ETV Bharat / state

आवक कमी असल्याने कांदा वधारला

author img

By

Published : Sep 20, 2019, 6:42 PM IST

दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्याने तेथील लाल कांदा काढणीला विलंब होत असल्याने कांदा दरात तेजी आली आहे.

कांदा

नाशिक - दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यात कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी मागणी पेक्षा कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा - परदेशातून कांद्याची आयात, शेतकरी-व्यापारी नाराज

नाशिक बाजार समितीत कांदा किमान 3800 ते 4400 रुपये क्विंटलने विकला जात आहे. गुरुवारी याच कांद्याला नाशिकच्या अभोना उप बाजार समितीमध्ये 5 हजार 111 रुपये क्विंटल दर मिळाला होता. मात्र, आज भाव काही प्रमाणात खाली आल्याचे दिसून आले. तसेच नाशिक जिल्ह्यात देखील 20 ते 25 टक्के कांदा शिल्लक असून शेतकऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात आहे. बाजार समितीत कांद्याचे दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी कांदा एकदम बाजार समितीत आणू नये, टप्याटप्याने कांदा आणावा, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - कांद्यासह लसणाच्या भावात तेजी; अतिवृष्टीमुळे उत्पादन प्रभावित

दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्याने तेथील लाल कांदा काढणीला विलंब होत असल्याने कांदा दरात तेजी आली आहे. दक्षिणेचा कांदा बाजारात 10 ते 15 दिवसांनी दाखल झाल्यानंतर हे दर कमी होतील तो पर्यंत पुढील 15 दिवस भाव असेच राहतील, असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नाशिक - दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यात कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी मागणी पेक्षा कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा - परदेशातून कांद्याची आयात, शेतकरी-व्यापारी नाराज

नाशिक बाजार समितीत कांदा किमान 3800 ते 4400 रुपये क्विंटलने विकला जात आहे. गुरुवारी याच कांद्याला नाशिकच्या अभोना उप बाजार समितीमध्ये 5 हजार 111 रुपये क्विंटल दर मिळाला होता. मात्र, आज भाव काही प्रमाणात खाली आल्याचे दिसून आले. तसेच नाशिक जिल्ह्यात देखील 20 ते 25 टक्के कांदा शिल्लक असून शेतकऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात आहे. बाजार समितीत कांद्याचे दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी कांदा एकदम बाजार समितीत आणू नये, टप्याटप्याने कांदा आणावा, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - कांद्यासह लसणाच्या भावात तेजी; अतिवृष्टीमुळे उत्पादन प्रभावित

दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्याने तेथील लाल कांदा काढणीला विलंब होत असल्याने कांदा दरात तेजी आली आहे. दक्षिणेचा कांदा बाजारात 10 ते 15 दिवसांनी दाखल झाल्यानंतर हे दर कमी होतील तो पर्यंत पुढील 15 दिवस भाव असेच राहतील, असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Intro:दक्षिणेतील कांदा पावसामुळे खराब झाल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली....


Body:आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यात कांद्याला मागणी वाढली आहे,परिणामी मागणी पेक्षा कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काही प्रमाणत वाढ झाली आहे,आज नाशिकच्या बाजार समितीत कांदा किमान 3800 ते 4400 रुपये क्विंटलने विकला जात आहे..काल ह्याच कांदा नाशिकच्या अभोना उप बाजार समिती मध्ये 5 हजार 111 रुपये क्विंटल दराने भाव मिळाला,मात्र आज भाव काही प्रमाणात खाली आल्याचे दिसून आलं,तसेच नाशिक जिल्ह्यात देखील 20 ते 25 टक्के कांदा शिल्लक असून शेतकऱ्यांन कडे कांदा कमी प्रमाणत आहे,बाजार समितीत कांद्याचे दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी कांदा एकदम बाजर समिती आणू नये,टप्याटप्याने कांदा आणावा असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे...

तसेच दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्याने तेथील लाल कांदा काढणीला विलंब होत असल्याने कांदा दरात तेजी आली आहे, दक्षिणेचा कांदा बाजारात दहा ते पंधरा दिवसांनी दाखल झाल्यानंतर हे दर कमी होतील तो पर्यंत पुढील 15 दिवस भाव असेच राहतील असं कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणं आहे..

तसेच सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे,शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळत असतील तर सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेऊ नये असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..

चौपाल कपिल भास्कर नाशिक प्रतिनिधी...


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.