ETV Bharat / state

नाशिकमध्ये पावसाचा जोर कमी; गोदावरी नदीचा पूर ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर - गोदावरी नदी

नाशिकमध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या या धरणातून १२ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.

गोदावरी नदीचा पूर ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:59 PM IST

Updated : Aug 5, 2019, 8:27 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या या धरणातून १२ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

गोदावरी नदीचा पूर ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर

गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी काल (रविवार) पेक्षा आज कमी झाली असून पुराची तीव्रतादेखील कमी झाली आहे. सध्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील पाणी कमी झाले आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.

जोरदार पावसामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सकाळी काही प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर उघडीप घेतली. दरम्यान, रविवारी पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या २४ नागरिकांवर पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे पूर बघण्यास आलेल्या लोकांची गर्दीदेखील कमी दिसून आली.

नाशिक - नाशिकमध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या या धरणातून १२ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

गोदावरी नदीचा पूर ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर

गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी काल (रविवार) पेक्षा आज कमी झाली असून पुराची तीव्रतादेखील कमी झाली आहे. सध्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील पाणी कमी झाले आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.

जोरदार पावसामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सकाळी काही प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर उघडीप घेतली. दरम्यान, रविवारी पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या २४ नागरिकांवर पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे पूर बघण्यास आलेल्या लोकांची गर्दीदेखील कमी दिसून आली.

Intro:नाशिक मध्ये पावसाचा जोर कमी,गोदावरीचा नदीचा पूर ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर...


Body:नाशिकच्या गंगापूर धरणं क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे,गंगापुर धरणातून सध्या 12500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून,कालपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून पुराची तीव्रता देखील कमी झाली आहे ,दुतोंड्या मारुतीच्या छाती पर्यँत पाणी आले आहे..तसेच शहरातील रस्त्यावरील पाणी कमी झाले आहे,मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर संततधार जर गंगापुर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल आणि गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून दीकाठ्याच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकता..

जोरदार पावसामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मात्र सकाळी काही प्रमाणत सुरू असलेल्या पावसाने दुपार नंतर उघडीप घेतली.. कालपूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या 24 नागरिकांवर पोलिसांनी कलम 144 अंतर्गत कारवाई केल्यामुळे पूर बघण्याची गर्दी देखील कमी दिसून आली..
wkt कपिल भास्कर प्रतिनिधी नाशिक




Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.