ETV Bharat / state

बाजार बंद... उभ्या पिकात सोडाव्या लागल्या मेंढ्या...!

बाजारपेठा बंद असल्याने काढणीला आलेली उभी पिकं मातीमोल झाली आहेत. खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सुभद्रा शिंदे यांनी उभ्या कोबी आणि फॉल्वरच्या पीकामध्ये मेंढ्या सोडल्या आहेत. शेतक-यांच्या हाताला काम देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

author img

By

Published : Apr 19, 2020, 12:05 PM IST

Farmer
शेतकरी

पुणे - कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आला आहे. बाजारपेठा बंद असल्याने काढणीला आलेली उभी पिकं मातीमोल झाली आहेत. खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सुभद्रा शिंदे यांनी उभ्या कोबी आणि फॉल्वरच्या पिकामध्ये मेंढ्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकजण घरात बसल्याने 'पैसा यायचा कुठून, खायचं काय' असा सवाल सुभद्रा शिंदे यांनी केला आहे.

सुभद्रा शिंदे, माजी सभापती

खेड तालुक्यातील ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे यांनी एक एकर शेतात एक लाख रुपयांचा खर्च करुन कोबी आणि फॉल्वरचे पीक घेतले. यातून त्यांना दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पीक काढणीला येणार याच काळात लॉकडाऊन करण्यात आले. बाजारबंद झाल्याने उभं पीक शेतातच पडून राहिले. त्यामुळे आता उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ सुभद्रा शिंदे यांच्यावर आली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे खायचं काय असा गंभीर प्रश्न समोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मेंढपाळही संकटात -

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मेंढ्याच्या चाऱ्यासाठी एका गावावरुन दुसऱ्या गावात मेंढपाळांना पायपीट करावी लागत आहे. मेढ्यांना सध्या मुबलक चारा मिळत आहे. मात्र, मेंढपालांच्या कुटुंबाला अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच जनावरांचा बाजारबंद असल्याने मेंढ्या विक्रीही करता येत नसल्याने मेंढपाळ आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

पुणे - कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आला आहे. बाजारपेठा बंद असल्याने काढणीला आलेली उभी पिकं मातीमोल झाली आहेत. खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सुभद्रा शिंदे यांनी उभ्या कोबी आणि फॉल्वरच्या पिकामध्ये मेंढ्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकजण घरात बसल्याने 'पैसा यायचा कुठून, खायचं काय' असा सवाल सुभद्रा शिंदे यांनी केला आहे.

सुभद्रा शिंदे, माजी सभापती

खेड तालुक्यातील ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे यांनी एक एकर शेतात एक लाख रुपयांचा खर्च करुन कोबी आणि फॉल्वरचे पीक घेतले. यातून त्यांना दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पीक काढणीला येणार याच काळात लॉकडाऊन करण्यात आले. बाजारबंद झाल्याने उभं पीक शेतातच पडून राहिले. त्यामुळे आता उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ सुभद्रा शिंदे यांच्यावर आली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे खायचं काय असा गंभीर प्रश्न समोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मेंढपाळही संकटात -

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मेंढ्याच्या चाऱ्यासाठी एका गावावरुन दुसऱ्या गावात मेंढपाळांना पायपीट करावी लागत आहे. मेढ्यांना सध्या मुबलक चारा मिळत आहे. मात्र, मेंढपालांच्या कुटुंबाला अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच जनावरांचा बाजारबंद असल्याने मेंढ्या विक्रीही करता येत नसल्याने मेंढपाळ आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.