ETV Bharat / state

'योग्य वेळी राज्याची सत्ता हातात, शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं करणार'

author img

By

Published : Jan 16, 2020, 1:02 PM IST

योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आली असून, घड्याळवाले माझे पार्टनर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येणाऱ्या काळात शेतीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे - योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आली असून, घड्याळवाले माझे पार्टनर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येणाऱ्या काळात शेतीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राजकारणातील मतभिन्नता हा वेगळा विषय असून, चांगल्या कामचा धिक्कार करणे म्हणजे करंटेपणा आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात पवार कुटुंबीयांचे असणारे योगदान नाकारता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

'कृषिक महोत्सव २०२०' या महोत्सवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत उद्धाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, अभिनेता आमिर खान, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलतना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. नवीन बदल करुन कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले.

इथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो

शरद पवार यांनी या महोत्सवासाठी आग्रहाचे आमंत्रण दिले होते. येथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. हे प्रदर्शन प्रात्यक्षिकांसह आहे. अभिमान वाटावा असे काम पवार कुटुंबुयांनी केले आहे. प्रात्यक्षिकांसह भरणारे हे देशातील पहिलेच प्रदर्शन असावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.



लोकसंख्या वाढीमुळे अनेक गोष्टीवर ताण

लोकसंख्या वाढीमुळे अनेक गोष्टीवर ताण येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करायला हवा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे. बाकी काहीही बनवता येईल मात्र, पाणी बनवता येणार नसल्याचे ठाकरे म्हणाले.

माळरानावर नंदनवन उभारणे सोपे नाही

माळरानावर नंदनवन उभे करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, पवार कुटुंबीयांनी ते शक्य करुन दाखवले आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांनी शेती क्षेत्रात चांगले काम केल्याचे ठाकरे म्हणाले.

पुणे - योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आली असून, घड्याळवाले माझे पार्टनर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येणाऱ्या काळात शेतीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राजकारणातील मतभिन्नता हा वेगळा विषय असून, चांगल्या कामचा धिक्कार करणे म्हणजे करंटेपणा आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात पवार कुटुंबीयांचे असणारे योगदान नाकारता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

'कृषिक महोत्सव २०२०' या महोत्सवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत उद्धाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, अभिनेता आमिर खान, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलतना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. नवीन बदल करुन कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले.

इथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो

शरद पवार यांनी या महोत्सवासाठी आग्रहाचे आमंत्रण दिले होते. येथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. हे प्रदर्शन प्रात्यक्षिकांसह आहे. अभिमान वाटावा असे काम पवार कुटुंबुयांनी केले आहे. प्रात्यक्षिकांसह भरणारे हे देशातील पहिलेच प्रदर्शन असावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.



लोकसंख्या वाढीमुळे अनेक गोष्टीवर ताण

लोकसंख्या वाढीमुळे अनेक गोष्टीवर ताण येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करायला हवा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे. बाकी काहीही बनवता येईल मात्र, पाणी बनवता येणार नसल्याचे ठाकरे म्हणाले.

माळरानावर नंदनवन उभारणे सोपे नाही

माळरानावर नंदनवन उभे करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, पवार कुटुंबीयांनी ते शक्य करुन दाखवले आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांनी शेती क्षेत्रात चांगले काम केल्याचे ठाकरे म्हणाले.

Intro:Body:

'योग्य वेळी राज्याची सत्ता हातात, शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं करणार'

 

पुणे -  योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आली असून, घड्याळवाले माझे पार्टनर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येणाऱ्या काळात शेतीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांना स्वत: च्या पायावर उभे करणार असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले. राजकारणातील मतभिन्नता हा वेगळा विषय असून, चांगल्या कामचा धिक्कार करणे म्हणजे करंटेपणा आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात पवार कुटुंबीयांचे असणारे योगदान नाकारता येणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.



कृषिक महोत्सव २०२० या महोत्सवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत उद्धाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे,  अभिनेता आमिर खान, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलतना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. नवीन बदल करुन कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले.



इथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो



शरद पवार यांनी या महोत्सवासाठी आग्रहाचे आमंत्रण दिले होते. येथे आसो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुलो असतो, असे वक्तव्य मुक्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. हे प्रदर्शन प्रात्यक्षिकांसह आहे. अभिमान वाटावा असे काम पवार कुटुंबुयांनी केले आहे. प्रात्यक्षिकांसह भरणारे हे देशातील पहिलेच प्रदर्शन असावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

  

लोकसंख्या वाढीमुळे अनेक गोष्टीवर ताण

लोकसंख्या वाढीमुळे अनेक गोष्टीवर ताण येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करायला हवा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे. बाकी काहीही बनवता येईन मात्र, पाणी बनवता येणार नसल्याचे ठाकरे म्हणाले.



माळराणावर नंदनवन उभारणे सोपे नाही

माळराणावर नंदनवन उभे करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, पवार कुटुंबीयांनी तेशक्य करुन दाखवले आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांनी शेती क्षेत्रात चांगले काम केल्याचे ठाकरे म्हणाले.

 





 


Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.