उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. यासाठी हजारो रसिक उस्मानाबाद येथे आले आहेत. समितीच्या वतीने त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. भोजनाची व्यवस्था पुष्पक मंगल कार्यालयात करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'
तीन दिवस जेवण आणि नाष्ट्याची सोय याठिकाणी करण्यात आली आहे. जेवणात जिलेबी, सिताफळ रबडी, उस्मानाबादचे प्रसिद्ध गुलाब जामून या गोड पदार्थाबरोबरच व्हेज कुर्मा मसाला, मटकी भाजी, ज्वारीची भाकरी, चटणी, असे वेगवेगळे पदार्थ आहेत, असे भोजन व्यवस्था समितीचे प्रशांत कुदाळ यांनी सांगितले.