ETV Bharat / state

एकाच कुटुंबातील आठ जणांना अन्नातून विषबाधा

भालुर गावातील अशोक मोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी ११ वाजेच्या सुमारास शेतात जाण्याआधी न्याहरी म्हणून कांद्याची भाजी, मेथीची भाजी व बाजरीची भाकरी खाल्ली होती. थोड्यावेळाने त्यांना अचानक पोटात दुखणे, मळमळणे जुलाब, उलट्या, असा त्रास होऊ लागला. विषबाधा झालेल्यां पैकी काहींची प्रकृती सुरुवातीला चिंताजनक होती. परंतु, उपचारानंतर सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

author img

By

Published : Jan 3, 2020, 8:52 PM IST

poison
एकाच कुटुंबातील आठ जणांना अन्नातून विषबाधा

नाशिक - मनमाड जवळील भालुर गावात आज (३ जानेवारी) एकाच कुटुंबातील 8 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. प्रकृती खालावल्याने सर्वांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले आहे.

एकाच कुटुंबातील आठ जणांना अन्नातून विषबाधा

भालुर गावातील अशोक मोरे (वय ६०), सिंधुबाई मोरे (वय ५५),सविता मोरे (वय ३०), माधुरी मोरे (वय २०), पल्लवी मोरे (वय २५), वैष्णवी मोरे (वय ११), रोहित मोरे (वय १४) आणि रोहित बर्डे या सर्वांनी ११ वाजेच्या सुमारास शेतात जाण्याआधी न्याहरी म्हणून कांद्याची भाजी, मेथीची भाजी व बाजरीची भाकरी खाल्ली होती. थोड्यावेळाने त्यांना अचानक पोटात दुखणे, मळमळणे जुलाब, उलट्या, असा त्रास होऊ लागला. सर्वांना एकाच वेळी त्रास होऊ लागल्याने त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. पोतदार यांनी उपचार केले. विषबाधा झालेल्यां पैकी काहींची प्रकृती सुरुवातीला चिंताजनक होती. परंतु, उपचारानंतर सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - वाशिममध्ये तेराव्याच्या जेवणातून 35 जणांना विषबाधा

सकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने गावातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने सर्वांचे प्राण वाचले आहेत. सध्या कांद्यासह शेतातील इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व औषधांचा वापर होत आहे. त्यामुळे ही घटना घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच खाव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

नाशिक - मनमाड जवळील भालुर गावात आज (३ जानेवारी) एकाच कुटुंबातील 8 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. प्रकृती खालावल्याने सर्वांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले आहे.

एकाच कुटुंबातील आठ जणांना अन्नातून विषबाधा

भालुर गावातील अशोक मोरे (वय ६०), सिंधुबाई मोरे (वय ५५),सविता मोरे (वय ३०), माधुरी मोरे (वय २०), पल्लवी मोरे (वय २५), वैष्णवी मोरे (वय ११), रोहित मोरे (वय १४) आणि रोहित बर्डे या सर्वांनी ११ वाजेच्या सुमारास शेतात जाण्याआधी न्याहरी म्हणून कांद्याची भाजी, मेथीची भाजी व बाजरीची भाकरी खाल्ली होती. थोड्यावेळाने त्यांना अचानक पोटात दुखणे, मळमळणे जुलाब, उलट्या, असा त्रास होऊ लागला. सर्वांना एकाच वेळी त्रास होऊ लागल्याने त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. पोतदार यांनी उपचार केले. विषबाधा झालेल्यां पैकी काहींची प्रकृती सुरुवातीला चिंताजनक होती. परंतु, उपचारानंतर सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - वाशिममध्ये तेराव्याच्या जेवणातून 35 जणांना विषबाधा

सकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने गावातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने सर्वांचे प्राण वाचले आहेत. सध्या कांद्यासह शेतातील इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व औषधांचा वापर होत आहे. त्यामुळे ही घटना घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच खाव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

Intro:ब्रेकिंग:
मनमाड:मनमाड जवळील भालुर गावातील एकाच कुटुंबातील ७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना आज दिनांक ३ रोजी घडली विषबाधा झालेल्याची प्रकृती खालावली असल्याने त्यांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असुन सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरानी सांगितले आहे.Body:याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड जवळील भालुर गावातील अशोक मोरे (वय ६०) यांच्या घरातील सर्वजण शेती काम करतात आज सकाळी त्यांच्या परिवारातील अशोक मोरे (वय ६०),सिंधुबाई मोरे (वय ५५),सविता मोरे (वय ३०)
माधुरी मोरे (वय २०)पल्लवी मोरे (वय २५),वैष्णवी मोरे (वय ११)रोहित मोरे (वय १४) रोहित बर्डे
या सर्वांनी नाष्टा(न्याहरी) करण्यासाठी त्यांनी ११ वाजेच्या सुमारास कांद्याची मेथीची भाजी व बाजरीची भाकरी खाली व त्यांनंतर सर्वजन आपापल्या कामाला निघून गेले थोड्या वेळाने त्यांना अचानक पोटात दुखणे मळमळणे जुलाब व उलट्या होऊ लागल्या सर्वजांनाना एकाच वेळी त्रास होऊ लागल्याने त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर डॉ पोतदार व बाकीच्या स्टाफने उपचार केले.त्यातील काहींची परिस्थिती सुरवातीला चिंताजनक होती परंतु उपचारा नंतर सर्वांची परिस्थिती धोक्याच्या बाहेर आली असल्याचे डॉक्टरानी सांगितले.Conclusion:.सकाळी जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा गावातील नागरिकांनी वेळीच मदत करत सर्वांना वेळेवर दवाखान्यात दाखल केले त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले.सध्या कांद्यासह शेतीतील इतर पिकावर जे काही रासायनिक खते व औषधाचा वापर होतो आहे त्यामुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टर सांगत असुन सर्व प्रकारच्या पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच खाव्या असेही डॉ सांगत आहे
आमिन शेख मनमाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.