ETV Bharat / state

आळंदीत 'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' अभियान, चला वारीला टीमचा उपक्रम

author img

By

Published : May 27, 2019, 10:30 AM IST

Updated : May 27, 2019, 12:38 PM IST

नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदीमधील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या आरोग्याच्या हेतूने आळंदी येथे इंद्रायणी स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली.

'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' अभियान

पुणे - काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारीची आळंदीत तयारी सुरु झाली आहे. यासाठी 'चला वारी'ला या टीमच्या माध्यमातून 'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून इंद्रायणी नदीमधील मैला, निर्माल्य, कचरा, प्लॅस्टीक, कपडे व इतर अस्वच्छ पदार्थ बाहेर काढण्यात आले.

आळंदीत 'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' अभियान

नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदीमधील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या आरोग्याच्या हेतूने इंद्रायणी स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली.

या मोहीमेसाठी धानोरी विश्रांतवाडी भागातील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर हिमगिरीयन्स, लुंकड रिअॅलिटी ग्रुप, लोकराज्य संघ व इतर सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते असे सर्वजण मिळून 'चला वारी'ला ही टीम तयार केली. या टीममार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहीमेत केवळ नदीकाठचा परिसर स्वच्छ न करता नदीमध्ये उतरुन तरुण, तरुणी, महिला आणि अबालवृद्धांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात ९ ट्रॅक्टर भरुन कचरा काढण्यात आला.

दरम्यान, आषाढी वारीत सामाजिक बांधिलकीतून चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले जाते. सध्याची तरुणाई असे उपक्रम उत्सुपुर्तपणे करताना पाहायला मिळतात.

पुणे - काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारीची आळंदीत तयारी सुरु झाली आहे. यासाठी 'चला वारी'ला या टीमच्या माध्यमातून 'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून इंद्रायणी नदीमधील मैला, निर्माल्य, कचरा, प्लॅस्टीक, कपडे व इतर अस्वच्छ पदार्थ बाहेर काढण्यात आले.

आळंदीत 'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' अभियान

नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदीमधील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या आरोग्याच्या हेतूने इंद्रायणी स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली.

या मोहीमेसाठी धानोरी विश्रांतवाडी भागातील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर हिमगिरीयन्स, लुंकड रिअॅलिटी ग्रुप, लोकराज्य संघ व इतर सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते असे सर्वजण मिळून 'चला वारी'ला ही टीम तयार केली. या टीममार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहीमेत केवळ नदीकाठचा परिसर स्वच्छ न करता नदीमध्ये उतरुन तरुण, तरुणी, महिला आणि अबालवृद्धांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात ९ ट्रॅक्टर भरुन कचरा काढण्यात आला.

दरम्यान, आषाढी वारीत सामाजिक बांधिलकीतून चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले जाते. सध्याची तरुणाई असे उपक्रम उत्सुपुर्तपणे करताना पाहायला मिळतात.

Intro:Anc__काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारीची देवाच्या आळंदीत तयारी सुरु झाली असुन छावा संघटनेच्यावतीने देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीतील स्वच्छता अभियान संपन्न.चला वारीला टीम यांच्या माध्यमातुन आयोजित "वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीची" अभियान इंद्रायणी नदी मधील मैला, निर्माल्य, कचरा, प्लॅस्टीक, कपडे व इतर अस्वच्छ पदार्थ बाहेर काढण्यात आले.

स्वच्छता मोहीमेमध्ये केवळ नदीकाठ परिसर स्वच्छ न करतां नदीमध्ये उतरुन तरुण, तरुणी, महिला आणि अबालवृद्धांचा सहभागातून मोठ्या प्रमाणात ९ ट्रॅक्टर भरुन कचरा काढण्यात आला.

नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदी मधील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या आरोग्याच्या हेतूने इंद्रायणी स्वच्छ केली आहे.या मोहीमेत धानोरी विश्रांतवाडी भागातील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर हिमगिरीयन्स, लुंकड रिॲलिटी ग्रुप, लोकराज्य संघ व इतर सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान आषाढी वारीत वारक-यांच्या मदतीला येणाऱ्या सामाजिक बांधिलकीतुन चालवल्या जाणा-या उपक्रमांचे कौतुकच केले जाते सध्याची तरुणाई असे उपक्रम उत्सुपुर्तपणे करताना पहायला मिळतात Body:...Conclusion:
Last Updated : May 27, 2019, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.