ETV Bharat / state

धार्मिक नगरी नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, नागरिकांचा खाकीवरील "विश्वास" उडाला - vishvas Nangare Patil

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्या नंतर नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी भावना नागरिकांमध्ये आहे. मात्र, काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोक वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करत आहेत.

धार्मिक नगरी नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, नागरिकांचा खाकीवरील "विश्वास" उडाला
author img

By

Published : Jun 16, 2019, 12:34 PM IST

नाशिक - शहरात गेल्या महिन्याभरापासून गुंडानी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नाशिककरांचा खाकीवरील विश्वास उडालाय असेच म्हणता येईल. मागच्या काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, हत्या यामुळे नाशिक हादरले आहे.

धार्मिक, आध्यत्मिक आणि संस्कृतीचा वारसा असलेले नाशिक हे गुन्हेगारांचे माहेर घर बनू पाहत आहे. मागच्या महिन्या चोऱ्या, हत्या, घरफोड्या दरोडे आणि गोळीबारामुळे नाशिककरांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या शहरातील सीटी सेंटर मॉल जवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरली नाही. अशी भावना नाशिककरांच्या मनात निर्माण झाली आहे. या घटनेला काही तास उलटले नाहीत तेच म्हसरूळ भागात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील चार वाहनांची तोडफोड करत पोलिसांना आव्हान दिले. आठ दिवसांन पूर्वी भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केलं होते. जिथे पोलिसंच सुरक्षित राहू शकत नाही तिथं सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नाशिककर विचारत आहे.

धार्मिक नगरी नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, नागरिकांचा खाकीवरील "विश्वास" उडाला

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्या नंतर नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी भावना नागरिकांमध्ये आहे. यामुळे नांगरे पाटील यांचे नाशिककरांनी जोरदार स्वागत केले. मात्र, काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोक वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करत आहेत. वाढत्या गुन्हेगारी बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे यांनी सांगितले आहे.

हेल्मेट सक्तीवर कारवाईसाठी रस्त्यावर शेकडो पोलीस उतरवण्या पेक्षा गुन्हेगारी कशी कमी होईल या कडे आयुक्तनी लक्ष द्यावे. नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला वाऱ्यावर सोडू नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

नाशिक - शहरात गेल्या महिन्याभरापासून गुंडानी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नाशिककरांचा खाकीवरील विश्वास उडालाय असेच म्हणता येईल. मागच्या काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, हत्या यामुळे नाशिक हादरले आहे.

धार्मिक, आध्यत्मिक आणि संस्कृतीचा वारसा असलेले नाशिक हे गुन्हेगारांचे माहेर घर बनू पाहत आहे. मागच्या महिन्या चोऱ्या, हत्या, घरफोड्या दरोडे आणि गोळीबारामुळे नाशिककरांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या शहरातील सीटी सेंटर मॉल जवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरली नाही. अशी भावना नाशिककरांच्या मनात निर्माण झाली आहे. या घटनेला काही तास उलटले नाहीत तेच म्हसरूळ भागात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील चार वाहनांची तोडफोड करत पोलिसांना आव्हान दिले. आठ दिवसांन पूर्वी भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केलं होते. जिथे पोलिसंच सुरक्षित राहू शकत नाही तिथं सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नाशिककर विचारत आहे.

धार्मिक नगरी नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, नागरिकांचा खाकीवरील "विश्वास" उडाला

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्या नंतर नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी भावना नागरिकांमध्ये आहे. यामुळे नांगरे पाटील यांचे नाशिककरांनी जोरदार स्वागत केले. मात्र, काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोक वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करत आहेत. वाढत्या गुन्हेगारी बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे यांनी सांगितले आहे.

हेल्मेट सक्तीवर कारवाईसाठी रस्त्यावर शेकडो पोलीस उतरवण्या पेक्षा गुन्हेगारी कशी कमी होईल या कडे आयुक्तनी लक्ष द्यावे. नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला वाऱ्यावर सोडू नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Intro:धार्मिक नागरी नाशिक मध्ये गुंडांचा उच्छाद..नागरिकांचा खाकी वरील "विश्वास"उडाला..


Body:नाशिक शहरात गेल्या महिन्याभरात पासून गुंडांनी उच्छाद मांडलाआहे..त्यामुळे नाशिककरांचा खाकी वरील विश्वास उडालाय असंच म्हणता येईल, मागील काही दिवसांत चोऱ्या,घरफोड्या,दरोडे,हत्या ह्यामुळे नाशिक हादरलं आहे...

धार्मिक, आध्यत्मिक आणि संस्कृतीचा वारसा असलेल्या नाशिक हे गुन्हेगारांचं माहेर घरं बनू पाहत आहे.मागील महिन्या भारत चोऱ्या,हत्या,घरफोड्या दरोडे आणि गोळीबारामुळे नाशिककरांन मध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.दिवसाढवळ्या शहरातील सीटी सेंटर मॉल जवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला,ह्या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून तीन जण जखमी झालेत ह्या घटनेनं नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरकी नाही अशी भावना नाशिककरांच्या मनात निर्माण झाली, ह्या घटनेला काही तास उलटत नाही तेच म्हसरूळ भागात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील चार ते वाहनाची तोडफोड करत पोलिसांना आव्हान दिलेयं,आठ दिवसांन पूर्वी भांडण सोडवण्यास गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केलं, जिथे पोलिसंच सुरक्षित राहू शकत नाही तिथं सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न नाशिककर विचार आहे...
विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्या नंतर नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी भावना नागरिकांन मध्ये असल्याने नांगरे पाटील यांचा नाशिककरांनी जोरदार स्वागत केलं,मात्र काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करतायेत. वाढत्या गुन्हेगारी बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे ह्यांनी सांगितलं आहे...

हेल्मेट सक्ती कारवाई साठी रस्त्यावर शेकडो पोलीस उतरवण्या पेक्षा गुन्हेगारी कशी कमी होईल ह्या कडे आयुक्तनी लक्ष दयावे,तसेच दत्तक नाशिक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक ला वाऱ्यावर सोडू नये अशा प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत ..
टीप बाईट नागरिक 2
स्टँडअप कपिल भास्कर प्रतिनिधी..



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.