ETV Bharat / state

बदलत्या हवामानामुळे खरीपानंतर रब्बी पिकांच्याही नुकसानीची शेतकऱ्यांना भीती

ढगाळ वातावरण तसेच थंड आणि उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम पालघर जिल्ह्यातील रब्बी हंगामात घेत असलेल्या मुग, हरभरा, वाल, तुर, वेलवर्गीय भाजीपाल्यांवर होत आहे. तसेच फळबागांवरही याचा परिणाम होत आहे.

author img

By

Published : Dec 23, 2019, 10:33 AM IST

crop
ढगाळ हवामानामुळे शेतीची नुकसान

पालघर - बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच खरीप हंगामात भात पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी येण्याची भीती शेतकऱयांना आहे.

हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 'एकला चलो'ची भूमिका?

ढगाळ वातावरण तसेच थंड आणि उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम पालघर जिल्ह्यातील रब्बी हंगामात घेत असलेल्या मुग, हरभरा, वाल, तुर, वेलवर्गीय भाजीपाल्यांवर होत आहे. तसेच फळबागांवरही याचा परिणाम होत आहे.

वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे एक हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. तर, एक हजार 200 हेक्टर क्षेत्रावर फळबागायत असल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हवामान बदलामुळे एखाद्या पिकाच्या फळप्रकियेपूर्वीच फुलांची गाळण होत पानांचे हरितद्रव्य शोषून पाने सुकली जातात.

बदलत्या हवामानामुळे खरीपासह रब्बी पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भीती

हेही वाचा - वसईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डाॅल्फीन

दरम्यानच्या काळात ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे रब्बीत लागवड केलेल्या पिकाला याचा फटका बसला होता. दरम्यान, खरीप हंगामातील भात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांनाच आता रब्बी हंगामातही नुकसानीचा फटका बसत आहे.

पालघर जिल्ह्यतील वाडा तालुक्यातील डाहे गावातील शेतकरी जगदीश कोकाटे यांनी आपल्या शेतात एक एकरात भाजीपाला लावला आहे. यात मुग, उडीद, वाल, तूर आदींची लागवड शेतात केली आहे. त्याचबरोबर मेथी, गवार, शेपू, कोथिंबीर, मुळा या भाजीपाल्यांची लागवडही परस बागेत केली आहे. बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील पिके आणि भाजीपाला यांना बसला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने खरीप हंगामात पिकांचे नुकसान केले होते. तसाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसणार असल्याची भीती शेतकऱयांना आहे.

पालघर - बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच खरीप हंगामात भात पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी येण्याची भीती शेतकऱयांना आहे.

हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 'एकला चलो'ची भूमिका?

ढगाळ वातावरण तसेच थंड आणि उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम पालघर जिल्ह्यातील रब्बी हंगामात घेत असलेल्या मुग, हरभरा, वाल, तुर, वेलवर्गीय भाजीपाल्यांवर होत आहे. तसेच फळबागांवरही याचा परिणाम होत आहे.

वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे एक हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. तर, एक हजार 200 हेक्टर क्षेत्रावर फळबागायत असल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हवामान बदलामुळे एखाद्या पिकाच्या फळप्रकियेपूर्वीच फुलांची गाळण होत पानांचे हरितद्रव्य शोषून पाने सुकली जातात.

बदलत्या हवामानामुळे खरीपासह रब्बी पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भीती

हेही वाचा - वसईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डाॅल्फीन

दरम्यानच्या काळात ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे रब्बीत लागवड केलेल्या पिकाला याचा फटका बसला होता. दरम्यान, खरीप हंगामातील भात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांनाच आता रब्बी हंगामातही नुकसानीचा फटका बसत आहे.

पालघर जिल्ह्यतील वाडा तालुक्यातील डाहे गावातील शेतकरी जगदीश कोकाटे यांनी आपल्या शेतात एक एकरात भाजीपाला लावला आहे. यात मुग, उडीद, वाल, तूर आदींची लागवड शेतात केली आहे. त्याचबरोबर मेथी, गवार, शेपू, कोथिंबीर, मुळा या भाजीपाल्यांची लागवडही परस बागेत केली आहे. बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील पिके आणि भाजीपाला यांना बसला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने खरीप हंगामात पिकांचे नुकसान केले होते. तसाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसणार असल्याची भीती शेतकऱयांना आहे.

Intro:बदलत्या हवामानामुळे खरीपाबरोबर रब्बी पिकांचे नुकसानीची शेतकऱ्यांमध्ये भीती..... पालघर (वाडा) संतोष पाटील  बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील कडधान्ये पिके,भाजीपाला शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच खरीप हंगामात भातपिके ही  मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिक उत्पादन हे बदलते हवामानामुळे कमी येण्याची भीती शेतकरीवर्ग करीत आहे. बदलते हवामान आणि दरम्यानच्या काळात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची पुन्हा एकदा सर्व तर कुठे गारपीट झाली. ढगाळ वातावरण आणि थंड आणि उष्ण हवामान याचा प्रतिकूल परिणाम पालघर जिल्ह्य़ात रब्बी हंगामात घेत असलेल्या मुग,हरभरा,वाल,तुर, वेलवर्गीय भाजीपाल्यावर होत आहे.तसेच फळबागायतीवरही याचा परिणाम होतो असे शेतकऱ्यांनाकडून सांगितले जाते.वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे एकहजार हेक्टर लागवडीक्षेञ आहे तर 1 हजार दोनशे हेक्टरीक्षेञावर फळबागायत आहे असे कृषी कार्यालयाकडून माहीती देण्यात येते.अशा  या हवामानात एखाद्या पिकाच्या फळप्रकीया पुर्वी फुलांची गाळण होते.पानांचे हरितद्रव्य शोषून पाने सुकली जातात.त्याचबरोबर व्हायरसची बाधाही होत असते. असे यावर शेतकरीवर्गाचे म्हणने आहे.  दरम्यानच्या काळात ढगाळवातावरणामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या होत्या.त्यामुळे रब्बीत लागवड केलेल्या द्विदल पिकाला फटका बसला होता.असे असतानाही खरीप हंगामातील भातपिकात नुकसानीचा मारा खाल्लेल्या शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात तोच नुकसानीचा अनुभव पहायला मिळतोय. पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील डाहे गावातील शेतकरी  जगदीश कोकाटे यांनी आपल्या शेतात 1 एकरात भाजीपाला केला आहे.मुग,उदंड, वाल,तुर आदी लागवड शेतात केली आहे.  आणि मेथी,गवार,शेपू, कोथिंबीर,मुळा या भाजीपाल्याची लागवड परस बागेत केली आहे.  बदलत्या हवामानाचा या रब्बी हंगामातील द्विदल पिके आणि भाजीपाला यांना फटका बसला आहे.  पानांचे हरितद्रव्य शोषले जाते. रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.  अवकाळी पावसात खरीप हंगामात भातशेती नुकसान झाले तसे रब्बी हंगामात हवामान बदलाने रब्बी पिकांना फटका बसतोय की काय या भीती सद्या शेतकरीवर्गाला सतावतोय.   


Body:with walkthrough p 2 c byte jagdish kokate farmer


Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.