ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी; दोन्ही रुग्ण वृद्ध - osmanabad corona death news

शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ६२ झाली असून. यापैकी १३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकीच दोघांचा मृत्यू झाला आहे.

osmanabad corona
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी
author img

By

Published : May 30, 2020, 7:40 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची पहिल्या दोन बळीची नोंद शुक्रवारी रात्री झाली आहे. यातील पहिला रुग्ण हा उस्मानाबाद तालुक्यातील कोडं या गावातील आहे, तर दुसरा उमरगा तालुक्यातील बेडगा गावचा आहे. हे दोन्ही रुग्ण वृद्ध असून दोन्ही मुंबई रिटर्न रुग्ण आहेत.

यातील कोडं येथील रुग्ण हा पूर्वीच मृत झाला. मात्र, त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर या वृद्धाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले व त्यामुळेच मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरा बेडगा येथील रुग्ण मुंबईच्या कांदिवली भागातून कुटुंबासह बेडगा येथे आला होता. या 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उमरगा कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ते मधुमेह, उच्च रक्तदाब व अन्य आजारानेही त्रस्त होते. मात्र रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ६२ झाली असून. यापैकी १३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकीच दोघांचा मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची पहिल्या दोन बळीची नोंद शुक्रवारी रात्री झाली आहे. यातील पहिला रुग्ण हा उस्मानाबाद तालुक्यातील कोडं या गावातील आहे, तर दुसरा उमरगा तालुक्यातील बेडगा गावचा आहे. हे दोन्ही रुग्ण वृद्ध असून दोन्ही मुंबई रिटर्न रुग्ण आहेत.

यातील कोडं येथील रुग्ण हा पूर्वीच मृत झाला. मात्र, त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर या वृद्धाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले व त्यामुळेच मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरा बेडगा येथील रुग्ण मुंबईच्या कांदिवली भागातून कुटुंबासह बेडगा येथे आला होता. या 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उमरगा कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ते मधुमेह, उच्च रक्तदाब व अन्य आजारानेही त्रस्त होते. मात्र रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ६२ झाली असून. यापैकी १३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकीच दोघांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.