ETV Bharat / state

नाशिकमधील 10 धरणे कोरडी ठाक, गंगापूर धरणात केवळ 24 टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 11 धरणांत शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

author img

By

Published : May 27, 2019, 5:23 PM IST

Updated : May 27, 2019, 6:36 PM IST

नाशिकमधील 10 धरणे कोरडी ठाक, गंगापूर धरणात केवळ 24 टक्के पाणीसाठा

नाशिक - जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 11 धरणांत शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर 12 धरणात 10 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असून सर्व धरणे मिळून केवळ 9 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणांत केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिकमधील 10 धरणे कोरडी ठाक, गंगापूर धरणात केवळ 24 टक्के पाणीसाठा

महाराष्ट्रात धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, असे असतानासुद्धा यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्या पैकी 9 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. हजारो वाड्या-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात लहान-मोठी 24 धरणे आहेत. यामध्ये सध्या 10 धरणे कोरडी ठाक पडली आहेत. 6 धरणामध्ये 5 टक्के पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 24 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस झाला नाही, तर नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येऊ शकते. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार शहराला 15 जुलै पर्यँत पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पाणी जपून वावरावे, असे आवाहन देखील महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

  • 5 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असणारी धरणे -

काश्यपी धरण, गौतमी गोदावरी, वाघाड धरण, ओझरखेड धरण, मुकणे धरण आणि तिसगाव धरणात 5 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

  • शुन्य टक्के पाणीसाठा असणारी नाशिकमधील धरणे -

आळंदी धरण, पुणेगाव धरण, भावली धरण, वालदेवी धरण, कडवा धरण, भोजापूर धरण, हरणबारी धरण, केळझर धरण, नागासक्या धरण, माणिकपुंज धरणं.

नाशिक - जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 11 धरणांत शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर 12 धरणात 10 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असून सर्व धरणे मिळून केवळ 9 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणांत केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिकमधील 10 धरणे कोरडी ठाक, गंगापूर धरणात केवळ 24 टक्के पाणीसाठा

महाराष्ट्रात धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, असे असतानासुद्धा यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्या पैकी 9 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. हजारो वाड्या-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात लहान-मोठी 24 धरणे आहेत. यामध्ये सध्या 10 धरणे कोरडी ठाक पडली आहेत. 6 धरणामध्ये 5 टक्के पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 24 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस झाला नाही, तर नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येऊ शकते. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार शहराला 15 जुलै पर्यँत पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पाणी जपून वावरावे, असे आवाहन देखील महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

  • 5 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असणारी धरणे -

काश्यपी धरण, गौतमी गोदावरी, वाघाड धरण, ओझरखेड धरण, मुकणे धरण आणि तिसगाव धरणात 5 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

  • शुन्य टक्के पाणीसाठा असणारी नाशिकमधील धरणे -

आळंदी धरण, पुणेगाव धरण, भावली धरण, वालदेवी धरण, कडवा धरण, भोजापूर धरण, हरणबारी धरण, केळझर धरण, नागासक्या धरण, माणिकपुंज धरणं.

Intro:नाशिक जिल्यातील 24 पैकी 10 धरणं कोरडी ठाक,गंगापूर धरणात केवळ 24 टक्के पाणी साठा..


Body:नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 11 धरणांत शून्य टक्के पाणी साठा असून,12 धरणांत 10 टक्के पेक्षा कमी पाणी साठा असून सर्व धरणं मिळून केवळ नऊ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे..तसेच नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणांत केवळ 24 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे...

महाराष्ट्रात धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे मात्र असं असतांना सुद्धा यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील 15 तालुक्या पैकी 9 तालुक्यात सरकार ने दुष्काळ जाहीर केला असून,हजारो वाड्या वस्तीवर टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे.नाशिक जिल्ह्यात लहान मोठी 24 धरणं आहेत..यात आज मितीला 10 धरणं कोरडी ठाक पडली असून 6 धरणांत 5 टक्के पेक्षा ही कमी पाणी साठा शिल्लक आहे..नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 24 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक असून जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस झाला नाही तर नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येऊ शकते..महानगर पालिकेच्या नियोजना नुसार शहराला 15 जुलै पर्यँत पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलं आहे..तसेच पाण्याची जपून वावरावे असं आवाहन देखील महानगर पालिके कडून केलं जातं आहे..तर दुसरी कडे पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे..

#एक नजर टाकूयात कुठल्या धरणांत शुन्य टक्के पाणी साठा आहे..
आळंदी धरणं,पुणेगाव धरणं, भावली धरणं,वालदेवी धरणं, कडवा धरणं,भोजापूर धरणं,हरणबारी धरणं,केळझर धरणं,नागासक्या धरणं, माणिकपुंज धरणं..

कुठल्या धरणांत 5 टक्के पेक्षा कमी साठा आहे..
काश्यपी धरणं,गौतमी गोदावरी,वाघाड धरणं, ओझरखेड धरणं, मुकणे धरणं..तिसगाव धरणं
टीप फीड ftp
nsk gangapur dharn viu 3



Conclusion:
Last Updated : May 27, 2019, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.