ETV Bharat / state

आमीर खानची बारामतीत मुक्काम करण्याची इच्छा

author img

By

Published : Jan 16, 2020, 9:04 PM IST

Updated : Jan 16, 2020, 11:27 PM IST

अ‌ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टव्दारे कृषिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी आमिर बोलत होता. यावेळी त्याने प्रदर्शनाचे भव्य रूप पाहता एक दिवसात सगळे शिकता येणार नाही. त्यासाठी ३-४ दिवस मुक्काम करावा लागेल, अशी भावना आमिरने व्यक्त केली.

आमिर खान, सिनेअभिनेता
आमिर खान, सिनेअभिनेता

पुणे - बारामती हे विकासाचे रोडमॉडेल म्हणून ओळखले जाते. बारामतीच्या विकासाबाबत आजवर अनेक दिग्गजांनी तसे बोलूनही दाखवले आहे. अ‌ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पवार कुंटुंबीयांनी बारामती आणि परिसराचा खूप मोठा विकास केला आहे. या ट्रस्टव्दारे आयोजित करण्यात येत असलेल्या कृषीप्रदर्शनाला गेल्या दोन-तीन वर्षापासून येण्याचा मानस होता. याठिकाणी येऊन खूप काही शिकण्याची इच्छा होती. मात्र, या प्रदर्शनाचे भव्य रूप पाहता एका दिवसात काही शिकता येणार नाही, त्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल, असे भाव सिनेअभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.

कृषिक २०२० मध्ये आमिर खान
कृषिक २०२० महोत्सव

बारामती येथील अ‌ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमिर बोलत होता. पानी फाऊंडेशनच्यावतीने आम्ही ठिकठिकाणीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत निसर्ग, पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्याबाबचे शिक्षण खूप गरजेचे आहे. मागील ४ वर्षापासून पाणी व्यवस्थापना संदर्भात गावातील लोकांना आम्ही माहिती देत आहोत. यापुढे पाण्याच्या नियोजनाबरोबरच पीक नियोजन, जमीनीचे आरोग्य, गवत लागवड क्षेत्र निर्माण करणे, रीफॉरेस्ट्रेशन या ५ बाबींवर काम करणार असल्याचे आमिरने सांगितले.

आमिर खान, सिनेअभिनेता

हेही वाचा - कृषिक २०२० महोत्सव : 'त्या' सत्कारावर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

आजच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी नव्हे, तर शिकण्यासाठी आलो आहे. या प्रदर्शनाचे भव्य रूप पाहता एका दिवसात काही शिकता येणार नाही. त्यासाठी ३-४ दिवस मुक्काम करावा लागेल, असे आमिर म्हणाला. ग्रामीण भागातील विविध प्रश्नांसंदर्भात पवार साहेबांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्या सोडवण्याचे समाधान असल्याचेही त्याने सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे - बारामती हे विकासाचे रोडमॉडेल म्हणून ओळखले जाते. बारामतीच्या विकासाबाबत आजवर अनेक दिग्गजांनी तसे बोलूनही दाखवले आहे. अ‌ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पवार कुंटुंबीयांनी बारामती आणि परिसराचा खूप मोठा विकास केला आहे. या ट्रस्टव्दारे आयोजित करण्यात येत असलेल्या कृषीप्रदर्शनाला गेल्या दोन-तीन वर्षापासून येण्याचा मानस होता. याठिकाणी येऊन खूप काही शिकण्याची इच्छा होती. मात्र, या प्रदर्शनाचे भव्य रूप पाहता एका दिवसात काही शिकता येणार नाही, त्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल, असे भाव सिनेअभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.

कृषिक २०२० मध्ये आमिर खान
कृषिक २०२० महोत्सव

बारामती येथील अ‌ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमिर बोलत होता. पानी फाऊंडेशनच्यावतीने आम्ही ठिकठिकाणीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत निसर्ग, पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्याबाबचे शिक्षण खूप गरजेचे आहे. मागील ४ वर्षापासून पाणी व्यवस्थापना संदर्भात गावातील लोकांना आम्ही माहिती देत आहोत. यापुढे पाण्याच्या नियोजनाबरोबरच पीक नियोजन, जमीनीचे आरोग्य, गवत लागवड क्षेत्र निर्माण करणे, रीफॉरेस्ट्रेशन या ५ बाबींवर काम करणार असल्याचे आमिरने सांगितले.

आमिर खान, सिनेअभिनेता

हेही वाचा - कृषिक २०२० महोत्सव : 'त्या' सत्कारावर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

आजच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी नव्हे, तर शिकण्यासाठी आलो आहे. या प्रदर्शनाचे भव्य रूप पाहता एका दिवसात काही शिकता येणार नाही. त्यासाठी ३-४ दिवस मुक्काम करावा लागेल, असे आमिर म्हणाला. ग्रामीण भागातील विविध प्रश्नांसंदर्भात पवार साहेबांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्या सोडवण्याचे समाधान असल्याचेही त्याने सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

Intro:Body:बारामती-   बारामतीत चार दिवस मुक्काम करण्याची इच्छा- अमीर खान
बारामती हे विकासाचे रोडमाँडेल म्हणून ओळखले जाते. बारामतीच्या विकासाबाबत आजवर अनेक दिग्गजांनी तसे बोलून ही दाखवले आहे. अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पवार कुंटुंबियांनी बारामती आणि परिसराचा खुप मोठा विकास केला आहे. हे पाहण्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल. ट्रस्टव्दारे आयोजित करण्यात येत असलेल्या कृषिप्रदर्शनाला मागील दोन तीन वर्षापासून येण्याचा माझा मानस होता. याठिकाणी येऊन खुप काही शिकाव अशी माझी इच्छा होती असे मत सिनेअभिनेते अमिर खान यांनी व्यक्त केले.  
बारामती येथील अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनाचे मुख्यमंञ्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पाणी फाऊनंडेशनच्या वतीने आम्ही ठिकठिकाणीच्या शाळेताल विघार्ध्यांना निसर्ग पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक आहे. तसेच शिक्षण हे खुप गरजेचे आहे. गेली चार वर्षापासून पाणी व्यवस्थापना संदर्भात गावातील लोकांना माहिती देत आहोत. यापुढे पाण्याच्या नियोजना बरोबरच पीक नियोजन, जमीनीचे आरोग्य, गवत लागवड क्षेञ निर्माण करणे,रीफाँरेस्ट्रेशन या पाच बाबींवर काम करणार असल्याचे म्हणाले.
आजच्या कार्यक्रमाला मी येथे बोलण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी आलो आहे. या प्रदर्शनाचे भव्य रुप पाहता एका दिवसात काही शिकता येणार नाही. त्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल. असे सांगून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना संदर्भात पवार साहेबांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्या सोडवण्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
 Conclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 11:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.