणारी रक्कम : ५ कोटी रुपये अंदाजे

 आतापर्यंत प्रत्यक्षात मिळालेले अनुदान : ३५० कोटी रुपये 
(७० दिवस) अंदाजे

 दूध अनुदानाची सरकारकडील थकबाकी  : ४०० कोटी पेक्षा जास्त..

ग्राफिक्स ...out.
 
Vo--राज्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. त्यामुळे अगोदरच शेतकरी दुष्काळाने होरपळून गेला आहे.ऐन दुष्काळात ही योजना गुंडाळल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच सरकारने अनुदानाची रक्कम अडवून शेतकऱ्यांची अडवणूक करणं योग्य नसल्याचे शेतकरी सांगतात..

Byte :- बाळासाहेब पठारे :- शेतकरी

Byte :- महादेव आगरकर शेतकरी

Vo--दुध उत्पादन करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाचा बोजा अंगावर घ्यायला लागतो सध्याच्या महाघाईच्या काळात जनावरांचा चारा,भुसार माल,यामध्ये मोठा खर्च होत आहे त्यामुळे दुधासाठी होणारा खर्च पहाता दुधाला बाजारभाव मिळत नाही त्यातुन सरकारच फसवणुक करत आहे

End vo--शेतमाल कवडीमोल किंमतीला विकला जातोय त्यातुन दुधाचेही तेच होतंय आणि सरकारच्या माध्यमातुन दुध उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाची होणारी फवणुक आता तुम्ही सांगा जगायचं तरी कसं...Body:स्पेशल स्टोरीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.