ETV Bharat / state

इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे महत्त्वाचे मार्ग खचले, गावांचा संपर्क तुटला

तालुक्यातील निनावी - भरवीर मार्गावरील रहदारीचा रस्ताच अतिवृष्टी व वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने खचला आहे. काही तासातच हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. रहदारीचा रस्ताच वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

author img

By

Published : Aug 6, 2019, 8:11 AM IST

खचलेल्या रस्त्याचे छायाचित्र

नाशिक- इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील संपर्कच बंद झाला आहे. तालुक्यात अद्यापही पूरस्थिती गंभीर असून नद्यांचे पाणी अनेक पुलांवरुन वाहत आहे. महत्त्वाचे म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील निनावी-शेनित रस्ताच पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर सिन्नर अकोले तालुक्याला जोडणाऱ्या टाकेद- म्हैसवळन घाटात रस्ता खचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात दर वर्षी सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद होते. या वर्षी गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ३८०० मि.मी पाऊस झाला आहे. तर गेल्या २४ तासात ३६८ मि.मी पाऊस झाला असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे. त्यात अतिवृष्टीने रस्ता खचल्याने तालुका प्रशासनापुढे वाहतुकीची नविन समस्या निर्माण झाली आहे.

तालुक्यातील निनावी - भरवीर मार्गावरील रहदारीचा रस्ताच अतिवृष्टी व वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने खचला. काही तासातच हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रहदारीचा रस्ताच वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज मात्र वाहतुकीच्या गंभीर समस्येला स्थानिक नागरिकांना समोरे जावे लागत आहे.

त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यातील सिन्नर व नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या टाकेद - म्हैसवळन घाटात आज रस्ता खचल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली. याच मार्गावरुन अकोले, ठानगाव, घोटी म्हैसवळन मार्गे सिन्नर अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र हा मार्ग खचल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नाशिक- इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील संपर्कच बंद झाला आहे. तालुक्यात अद्यापही पूरस्थिती गंभीर असून नद्यांचे पाणी अनेक पुलांवरुन वाहत आहे. महत्त्वाचे म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील निनावी-शेनित रस्ताच पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर सिन्नर अकोले तालुक्याला जोडणाऱ्या टाकेद- म्हैसवळन घाटात रस्ता खचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात दर वर्षी सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद होते. या वर्षी गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ३८०० मि.मी पाऊस झाला आहे. तर गेल्या २४ तासात ३६८ मि.मी पाऊस झाला असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे. त्यात अतिवृष्टीने रस्ता खचल्याने तालुका प्रशासनापुढे वाहतुकीची नविन समस्या निर्माण झाली आहे.

तालुक्यातील निनावी - भरवीर मार्गावरील रहदारीचा रस्ताच अतिवृष्टी व वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने खचला. काही तासातच हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रहदारीचा रस्ताच वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज मात्र वाहतुकीच्या गंभीर समस्येला स्थानिक नागरिकांना समोरे जावे लागत आहे.

त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यातील सिन्नर व नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या टाकेद - म्हैसवळन घाटात आज रस्ता खचल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली. याच मार्गावरुन अकोले, ठानगाव, घोटी म्हैसवळन मार्गे सिन्नर अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र हा मार्ग खचल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Intro: इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील संपर्कच बंद झाला आहे . इगतपुरी तालुक्यात अद्यापही पुरस्थिति गंभीर स्वरूपातच असून नद्यांचे पानी अनेक पुलांवरुन वाहत आहे गंभीर स्वरूपाची बाब म्हणजे इगतपुरी तालुक्यातील निनावी शेनित रस्ताच पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर सिन्नर अकोले तालुक्याला जोडणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद - म्हैसवळन घाटात रस्ताच खचल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहेBody:इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक विक्रमी पाऊसाची दर वर्षी नोंद होत आहे.ह्या वर्षी गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत 3800 मिलिमिटर पाऊस झाला आहे तर गेल्या 24 तासात 368 मिलीमीटर पाऊस झाला आहै त्यामुळे सर्वच नद्यांना आलेला महापुर अजूनही ओसरण्याचे नाव घेत नाही. त्यात तालुक्यात अतिवृष्टिने रस्ता खचल्याने नविन समस्या तालुका प्रशासनापुढे निर्माण होत आहे.Conclusion:गातील निनावी - भरवीर मार्गावरील रहदारीचा महत्वाचा असलेला रस्ताच अतिव्रुष्टि व वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने प्रारंभी खचला मात्र काही तासातच हा वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी ग़ैरसोय निर्माण झाली आहे रहदारिचा रस्ताच वाहुन गेल्याने या परिसरातील नागरिकांचा एकमेकांच्या गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज मात्र वाहतुकीच्या गंभीर समस्येला स्थानिक नागरिकांना समोरे जावे लागत आहे
याबरोबरच इगतपुरी तालुक्यातील जनतेला सिन्नर व नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याशी जोडणाऱ्या महत्वाच्या टाकेद - म्हैसवळन घाटातही आज रस्ताच खचल्याने वाहतुकीची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली. याच मार्गवरुन अकोले, ठानगाव, घोटी म्हैसवळन मार्गे सिन्नर अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.मात्र हा मार्गच खचल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णता ठप्प झाल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.