ETV Bharat / state

''ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमे अपना जीवन छान चाहिये'' - जिग्नेश मेवाणी

author img

By

Published : Aug 27, 2019, 5:26 PM IST

आम्हाला खान-बाणचे राजकारण करायचे नाही. आम्हाला लोकांना तोडण्याचे नाही तर जोडण्याचे राजकारण आणि तीच विचारधारा हवी आहे. प्रत्येकाने माणसात माणूस पहावा. तो दलित आहे, हिंदू आहे, मुस्लीम आहे, हे पाहू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिग्नेश मेवाणी, आमदार गुजरात

परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमे अपना जीवन छान चाहिये' असे मत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केले. मंगळवारी परभणीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या संविधान सन्मान यात्रेनिमित्त जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या परिस्थितीबाबत आपले मत मांडले.

जिग्नेश मेवाणी, आमदार गुजरात

यावेळी बोलताना आमदार मेवाणी म्हणाले, आम्हाला खान-बाणचे राजकारण करायचे नाही. आम्हाला लोकांना तोडण्याचे नाही तर जोडण्याचे राजकारणाची विचारधारा हवी आहे. प्रत्येकाने माणसात माणूस पहावा. तो दलित आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, हे पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनावरही कडाडून टीका केली. अच्छे दिनचे वचन देऊन भाजप सरकार केंद्रात विराजमान झाले. पण चांगल्या दिवसाच्या नावावर आजपर्यंत भाजपने ठेंगा दिला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये विकासाची खूप मोठी संधी होती. परंतु, मोदी सरकार महाराष्ट्रात विकास करण्यात पूर्णतः अयशस्वी ठरली आहे. या सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र, दोन कोटी रोजगार देण्याचे का? रोजगार काढून घेण्याचे आश्वासन दिले? हे त्यांनाच माहीत असेही ते म्हणाले.

"गुजरात मॉडेल एक मृगजळ"

स्वतंत्र भारतात इतक्या वर्षानंतर आणि तेही 56 इंच छाती असलेले पंतप्रधान असताना देशात साधे पिण्याचे पाणी मिळू नये. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गुजरात मॉडेल दाखवून या भाजप सरकारने देशातील अनेक राज्यात सत्ता संपादन केली. प्रत्यक्षात मात्र गुजरात मॉडेल म्हणजे एक मृगजळ आहे. आता याला महाराष्ट्रातील जनतेने भुलू नये. हेच सांगण्यासाठी मी येथे आलो असल्याचेही आमदार मेवाणी म्हणाले. परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात जिग्नेश मेवाणी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रीय दलित विचार मंचचे रवी सोनकांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमे अपना जीवन छान चाहिये' असे मत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केले. मंगळवारी परभणीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या संविधान सन्मान यात्रेनिमित्त जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या परिस्थितीबाबत आपले मत मांडले.

जिग्नेश मेवाणी, आमदार गुजरात

यावेळी बोलताना आमदार मेवाणी म्हणाले, आम्हाला खान-बाणचे राजकारण करायचे नाही. आम्हाला लोकांना तोडण्याचे नाही तर जोडण्याचे राजकारणाची विचारधारा हवी आहे. प्रत्येकाने माणसात माणूस पहावा. तो दलित आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, हे पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनावरही कडाडून टीका केली. अच्छे दिनचे वचन देऊन भाजप सरकार केंद्रात विराजमान झाले. पण चांगल्या दिवसाच्या नावावर आजपर्यंत भाजपने ठेंगा दिला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये विकासाची खूप मोठी संधी होती. परंतु, मोदी सरकार महाराष्ट्रात विकास करण्यात पूर्णतः अयशस्वी ठरली आहे. या सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र, दोन कोटी रोजगार देण्याचे का? रोजगार काढून घेण्याचे आश्वासन दिले? हे त्यांनाच माहीत असेही ते म्हणाले.

"गुजरात मॉडेल एक मृगजळ"

स्वतंत्र भारतात इतक्या वर्षानंतर आणि तेही 56 इंच छाती असलेले पंतप्रधान असताना देशात साधे पिण्याचे पाणी मिळू नये. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गुजरात मॉडेल दाखवून या भाजप सरकारने देशातील अनेक राज्यात सत्ता संपादन केली. प्रत्यक्षात मात्र गुजरात मॉडेल म्हणजे एक मृगजळ आहे. आता याला महाराष्ट्रातील जनतेने भुलू नये. हेच सांगण्यासाठी मी येथे आलो असल्याचेही आमदार मेवाणी म्हणाले. परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात जिग्नेश मेवाणी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रीय दलित विचार मंचचे रवी सोनकांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमे जीवन छान चाहिये' असे वक्तव्य करत आज परभणीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या संविधान सन्मान यात्रेनिमित्त आलेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद घातला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या परिस्थितीबाबत आपले विचार मांडले.Body: परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात आमदार जिग्नेश मेवाणी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रीय दलित विचार मंचचे रवी सोनकांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार मेवाणी म्हणाले, आम्हाला खान-बाण चे राजकारण करायचे नाही. आम्हाला लोकांना तोडण्याचे नाही तर जोडण्याचे राजकारण आणि तीच विचारधारा हवी आहे. प्रत्येकाने माणसात माणूस पहावा, तो दलित आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, हे पाहू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच यावेळी त्यांनी केंद्र शासनावरही कडाडून टीका केली. ते म्हणाले, चांगले दिवस देण्याचे वचन देऊन भाजप सरकार केंद्रात विराजमान झाली. पण चांगल्या दिवसाच्या नावावर आजपर्यंत भाजपने ठेंगा दिला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये विकासाची खूप मोठी संधी होती; परंतु मोदी सरकार महाराष्ट्रात विकास करण्यात पूर्णतः यशस्वी ठरली आहे. या सरकारने दोन करोड रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र दोन कोटी रोजगार देण्याचे का, रोजगार काढून घेण्याचे वचन दिले ? हे त्यांनाच माहीत.

"गुजरात मॉडेल एक मृगजळ"

स्वतंत्र भारतात इतक्या वर्षानंतर आणि तेही 56 इंच छाती असलेले पंतप्रधान असताना देशात साधे पिण्याचे पाणी मिळू नये, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गुजरात मॉडेल दाखवून या भाजप सरकारने देशातील अनेक राज्यात सत्ता संपादन केली. प्रत्यक्षात मात्र गुजरात मॉडेल म्हणजे एक छलावा (मृगजळ) आहे. आणि आता याच्या भयकाव्यात महाराष्ट्रातील जनतेने येऊ नये, हेच सांगण्यासाठी मी आज येथे आलो असल्याचेही शेवटी आमदार मेवाणी म्हणाले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- press vis & mla gijnesh mevani byte1 & 2Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.