ETV Bharat / state

मतदानासाठी ना पैसै वाटले, ना केला घरोघरी प्रचार; चहा विक्रेत्याने 'अशी' जिंकली निवडणूक

बेलतगव्हाण ग्रामपंचायतीत मतांची डबल सेंच्युरी ठोकत आकाश पागेरे सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे सध्या गावात ते चर्चेचा विषय ठरले असून त्यांच्या टपरीवर चहाचा झुरका घेण्यासाठी गर्दी होत आहे.

author img

By

Published : Jan 20, 2021, 6:34 AM IST

nashik district Belatgavhan gram panchayat election win by Tea seller
मतदानासाठी ना पैसै वाटले, ना केला घरोघरी प्रचार; चहा विक्रेत्याने 'अशी' जिंकली निवडणूक

नाशिक - 'चहावाला या देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर मी ग्रामपंचायत सदस्य का बनू शकत नाही', असे म्हणत आकाश पागेरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अनेक वर्षापासून लोकांना चहाच्या दिलेल्या गोडव्यातून त्यांनी ग्रामपंचायतीचे रण देखील जिंकले आहे. बेलतगव्हाण ग्रामपंचायतीत मतांची डबल सेंच्युरी ठोकत ते सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे सध्या गावात ते चर्चेचा विषय ठरले असून त्यांच्या टपरीवर चहाचा झुरका घेण्यासाठी गर्दी होत आहे.

चहा टपरीचा केला प्रचारासाठी वापर...
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराचा राज्यभरात धुराडा उडवला होता. घराघरापर्यंत ताई, माई, आक्का माझ्या नावावरच मारा विजयाचा शिक्का असा जोरदार प्रचार करत होते. मात्र, पुर्वी चहाची टपरी हाच सोशल मीडिया होता. या ठिकाणी गावातले लोक चहापिण्यासाठी जमायचे. चहा सोबत गप्पांचा फड रंगायचा व गावातली बित्तम बातमी येथे मिळायची. या फंडाच्या पागेरे यांनी पुरेपुर वापर केला आहे.. चहाच्या व्यवसायात असल्याने गावातील जनसंपर्क हा वाढत गेला व निवडणुकीत विजय झाला असल्याचे आकाश पागेरे यांनी सांगितले.

आकाश पागेरे बोलताना...
तब्बल २४५ मतदान घेउन पागेरे यांनी विजयाचा गुलाल उधळला...
आकाश पागेरे याची घरची परिस्थिती बेताची असल्याने ईयत्ता आठवी पासून ते चहाची टपरी चालवायचे. २६ वर्षापासून त्यांच्या टपरीवर चहाचा आस्वाद घ्यायला लोकांची गर्दी व्हायची. त्यामाध्यमातून त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला. सोबतीला चहाचा गोडवा होताच. हीच 'युएसपी' ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मदतीला आली. एकीकडे मतदानासाठी हजारो रुपये वाटले जात असताना फक्त चहाच्या गोडव्यावर विरोधकांना निवडणुकीत त्यांनी पाणी पाजले. तब्बल २४५ मतदान घेऊन पागेरे यांनी विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे त्यांच्या चहाच्या युएसपीची जोरदार चर्चा गावात रंगत आहे.

नाशिक - 'चहावाला या देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर मी ग्रामपंचायत सदस्य का बनू शकत नाही', असे म्हणत आकाश पागेरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अनेक वर्षापासून लोकांना चहाच्या दिलेल्या गोडव्यातून त्यांनी ग्रामपंचायतीचे रण देखील जिंकले आहे. बेलतगव्हाण ग्रामपंचायतीत मतांची डबल सेंच्युरी ठोकत ते सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे सध्या गावात ते चर्चेचा विषय ठरले असून त्यांच्या टपरीवर चहाचा झुरका घेण्यासाठी गर्दी होत आहे.

चहा टपरीचा केला प्रचारासाठी वापर...
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराचा राज्यभरात धुराडा उडवला होता. घराघरापर्यंत ताई, माई, आक्का माझ्या नावावरच मारा विजयाचा शिक्का असा जोरदार प्रचार करत होते. मात्र, पुर्वी चहाची टपरी हाच सोशल मीडिया होता. या ठिकाणी गावातले लोक चहापिण्यासाठी जमायचे. चहा सोबत गप्पांचा फड रंगायचा व गावातली बित्तम बातमी येथे मिळायची. या फंडाच्या पागेरे यांनी पुरेपुर वापर केला आहे.. चहाच्या व्यवसायात असल्याने गावातील जनसंपर्क हा वाढत गेला व निवडणुकीत विजय झाला असल्याचे आकाश पागेरे यांनी सांगितले.

आकाश पागेरे बोलताना...
तब्बल २४५ मतदान घेउन पागेरे यांनी विजयाचा गुलाल उधळला...
आकाश पागेरे याची घरची परिस्थिती बेताची असल्याने ईयत्ता आठवी पासून ते चहाची टपरी चालवायचे. २६ वर्षापासून त्यांच्या टपरीवर चहाचा आस्वाद घ्यायला लोकांची गर्दी व्हायची. त्यामाध्यमातून त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला. सोबतीला चहाचा गोडवा होताच. हीच 'युएसपी' ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मदतीला आली. एकीकडे मतदानासाठी हजारो रुपये वाटले जात असताना फक्त चहाच्या गोडव्यावर विरोधकांना निवडणुकीत त्यांनी पाणी पाजले. तब्बल २४५ मतदान घेऊन पागेरे यांनी विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे त्यांच्या चहाच्या युएसपीची जोरदार चर्चा गावात रंगत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.