उस्मानाबाद - जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. गुरुवारी शहरातील तापमान ४० अंशसेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, छत्रीचा वापर करत आहेत.
उन्हामुळे शहरातील रस्ते ओस पडत आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी नागरिकांनी थंड पेय, आईस्क्रीम, लिंबू शरबत यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. दिवसभर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. तर ग्रामीण भागातही ग्रामस्थ वाटसरू झाडाच्या सावलीखाली विसावा घेऊन दुपारचा प्रवास टाळत आहेत.