ETV Bharat / state

लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमी नाही; काक्रंबा गावातील ग्रामस्थ संतापले

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा गेल्या अनेक वर्षांपासून  विकास रखडला आहे. यामुळे नवबौध्द घटकातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेने दलित समाजाची स्मशानभूमी अभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी निधी दिला होता.

author img

By

Published : Nov 20, 2019, 8:37 PM IST

काक्रंबा ग्रामपंचायत

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा गेल्या अनेक वर्षांपासून विकास रखडला आहे. यामुळे नवबौध्द घटकातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेने दलित समाजाची स्मशानभुमी अभावी होणारी गैरसोय दुर करण्यासाठी निधी दिला होता. मात्र, ठेकेदाराने अर्धवट काम करुन मुदत संपल्याचे कारण पुढे करत पुढील काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमी नाही; काक्रंबा गावातील ग्रामस्थ संतापले

हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरची समोरासमोर धडक, एक जखमी

वित्त आयोगातून स्मशानभुमीसाठी विविध कामे करण्यासाठी तब्बल 11 लाख 45 हजार 856 रूपये निधीची मंजुरी देण्यात आली होती. संबंधीत कामाची मागील चार महिन्यांपूर्वीच काक्रंबा ग्रामपंचायतीने ऑनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी कामाचा कार्यभारही ठेकेदारास देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांमध्ये फक्त 3 लाख 80 हजार रूपयांमधून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण काम केले आहे. उर्वरीत साडे सात लाख रूपये खर्चाची कामे करणे बाकी आहेत. संबंधित काम मुदतीमध्ये न संपल्याने ठेकेदारावर ग्रामपंचायत आता कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मद्यपी कारचालकाचा सातारा-पंढरपूर महामार्गावर थरार; 13 जणांना धडक

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा गेल्या अनेक वर्षांपासून विकास रखडला आहे. यामुळे नवबौध्द घटकातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेने दलित समाजाची स्मशानभुमी अभावी होणारी गैरसोय दुर करण्यासाठी निधी दिला होता. मात्र, ठेकेदाराने अर्धवट काम करुन मुदत संपल्याचे कारण पुढे करत पुढील काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमी नाही; काक्रंबा गावातील ग्रामस्थ संतापले

हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरची समोरासमोर धडक, एक जखमी

वित्त आयोगातून स्मशानभुमीसाठी विविध कामे करण्यासाठी तब्बल 11 लाख 45 हजार 856 रूपये निधीची मंजुरी देण्यात आली होती. संबंधीत कामाची मागील चार महिन्यांपूर्वीच काक्रंबा ग्रामपंचायतीने ऑनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी कामाचा कार्यभारही ठेकेदारास देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांमध्ये फक्त 3 लाख 80 हजार रूपयांमधून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण काम केले आहे. उर्वरीत साडे सात लाख रूपये खर्चाची कामे करणे बाकी आहेत. संबंधित काम मुदतीमध्ये न संपल्याने ठेकेदारावर ग्रामपंचायत आता कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मद्यपी कारचालकाचा सातारा-पंढरपूर महामार्गावर थरार; 13 जणांना धडक

Intro:लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमीच नाही; मृत्यूनंतर होत आहे अवहेलना..?


उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा गेली अनेक वर्षानुवर्षा पासुन रखडलेला विकास यामुळे नवबौध्द घटकातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते हा विषय लक्षात घेऊन जिल्हा परिषदने दलित समाजाची स्मशानभुमी अभावी होणारी गैरसोय दुर करण्यासाठी १४ वित्त आयोगातुन स्मशानभुमीत विविध कामे करण्यासाठी तब्बल ११ लाख ४५ हजार ८५६ रूपये निधीला मंजूरी देण्यात आली आहे सदरील कामाची मागील चार महिन्या पूर्वीच काक्रंबा ग्रा.प.ने आँनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण करून तीन महिन्या पूर्वीच कामाचा कार्यभार आदेश गुतेदारास देण्यात आला आहे माञ दोन दिवसात फक्त तीन लाख ऐंशी हजार रूपये मधून सिमेंट रस्त्याचे केले आहे उर्ववरीत साडे सात लाख रू खर्चाची कामे करणे बाकी असुन सदरील कामाची मुदत संपल्याने गुतेदारावर ग्रा.प.काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे . तुळजापूर तालुक्यातील आठ ते नऊ हजार लोकसंख्येच्या काक्रंबा गावातील दलित समाजासाठी आज पर्यत गावामध्ये स्मशानभूमीची कसलीही सोय नसल्याने गेली अनेक वर्षापासून हा स्मशानभुमीचा विषय शासन दरबारी रेंगाळत पडलेला होता त्यामुळं बारा महिने दलित समाजातील नागरिकांना गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यावर विविध समस्यांचा सामना करत उघडयावर रस्त्याच्या बाजूला घाणीच्या विळाखयात प्रेतावर अत्यंसंस्कार करावे लागत असल्याने मुत्युनंतर प्रेताची कुंचबना होत होती शिवाय दलित समाजाची गेली अनेक वर्षापासून सातत्याने स्मशानभुमी देण्याची मागणी होती याविषयी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर जि.प,प्रशासनाने दलित समाजासाठी १४ वित्त आयोगातुन दहण शेड,अंतर्गत सिमेंट रस्ता,स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता आदी कामे करण्यासाठी गेली चार महिन्या पूर्वी तब्बल ११ लाख ४५ हजार ८५६ रूपये चा निधी मंजूर करताच ग्रा.प.ने सदरील कामाची आँनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण करून दि १३ आँगस्ट २०१९ रोजी ग्रा.प.ने सबंधित गुतेदारास कार्यभार आदेश देण्यात आला आहे.परंतु सदरील स्मशानभूमीचे साडे अकरा लाखा पैकी फक्त स्मशानभुमीला जाणाऱ्या तीन लाख ऐंशी हजार तीनशे सात रुपयेचे सिमेंट रस्त्याचे काम केले आहेBody:यात तिथलं फोटो vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.