पालघर - राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आज पालघर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोललाना पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार व कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी या आंदोलकांनी केली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर आवास योजनेची सोडत रद्द
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. गेल्या 47 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ठाण मांडून आहेत. भाजप सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. केंद्र सरकारने हे शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या या आंदोलनकर्त्यांनी दर्शविला आहे.